Thursday, July 4, 2019

यूपीएससीची तयारी : सीसॅटची रणनीती सर्वात अगोदर आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे हे ठरवायला हवे.

यूपीएससीची तयारी : सीसॅटची रणनीती 

सर्वात अगोदर आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे हे ठरवायला हवे.

(संग्रहित छायाचित्र)

विक्रांत भोसले
या आधीच्या लेखामध्ये आपण उरअळच्या विविध घटकांतील विषयांचे गेल्या तीन वर्षांत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आधारावर विश्लेषण केले होते. आता या लेखामध्ये आपण पेपर सोडवताना लागणारी रणनीती कशी आखावी आणि ते करत असतानाची आव्हाने काय आहेत हे पाहणार आहोत.
कोणत्या रणनीतीला एक उत्तम रणनीती म्हणता येईल? उत्तम रणनीती म्हणजे अशी की जी आपल्यातील कार्यक्षमता, कौशल्य, तयारी आणि कमतरतांचा अचूक अंदाज घेऊन ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करण्यासाठी मदत करते. यामध्ये आपल्याला सोपे तसेच अवघड वाटणाऱ्या घटकांची आणि त्यातील विषयांची जाणीव, अपुरी तयारी असलेल्या विषयांची जाणीव, वाचनाचा अपेक्षित वेग आणि आपला वाचनाचा वेग, मिळवायच्या गुणांचे उद्धिष्ट आणि अपेक्षित अचूकता आणि त्यासाठी सोडवावयास लागणाऱ्या प्रश्नांची संख्या, प्रश्न सोडवताना वेळ वाचवणाऱ्या पद्धती आणि या सर्वाचा विचार करून केलेले वेळेचे नियोजन याचा अंतर्भाव होतो. आता यातील एकेक घटकांवर आपण चर्चा करु.
सर्वात अगोदर आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे हे ठरवायला हवे. CSAT हा किमान पात्रता पेपर असून त्यात कमीतकमी ६६ गुण मिळवणे अपरिहार्य आहे. पण त्यामुळे फक्त ६६ गुणांचे ध्येय ठेवणे अत्यंत धोक्याचे राहील. कारण परीक्षेत आपण जे काही पर्याय उत्तर म्हणून निवडतो ते सर्वच अचूक असतील हा अंदाज ते पर्याय निवडताना येईलच असे नाही. म्हणून अशा नकळत चुका झाल्या तरी आपल्याला कमीतकमी गुण खात्रीशीर मिळवता येतील यासाठी मुळातच आपले ध्येय हे ६६ गुणांपेक्षा जास्त ठेवायला हवे जसे की, ८० गुण वा १०० गुण. मग हे गुण प्राप्त करण्यासाठी सोडवलेल्या प्रश्नांपकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर यायला हवीत याचा अंदाज असायला पाहिजे. सोडवलेले प्रश्न आणि विविध गुणांच्या ध्येयानुसार सोडवलेल्या प्रश्नांपकी अपेक्षित अचूक प्रश्नांची संख्या हे दाखवणारा तक्ता खाली दिला आहे.
एखाद्याने ६०प्रश्न सोडवले असतील तर ६६गुण प्राप्त करण्यासाठी किमान ३५प्रश्नांची उत्तरे अचूक असायला हवीत तरच negative marking चा परिणाम परीक्षेच्या निकालावर होणार नाही. पण जर ध्येय ८० वा १०० गुणांचे असेल तर ६०प्रश्नांपकी अनुक्रमे ३९ आणि ४५ प्रश्न अचूक असायला हवेत. मगच आपण नकळत होणाऱ्या चुकांना सावरून नेऊ शकतो. यासाठी आपण सोडवणाऱ्या प्रश्नांच्या अचूकतेचा आणि प्रश्न सोडवण्याचा वेगाचा अंदाज असणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात येण्यासाठी पुरेसे सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे.
आता आपण वाचनाच्या वेगाबद्दल बोलूया. गेल्या वर्षी म्हणजे २०१८च्या CSAT पेपरमध्ये एकूण ७,२२० शब्द होते. बऱ्याच जणांना एकदाच वाचून प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. म्हणून कमीतकमी ७० ते ८० टक्के माहिती परत डोळ्याखालून घालावी लागते. याशिवाय आपण सर्वच वेळ फक्त वाचनात घालवत नाहीतर त्यापकी काहीवेळ विचार करून उत्तर काढण्यात घालवतो. हे सर्व लक्षात घेतले की असे लक्षात येते की आपल्या वाचनाचा वेग अंदाजे १७५ ते २०० शब्द दर मिनिट असायला पाहिजे. आता प्रत्येकाने आपापल्या वाचनाचा वेग तपासून पाहावा.
आता काही जण म्हणतील की हा पेपर पास होण्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नाही, हे बरोबर आहे. पण कोणते प्रश्न सोडवावेत आणि कोणते नाही यासाठी प्रत्येक प्रश्नातील काही भाग वा कधीकधी सर्व भाग वाचावा तर लागेलच. मग अशावेळी प्रश्नांची निवड कशी करावी आणि कुठे कुठे वेळ वाचवता येऊ शकतो हे आता पाहू यात.
पहिल्यांदा जर प्रश्न प्रकार वा माहिती वा उताऱ्याचा विषय वा भाषेची शैली हे सर्व जर अपरिचयाचे वा नेहमी अवघड जाणारे असेल तर प्रश्न सोडवण्याच्या पहिल्या फेरीत त्याच्यावर वेळ घालवू नये. जर खूप साऱ्या माहितीवर अगदीच कमी प्रश्न विचारले असतील तर अशा प्रश्नांना कमी प्राधान्य द्यावे.
उतारा सोडवताना जर प्रश्नाचे स्वरूप अप्रत्यक्ष म्हणजे विधाने देऊन त्यांच्या सत्यते वा असत्यतेबद्दल विचारले असेल तर Elimination पद्धतीचा उपयोग होतो का हे पाहावे.
ही पद्धत म्हणजे विधाने वाचण्याच्या अगोदर पर्याय पाहावेत आणि त्यांतील असे विधान शोधावे जे जर चूक निघाले तर चारपकी तीन पर्याय चूक ठरतात. असे विधान सापडले की पहिल्यांदा त्याची सत्यता पडताळावी असे केल्याने बराच वेळ वाचतो. या अगोदरच्या लेखांमध्ये ळं’’८ म्हणजेच ताळा पद्धतीचा उल्लेख केला होता. तिचाही वापर जिथे जिथे शक्य आहे तिथे करावा. त्याचप्रमाणे जर इंग्रजी भाषेवर आपली पकड पक्की नसेल तर असे प्रश्न हाताळताना थोडी काळजी घ्यावी.
जिथे शब्दच्छल वा समजायला अवघड भाषा असेल किंवा कधीच परिचय न झालेल्या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला असेल तर तो प्रश्न प्रकार कितीही परिचयाचा असला तरी त्याला शेवटी हाताळावे.
एक चांगली रणनीती आखताना एवढय़ा सर्व बाबींचा बारकाईने विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये यश संपादन करणे अत्यंत सोपे आहे.
First Published on May 9, 2019 12:19 am
Web Title: csat exam strategy

No comments:

Post a Comment