Wednesday, March 22, 2017

जीवशास्त्रात रस घ्या जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा अतिशय मनोरंजक विषय आहे.

जीवशास्त्रात रस घ्या

जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा अतिशय मनोरंजक विषय आहे.

प्रा. श्यामलता कुलकर्णी | February 10, 2017 12:26 AM


बारावी विज्ञान विभागाचा विचार केल्यास पीसीएमबी या गटाचे महत्त्व मोठे आहे. काल आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या टिप्स पाहिल्या. आज गणित आणि जीवशास्त्रासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी पाहू. या टिप्स दिल्या आहेत, या विषयांसाठी एचएससी बोर्डामध्ये परीक्षा नियामक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांनीच.
जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा अतिशय मनोरंजक विषय आहे. याला घाबरून न जाता यात रस घेऊन, समजून अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रहो, तुम्ही छान गुण मिळवू शकता.
  • बायोसाठी विभाग १ आणि २ असतात. सर्वप्रथम सुपरवायझरकडून या दोन्ही विभागांच्या पेपरसाठी योग्य तो यूआरडी कोड लावला आहे ना हे तपासून घ्या.
  • पेपर लिहिताना शक्यतो निळ्या पेनाचा उपयोग करा.
  • जे विषय कळायला कठीण जातात, त्यांचे तक्ते बनवा. त्यातून त्यातल्या संज्ञा, व्याख्या लक्षात ठेवा.
  • जो विषय वर्षभर कधीही वाचला नाही, तो आता ऐनवेळीसुद्धा पाहू नका. पेपरच्या आधी त्याचे वाचन टाळाच. कारण आता तो वाचून नीट समजला नाही तर गोंधळ उडण्याची शक्यता दाट असते.
  • चांगली झोप घ्या. पण फार लोळतही बसू नका. सकाळी योग्य नाश्ता करून जा. जास्त खाऊ नका किंवा कमीही खाऊ नका.
  • पेपरमध्ये अनेक ठिकाणी आकृत्या काढण्याची गरज लागणार आहेच. प्रमाणबद्ध, स्वच्छ आकृत्या काढा. त्याला योग्य ठिकाणी नावे द्या. आकृत्या सजवत बसू नका.
  • आपल्या पुस्तकातील जे धडे ३ गुणांसाठी असतात त्यावर शक्यतो वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. उदा. मायक्रोब्ज ऑफ ह्य़ुमन वेल्फेअर. विभाग दोनमध्ये जेनेटिक इंजिनीअिरग, जिनॉमिक्स, क्रोमोझोमल बेसेस ऑफ इनहेरिटन्स आहे. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ अर्थ, अ‍ॅनिमल हजबंडरी हे ३ गुणांसाठी असतात. त्यावरच शक्यतो वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात.
  • जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा पेपर २ मधला महत्त्वाचा धडा आहेच. तसेच बायोटेक्नॉलॉजी हा पेपर १मधला महत्त्वाचा धडा आहे. फिजिओलॉजी चॅप्टर्स पेपर १ मधले फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन आहे. त्याचसोबत विभाग २मध्ये आहेत, सक्र्युलेशन, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ह्य़ुमन रिप्रोडक्शन. या धडय़ांना गुण जास्त दिलेले आहे. पण फक्त जास्त गुण दिलेल्या धडय़ांनाच महत्त्व द्यायचे असे करू नका.
  • जीवशास्त्रासाठी महत्त्वाच्या धडय़ांचा विचार करताना जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक्स इन मेडिसिन, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन आहेत. हे धडे पर्यायांशिवाय ८ गुणांचे आहेत. तसेच बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड अ‍ॅप्लिकेशन, एनहान्समेंट इन द फूड प्रोडक्शन यासाठी  ७ गुण आहेत. मायक्रोब्ज ऑफ ह्य़ुमन वेल्फेअरसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न नक्कीच येईल. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन सात मार्काचा आहे. रिप्रोडक्शन इन प्लँट्स हासुद्धा महत्त्वाचा धडा आहे. ऑरगॅनिझम इन एन्व्हायर्न्मेंटलाही महत्त्व द्या. तसेच ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाइफमध्ये कनेक्टिंग लिंक, युरे अँड मिलर्स एक्स्पेरिमेंट, ह्य़ुमन एव्हेल्युशन, होमोलॉगस ऑर्गन्स, अ‍ॅनालॉगस ऑर्गन्स आदी आहेतच. जीवशास्त्रात उत्तरे लिहिताना उदाहरणांवर भर द्या. त्यासाठी तुम्हाला गुण मिळतात. ते न दिल्यास गुण जातात. ह्य़ुमन हेल्थ अँड डिसिजेस, अ‍ॅनिमल हजबंडरीज यामध्येसुद्धा बरेच पॅथोजन्स आहेत. अ‍ॅनिमल हजबंडरीजमध्ये प्राणी पैदास आहे. क्रोमोझोमल बेसेस ऑफ इनहेरिटन्समध्ये विभाग २मध्ये लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर्स या पाठावरही भर देऊ शकता. तसेच बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सक्र्युलेशन, एक्सक्रीशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ह्य़ुमन रिप्रोडक्शन हा विषय तुम्हाला ७ गुणांसाठी येऊ शकतो. ऑर्गनिझम्स इन एन्व्हायर्न्मेंट हा पाठ पेपर १ आणि २ दोन्हीमध्ये आहे. त्याचा चांगला अभ्यास करा. त्यात अनेक उदाहरणे सापडतील. पेपर २मध्ये इन्डेजिअस स्पेसीजचाही चांगला अभ्यास करा.
गणिताची गंमत
  • प्रा. सतिश मेस्त्री
बारावीच्या विज्ञान विभागात गणिताला खूप महत्त्व आहे. पुढे इंजिनीअरिंगसाठीही या विषयाची गरज पडते. आता बोर्डाच्या परीक्षेला काही दिवसच उरलेले असताना या विषयाचा अभ्यास कसा करावा, याविषयी काही टिप्स..
वर्षभर गणिताचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्याची भीती वाटण्याची आवश्यकता नाही. मला गणिताच्या पेपरमध्ये चांगले यश मिळणारच असा आत्मविश्वास बाळगा, पण तसे प्रयत्नही कराच. गणित भाग (१) व गणित भाग (२) या दोन्ही विषयांचा एकच पेपर असतो, त्याचे एकूण गुण ८० आहेत. पेपरला जाण्याच्या अगोदर या दोन पुस्तकांचा अगदी थोडय़ा कालावधीत कसा अभ्यास करावयाचा हे आपण पाहू.

  • गणित भाग १ व भाग २ मधील सर्व थिअरम्स आणि फॉम्र्युले वाचणे.
  • सोप्या घटकापासून सुरुवात करा. उदा. लॉजिक, मॅट्रिक्स
  • बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले थिअरम्स परत परत वाचा.
  • गणित भाग (१) व भाग (२) मधील प्रत्येक घटक संपल्यावर ‘रिमेंबर धिस’ हा तक्ता दिलेला असतो, तो अवश्य वाचणे.
  • दोन्ही पुस्तकांतील सोडविलेल्या सर्व उदाहरणांवरून नजर घाला.
  • प्रत्येक उदाहरणातील मुख्य पायऱ्या लक्षात ठेवा.
  • तुम्ही सोडविलेले उत्तर, काही वेळाने वाटले की ते चूक असेल, तर ते उत्तर न खोडता दुसऱ्या पानावर त्याचे उत्तर लिहावे.
  • शक्यतो सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणित भाग (१) व गणित भाग (२) या दोन्ही पुस्तकांतील कोणत्याही घटकाकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही.
गणित भाग (१) ची थोडय़ा वेळात कशी तयारी करायची, ते पाहूया
  • मॅथेमेटिकल लॉजिक प्त, ॰, ऽ, ञ् ज्ज् ची ट्रथटेबल आणि विदाऊट ट्रथ टेबलवरील उदाहरणे,  तसेच सर्किट डायग्राम शिफ्टेड फ्रॉम ट्रथ टेबल, डय़ुएल अँड निगोशनमधील फरक ओळखणे.
  • मॅट्रिक्समध्ये को फॅक्टर मॅट्रिक्स –
  1. अ‍ॅडजॉइंट मॅट्रिक्स
  2. एलिमेंट्री रो, कॉलम्स टू फाइड ए मॅट्रिक्स
  3. इनव्हर्जन मेथड
  4. रिडक्शन मेथड
  • ट्रिगनोमेट्रीक फंक्शन्सची सर्व सूत्रे आणि उदाहरणे काळजीपूर्वक वाचणे.
  • पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्समधील दोन सूत्रे आहेत. त्यातील एक विचारले जाते.
  • व्हेक्टर- कोलिनिअर अँड कोप्लॅनरवर आधारित उदाहरणे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि अ‍ॅप्लिकेबल व्हेक्टर टू जॉमेट्रीवर आधारित उदाहरणे.
  • थ्री डायमेन्शनल जॉमेट्री
  • लाइन – यातील बेसिकल कार्टेजन अँड व्हेक्टर रिप्रेझेंटेशन आणि एक्झाम्पल्स बेस्ड ऑन डिस्टन्स अभ्यासणे.
  • प्लेन जॉमेट्रीमधील- सर्व सोडवलेली उदाहरणे पाहणे.
  • लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम हे आलेख पेपरवर उदाहरणे सोडवणे.
गणित भाग २)
  • कंटीन्युइटी – यामध्ये कंटीन्युइटी अ‍ॅट द पॉइंट आणि कंटीन्युइटी ओव्हर (b) & (a.b)
  • डिफरन्शिएशन- यामध्ये तीन महत्त्वाचे थिअरम्स आहेत.
  • डेरिव्हेशन ऑफ कंपोझिट फंक्शन, डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्ज फंक्शन, डेरिव्हेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन इतर सर्व सूत्रे व त्यावरील आधारित उदाहरणे.
  • अ‍ॅप्लिकेशन ऑफ डेरिव्हेशन – प्रत्येक उपघटकातील उदाहरणांचा अभ्यास करणे.
  • इंटिग्रेशन – यात एकच थिअरम आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स सर्व सोडवलेली सूत्रे व त्यावर आधारित उदाहरणे अभ्यासावीत.
डेफिनिट इंटिग्रल- यामध्ये डेफिनिट इंटिग्रल अ‍ॅज अ लिमिट ऑफ सन हा टॉपिक ऑप्शनला ठेवू शकतो.
  • प्रॉपर्टीज ऑफ डेफिनिट इंटिग्रलचे थिअरम पेपरमध्ये विचारले जातात. त्यावरील सर्व उदाहरणे अभ्यासावीत.
  • अ‍ॅप्लिकेशन ऑफ डेफिनिट इंटिग्रल- फक्त एरिया अंडर द कव्‍‌र्ह यावर आधरित उदाहरणे असतील.
  • डिफरन्शिअल एक्वेशन- सर्व उदाहरणांचा अभ्यास करावा.
  • प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन यातही सर्व उदाहरणांचा अभ्यास करावा.
  • बिनोमियल डिस्ट्रिब्युशन लाही विसरू नका.
First Published on February 10, 2017 12:26 am
Web Title: biology

करिअरमंत्र कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते.

करिअरमंत्र

कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते.

सुरेश वांदिले | February 10, 2017 12:25 AM


कम्बाइंड डिफेन्सच्या जागा कधी सुटतात? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे? कोणती पुस्तके वाचू?
आकाश घोरपडे
कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते. पहिली परीक्षा साधारणत: फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. यंदा पहिल्या परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये १५० जागा, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडेमीमध्ये ४५ जागा, एअर फोर्स अ‍ॅकॅडमी येथे ३२ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे २२५ जागा भरल्या जाणार आहेत.
मी आता बारावी विज्ञान शाखेत आहे. मला औषधीनिर्माणशास्त्र शिकायचे आहे. त्यासाठी मला बी.फार्म आणि डी.फार्म यामध्ये काय फरक असतो ते सांगा?
आकाश सातव
बॅचलर ऑफ फार्मसी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्वत:चे औषधाचे दुकान सुरू करता येऊ  शकते. औषधीनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ  शकतात. एम.फार्म करून अध्यापन किंवा संशोधनाच्या क्षेत्रात संधी मिळू शकते. डी.फार्म हा दोन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर औषधी विक्रीचे दुकान काढता येऊ  शकते. औषधी विक्री करणाऱ्या मोठय़ा दुकानांत किंवा कॉर्पोरेट रुग्णालयांमधील औषधी विभागातसुद्धा नोकरी मिळू शकते. फार्मा डी हा १२वीनंतरचा सहा वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे. यातील एक वर्षे रुग्णालयामध्ये इंटर्नशिप करावी लागते. हा अभ्यासक्रम केल्यावर डॉक्टर अशी पदवी लावता येते. मोठय़ा रुग्णालयांमध्ये रुग्णांशी थेट संपर्क व समन्वय साधून सल्ला देण्याचे, औषधी सुचवण्याचे कार्य करू शकतात.
मी भूगोल/ गणित/ केमिस्ट्री हे विषय घेऊन बी.एस्सी. करत आहे. मला वैमानिक व्हायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल व त्यासाठी फी किती आहे?
सिद्धेश सोमनाथ चांडोल
वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेतलेले असणे गरजेचे असते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on February 10, 2017 12:25 am
Web Title: career guidance 18

Tuesday, March 7, 2017

संगणकावर कृषी माहिती सहज उपलब्ध या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.

संगणकावर कृषी माहिती सहज उपलब्ध

या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.

देशभरातील शेतीविषयक माहिती एका क्लिकवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मराठवाडा कृषी विद्यापीठात लवकरच प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्या प्रकल्पाचे नाव ‘नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन इनग्रो’ असे आहे.
Ads by ZINC

  • या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.
  • या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर देशातील कुठल्याही भागात सध्या असलेली पीक परिस्थिती, त्या ठिकाणी घेतले जाणारे पीक, हवामानाची स्थिती, हवामानाच्या बदलानुसार पीक नियोजनात केलेले बदल, पावसाचे प्रमाण, वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक सल्ला याबरोबरच कच्च्या मालासाठी बाजारपेठ, बाजारपेठेतील भाव आदी माहिती एकाच ठिकाणी मिळविणे सहज शक्य होणार आहे.
  • अलीकडच्या काळात हवामानात बदल होत आहे. पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे शेतीतही अचूकता आणणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचा सल्ला वापरून शेती केल्यास ती निश्चितच फायद्याची ठरेल आणि यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांना फलदायी ठरणार आहे.
  • शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे या बाबींची सांगड घालून शेती करणे गरजेचे झाले आहे. या संगणक कक्षात शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणाची शास्त्रीय माहिती मिळणार आहे. तसेच याच माहितीच्या आधारे पीक नियोजन करणे सोयीचे जाणार असल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • ई गव्हर्नन्सी प्लॅनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात बसून विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे सोपे होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यात त्या गावातील शेतकऱ्यांच्या गटाशी संपर्क साधून शास्त्रीय सल्ला देणे सोयीचे होणार आहे.
First Published on February 9, 2017 12:17 am
Web Title: agricultural information easily available on the computer

भौतिकशास्त्रात गती मिळवा लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते.

भौतिकशास्त्रात गती मिळवा

लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते.

प्रा. विलास बसरे | February 9, 2017 12:17 AM


रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विज्ञान विभागातले दोन महत्त्वाचे विषय. बारावीच्या परीक्षेसाठी आता या अंतिम टप्प्यांत याची तयारी कशी करावी, याबद्दल सांगताहेत, , एचएससी बोर्डामधील परीक्षा नियामक..
उच्च माध्यमिक परीक्षेसाठी भौतिकशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकूण १०० गुणांपैकी ७० गुण लेखी परीक्षेसाठी (कालावधी ३ तास) व ३० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (कालावधी ३ तास) असतात. लेखी परीक्षेसाठी ७० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून, त्यामध्ये दोन विभाग असतात. दोन्ही विभाग प्रत्येकी ३५ गुणांचे असून प्रत्येक विभागात चार प्रश्न असतात. दोन्ही विभागांसाठी एकच उत्तरपत्रिका असते.
लेखी परीक्षेची तयारी – लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते. प्रश्नपत्रिकेमध्ये १४ गुण वस्तुनिष्ठ (MCQ’S), ४२ गुण (विकल्पासह ५६) लघुउत्तरी व १४ गुण (विकल्पासह २६) दीघरेत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतात. पाठय़पुस्तकाचा सखोल अभ्यास करणे हीच परीक्षेची खरी गुरुकिल्ली आहे. कमीत कमी वेळेत आकृती काढण्याचा सराव करणे गरजेचे आहे. आकृत्या सुबक व नामांकित काढाव्यात. प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्नांना  सर्वात जास्त गुण आहेत, त्यामुळे अभ्यासक्रमातील Diagrams, Definitions, Applications, Uses, Properties, Distinguish between, Small derivations इत्यादी भागावर जास्तीत जास्त भर द्यावा.
वस्तुनिष्ठ प्रश्न हे ज्ञान व आकलनावर आधारित असल्यामुळे पाठय़पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिताना फक्त   a, b, c, d असे न लिहिता संपूर्ण उत्तर लिहिणे अनिवार्य आहे.
विभाग १ मध्ये सर्वाधिक गुण Oscillations (७ गुण) व Stationary waves (७ गुण) या पाठांना आहेत. विभाग २ मध्ये सर्वाधिक गुण Interference and Diffraction (६ गुण), EMI (६ गुण) व  Atoms, Molecules and Nuclei (६ गुण) या पाठांना आहेत. अर्थातच या पाठांची तयारी चांगली करावी. तयारी करताना नेहमी टाचण काढण्याची सवय असावी.
भौतिकशास्त्र विषयातील गणिते सोडविण्यासाठी प्रथम सूत्रांची उजळणी करणे गरजेचे आहे. पाठय़पुस्तकातील सोडवून दिलेली व सोडवण्यास दिलेली गणिते परत एक वेळ सोडवून उजळणी करावी. गणिते सोडवताना लॉग टेबल वापरणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ३४ ते ३६ गुण (विकल्पासहित) हे गणितासाठी असतात. गणिते सोडवताना प्रथम सूत्र, नंतर किमती टाकून उत्तर लॉग टेबल वापरून काढावे. शेवटी उत्तराला Unitc लिहिणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना संपूर्ण पेपर ३ तासांत सोडवायचा असतो, म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रम ३ तासांत आठवणे गरजेचे असते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुस्तक बंद करून प्रत्येक पाठातील संपूर्ण मुद्दे आठवतात की नाही याची पडताळणी करावी. जे मुद्दे आठवत नसतील ते बाजूला लिहून ठेवून त्यांची नंतर उजळणी करावी.
२) प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी कशी कराल?
प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाइन लॅब हा सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम सी डॅक मुंबईने बनविला असून तो अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी www.olab.com संकेतस्थळाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा. प्रात्यक्षिक परीक्षेच्या ३० गुणांपैकी प्रयोगवहीला ८ गुण, तोंडी उत्तरांना ६ गुण, १ प्रात्यक्षिक
८ गुण व दोन अ‍ॅक्टिव्हिटीजना ८ गुण असतात. लॉग टेबलच्या साह्य़ाने आकडेमोड करणे अनिवार्य आहे.

रसायनशास्त्राचे तंत्र
  • प्रा. किशोर चव्हाण
इयत्ता १२वी बोर्डाची ‘रसायनशास्त्र’ या विषयाची परीक्षा बुधवार, दिनांक ८ मार्च २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात हा विषय अतिशय व्यापक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयाची भीती जास्त आहे. सध्याचा रसायनशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम हा CBSE (NCERT)च्या धर्तीवर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी राज्य शासकीय पाठय़पुस्तकांचा सखोलपणे अभ्यास केला, तर अशा विद्यार्थ्यांना मेडिकल तसेच इंजिनीअरिंगच्या प्रवेश-परीक्षेत पात्र होणे हे अवघड नाही.
रसायनशास्त्र या विषयाचा पेपर हा ७० मार्काचा आहे व वेळेची मर्यादा ३ तास आहे. या पेपरमध्ये दोन विभाग आहेत व प्रत्येकी चार प्रश्न आहेत. दोन्ही विभागात  प्रत्येकी एक प्रश्न हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  स्वरूपाचा असतो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक धडय़ाच्याखालील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचा अभ्यास करावा. विभाग १मध्ये फिजीकल आणि इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे धडे आहेत. दुसऱ्या विभागात ऑरगॅनिक आणि उरलेले इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे धडे आहेत. पहिल्या विभागात एकूण पाच धडय़ांमध्ये न्युमरिकल्स विचारले जातात. ३०% प्रश्न हे त्यावर असतात. हे न्युमरिकल्स फॉम्र्युला बेस्ड म्हणजे सूत्रांवर आधारित असतात. प्रत्येक धडय़ामधील सूत्रे पाठ केली आणि धडय़ाखालील सोडवलेले आणि न सोडवलेले न्युमरिकल्स सोडवलेत तर विद्यार्थी जवळपास १०-१२ गुण मिळवू शकतो. विभाग एकमध्ये नियम, व्याख्या, आकृत्या, डेरिव्हेशन्स, डिस्टिंक्शन्स  इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून लक्षात ठेवणे आवश्यक आहेच. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ पाठांतर करून लिहिण्याचा सराव करणे गरजेचे आहे.
इयत्ता १२ वीचा शास्त्र विषयाचा पेपर हा चार घटकांवर तयार केला जातो. ज्ञान, समज,उपयोग आणि कौशल्य. रसायनशास्त्राच्या दोन्ही विभागांत आकृत्या आणि रचना विचारल्या जातात. विद्यार्थ्यांनी एकूण १५धडय़ांखालील यूझेस ऑफ चा अभ्यास जरूर करावा. कारण जवळपास ४-६ गुण हे उपाययोजनांवर आधारलेले असतात. विभाग एकमध्ये पी ब्लॉक एलिमेंटस या धडय़ाला जास्त गुणांकन आहे. हा धडा कोणत्याही परिस्थितीत ऑप्शनला टाकू नका.
इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे एकूण ४ धडे आहेत. विभाग एकमध्ये दोन आणि विभाग दोनमध्ये दोन. हे सर्व धडे थिअरॉटिकल म्हणजेच सैद्धांतिक असल्याने त्याचा नीट अभ्यास करा. धडय़ाखालील प्रश्न सोडवा. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे एकूण ७ धडे आहेत. यामध्ये जवळपास ३५ नेम्ड रिअ‍ॅक्शन्स आहेत. त्या पाठ करणे आवश्यक आहे. दुसऱ्या विभागात शेवटच्या तीन धडय़ांमध्ये व्याख्या,
रॉ मटेरिअल्स लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी शेवटी अभ्यास करत असताना न्यूमरिकल्स, लॉज, डेफिनेशन, डिस्टिंक्शन्स, यूझेस, अ‍ॅप्लिकेशन्स, डेरिव्हेटिव्हज, नेम्ड रिअ‍ॅक्शन्स, कन्व्हर्जन्स इ.चा व्यवस्थित अभ्यास केला तर विद्यार्थी परीक्षेत उत्तम गुण मिळवू शकतात. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर विद्यार्थ्यांना प्रश्नाचे स्वरूप व त्याची अपेक्षित उत्तरे लिहिता येतील, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे. पेपर सोडवत असताना मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. जे प्रश्न सोपे वाटत असतील त्याची उत्तरे सुरुवातीला लिहा व जे प्रश्न कठीण वाटत असतील ते पेपर पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करा, की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रात्यक्षिक परीक्षेचे महत्त्वही लक्षात ठेवा. या परीक्षेसाठी ३० गुण आहेत. त्यापैकी १०गुण व्हॉल्युमेट्रीक अ‍ॅनालिसीस आणि १० गुण हे इतर प्रयोगांच्या कॉम्बिनेशन्सवर आधारलेले आहेत. उरलेले १० गुण जर्नल, प्रोजेक्ट, आणि व्हायवाला दिलेले आहेत. योग्य पद्धतीने किंवा मार्गाने आपण अभ्यास केला तर यश आपलेच आहे.
First Published on February 9, 2017 12:17 am
Web Title: physics and chemistry

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन-२ चे हुकमी एक्के सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र.

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन-२ चे हुकमी एक्के

सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र.

वसुंधरा भोपळे | February 8, 2017 4:40 AM


सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र. पण बरेचदा विद्यार्थी याची धास्ती घेतात आणि सपशेल शरणागती पत्करतात. पण गेल्या चार वर्षांतली परिस्थिती पाहिली तर या विषयांत किमान पन्नास-साठ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पूर्व परीक्षेत चांगली कामगिरी करतात. या घटकावरील प्रश्नांचे विश्लेषण पाहिल्यास कोणत्या घटकावर किती भर द्यावा याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
गणिताच्या भीतीपोटी विद्यार्थी आपल्याला इथे गुण मिळणारच नाहीत म्हणून गणित विभागात आपली विकेट आधीच फेकतात. पण गणिताची तयारी इतकीही काही कठीण नाही.
*    अंकगणिताची तयारी
या विभागात जर चेंडू तडीपार करून अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर अभ्यासाचे घटक ठरवून घेऊन त्यांची चौफेर तयारी करा. यामध्ये सरासरी, शेकडेवारी, नफा-तोटा,भागीदारी, गुणोत्तर-प्रमाण, काळ-काम-वेग, वेग-वेळ-अंतर, सरळव्याज, चक्रवाढव्याज, कालमापन अशा घटकांवर अधिक भर द्यावा. हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. योग्य त्या सरावाने या घटकातील यॉर्करसुद्धा तडीपार ठोकता येऊ शकतात. यासाठी चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा.
*    बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र तयारी
या विभागात आकृत्यांवरील प्रश्न, घनाकृती, संख्यामाला, अक्षरमाला, चिन्हमाला, नातेसंबंध, कालमापन, तर्क अनुमान, माहितीचे आकलन, बठक व्यवस्था, इनपुट-आउटपुट अशा घटकांचा समावेश होतो. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व ताíकक क्षमतेच्या कसोटीबरोबरच त्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते. एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडविता येऊ शकतो. त्यामुळे या पद्धतींचा विचार करून त्यातील खाचाखोचा लक्षात ठेऊन प्रश्न सोडविण्याचा सराव केलात तर परीक्षेतही कमीत कमी वेळात प्रश्न सोडविता येऊ शकतात.
यासंदर्भात कालमापन या घटकाचे उदाहरण घेतल्यास सरावाच्या वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रत्येक महिन्याच्या १,८,१५,२२,२९ या तारखांना एकच वार असतो.
२.सामान्य वर्षांत आजच्या तारखेला जो वार असतो त्याच्या पुढचा वार पुढच्या वर्षांत त्याच तारखेला असतो, परंतु लीप वर्षांत मात्र पुढच्या वर्षांतील वार दोन दिवस पुढे जातो.

हे मुद्दे पाठ करण्याऐवजी ‘असे का होत असावे?’ याचे कारण जाणून घेऊन लक्षात ठेवल्यास ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे करता येईल.
१. आठवडय़ामध्ये एकूण सात वार असल्यामुळे १+७=८, ८+७=१५.. म्हणून १,८,१५,२२,२९ या तारखांना तोच वार येतो.
२. सामान्य वर्षांचे एकूण ३६५ दिवस असतात, ३६५ ला ७ या एकूण वारांच्या संखेने भागल्यास बाकी १ उरते म्हणून सामान्य वर्षांत पुढील वर्षांतील वार १ दिवसाने पुढे जातो तर लीप वर्षांत ३६६ दिवस असल्यामुळे ७ ने भागल्यास बाकी २ उरते म्हणून पुढचे वर्ष लीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षांतील त्याच तारखेचा वार दोन दिवस पुढे जातो.(लीप वर्षांतील अधिक वार फेब्रुवारीमध्ये असल्यामुळे हा नियम चालू वर्षांच्या १ मार्च ते पुढच्या २८ फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसांना लागू होतो.)
अशा प्रकारे सर्वच उदाहरणांच्या बाबतीत ‘असे का?’ याचे उत्तर तुम्ही स्वत: मिळविले तरच या घटकातील सर्व खाचाखोचा लक्षात राहू
शकतील. एकूणच या विभागाची तयारी करताना शांतपणे विचार करून ‘असे का?’ याचे उत्तर मिळवून शक्य तेवढी सूत्रे, १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग, १ ते १५ पर्यंतचे घन, इंग्रजी वर्णमालेतील वर्णाचे अनुक्रम अशा मूलभूत गोष्टींचे पाठांतर आणि योग्य तो सराव केल्यास हा विभाग तुम्हाला हमखास गुण मिळवून देऊ शकतो. यासाठी आर एस आगरवाल यांच्या पुस्तकातील वरील घटकांचा सरावासाठी वापर करता येईल.
First Published on February 8, 2017 4:39 am
Web Title: mpsc success mantra 7


 
You Might Also Like

करिअरमंत्र तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील.

करिअरमंत्र

तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील.

सुरेश वांदिले | February 8, 2017 4:38 AM


*   मी बीएससी केमिस्ट्रीच्या शेवटाला वर्षांला आहे. मी एम.एससी करावी का? यानंतर कोणत्या प्रकारच्या शासकीय किंवा इतर संधी प्राप्त होतात.
– गणेश नागरगोजे
तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील. शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तुम्हाला अध्यापनाची संधी मिळू शकते. संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करता येणे शक्य आहे. पीएच.डी. करून भविष्यात वरिष्ठ महाविद्यालये किंवा विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळू शकते.
*    मी सध्या एमबीए-मार्केटिंग या विषयाच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला लोकसेवेसाठी जिल्हाधिकारी हे पद मिळवायचे आहे. मी अजून एकदाही एमपीएससी परीक्षा दिलेली नाही. मी त्याची तयारी कशी करू?
– धम्मपाल थोरात
थेट जिल्हाधिकारी होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते. उपजिल्हाधिकारी हे पद राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरले जाते. या पदावर प्रथम नियुक्ती मिळालेले उमेदवार साधारणत: पंधरा वर्षांत भारतीय प्रशासनिक सेवेत पदोन्नत होतात. त्यानंतर त्यांना जिल्हाधिकारी हे पद मिळू शकते. सध्या तुम्ही एमबीए अभ्यासक्रम उत्तम रीतीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. राज्यसेवा वा केंद्रीय नागरीसेवा परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक अशा आहेत. त्यात लाखो उमेदवार बसतात. त्यातून बाराशेच्या आसपास उमेदवारांची निवड होते. त्यामुळे नैराश्य टाळण्यासाठी स्वत:कडे उत्तम असा एक दुसरा पर्याय तयार असणे सध्याच्या काळात गरजेचे आहे.
*    मी विद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी घेतली आहे. मला एमपीएससी देण्याची इच्छा आहे. पण मला विद्युत शाखेतूनच परीक्षा द्यायची आहे. तरी मला या परीक्षेचे स्वरूप सांगा. परीक्षेचे अर्ज कधी निघतात. ही परीक्षा कधी घेण्यात येते? नोकरीची संधी कुठे मिळेल?
– यशश्री महाले

तुम्ही राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (विद्युत आाणि यांत्रिकी) सेवा ही परीक्षा देऊन महाराष्ट्र शासनाच्या सेवेत येऊ  शकता. ही परीक्षा साधारणत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या केंद्रांवर घेण्यात येते. वयोमर्यादा किमान १९ वर्षे कमाल ३३ वर्षे. महाजेनको कंपनीमार्फत स्वंतत्ररीत्या विद्युत अभियंत्यांची पदे भरली जातात. त्यांची माहिती महाजेनकोच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केली जाते.
*    मी ११वीपासून एमपीएससी/यूपीएससीची तयारी करत आहे. आता मी एसवाय बीकॉमला आहे. मला वेळेच्या व्यवस्थापनाविषयी माहिती द्याल का?
श्वेता नंदनवार
नक्कीच श्वेता. आपल्या प्रश्नावरून आपणास नेमके कशासाठी वेळेच्या व्यवस्थापनाची माहिती हवी आहे, ही बाब स्पष्ट होत नाही. तथापी बीकॉमचा अभ्यास आणि यूपीएससी/ एमपीएससीचा   अभ्यास करण्यासाठी वेळ कसा पुरवावा, हा प्रश्न पडला असावा. या दोन्ही अभ्यासाशिवाय आपणास आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष द्यावे लागेल. यामध्ये व्यायाम, एखाद्या कलेची जोपासना, छंद, लेखन व वक्तृत्व कौशल्यात वृद्धी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक बाबींसाठी विशिष्ट वेळ राखून ठेवावा. या वेळापत्रकाचे पालन प्रामाणिपणे करण्याचा प्रयत्न  केल्यास असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होऊ  शकतात.
First Published on February 8, 2017 4:35 am
Web Title: expert career advice

यूपीएससीची तयारी : नियोजनाची आखणी प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते.

यूपीएससीची तयारी : नियोजनाची आखणी

प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते.

तुकाराम जाधव | February 7, 2017 5:08 AM


यूपीएससी परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन भिन्न टप्पे, विविध विषय आणि त्यांचा व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भपुस्तके आणि किमान वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्टय़ांमुळे यासाठी नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही. परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन पद्धतशीरपणे केलेला अभ्यास व वेळेचे नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणीच या परीक्षेचा मार्ग सुकर करू शकते.
प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते. पहिली बाब म्हणजे आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे ठरवून अभ्यासास सुरुवात करावी. या परीक्षेच्या तयारीसाठी किमान एक वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करणे आवश्यक ठरते. त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल तर तयारीचे दीर्घकालीन नियोजन आखता येईल. दुसरी बाब म्हणजे परीक्षेपूर्वी एक वर्ष आधी सुरू करायचा अभ्यास हा शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा. म्हणजे या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे याच परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अभ्यासाचे वर्ष निश्चित झाल्यावर हाती घ्यावयाची तिसरी बाब म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे. त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणत: सात-आठ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.
चौथी बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी राखीव आठ महिन्यांचा आणि पूर्व परीक्षेसाठी राखीव चार महिन्यांच्या कालखंडाचे विषय आणि अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करणे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्यास किती वेळ द्यायचा, त्यानंतर कोणता विषय घ्यायचा याचा विचार करून वेळेची विभागणी करावी.
यानंतरची बाब म्हणजे दैनंदिन आणि आठवडय़ाभराचे नियोजन बनवावे. यात दररोज एक अथवा दोन विषय अभ्यासायचे की आठवडा तीन-तीन दिवसांत विभागून त्या तीन दिवसांत सुरुवातीला एक आणि नंतर एक असे दोन विषय अभ्यासायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस विभागून अथवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दररोज दोन तासांचा कालावधी निर्धारित करणे महत्त्वाचे आहे. त्याखेरीज नियतकालिके आणि भारत वार्षकिीसारख्या चालू घडामोडीवरील संदर्भाच्या वाचनासाठी (एकंदर चालू घडामोडीसाठी) वर्तमानपत्रांच्या वेळेशिवाय आठवडय़ातील एक दिवस राखीव ठेवावा.
नियोजन प्रक्रियेतील पुढील बाब म्हणजे केलेल्या अभ्यासाची व्यवस्थितपणे उजळणी होईल, याची हमी होय. अनेक विषय, विविध पुस्तके आणि वर्तमानपत्रे-नियतकालिकांचे वाचन करायचे असल्यामुळे अभ्यासून झालेला विषय त्यानंतर किमान दोन वेळा तरी पुन्हा वाचला गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी. व्यक्तीपरत्वे विषयाच्या उजळणीचे वेळापत्रक बदलू शकते. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेत उजळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्याशिवाय अभ्यासात नेमकेपणा व अचूकता, याची हमी देता येणार नाही. म्हणूनच पुरेशा उजळणीद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण करण्यावर भर द्यावा.
अभ्यासाच्या नियोजनात परीक्षेच्या स्वरूपानुसार सराव चाचण्या सोडवण्यासाठी वेळ राखीव ठेवणे निर्णायक ठरते. सराव चाचण्यांद्वारेच त्या त्या टप्प्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित करता येतात. आपल्या तयारीतील कच्चे दुवे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि अभ्यासात परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यामुळे जसजसा अभ्यास पूर्ण होत जाईल त्याप्रमाणे प्रारंभी विभागावर आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या सोडवाव्यात.
अभ्यासाचे नियोजन करताना मुख्य परीक्षेच्या तयारीनेच आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी. त्यानंतरच पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा. आपल्या अभ्यासात कोणत्याही एका विषयाला अनावश्यक जास्त वेळ किंवा कमी वेळ देणे शक्यतो टाळावे. त्या विषयाचे परीक्षेतील महत्त्व, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची संदर्भपुस्तके आणि संबंधित विषयासंदर्भातील आपली गती लक्षात घेऊनच प्रत्येक विषयास पुरेशा प्रमाणात वेळ निर्धारित करावा.
शेवटची बाब म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी आखलेले नियोजन हे ताठर स्वरूपाचे असू नये. प्रत्यक्ष तयारी करताना विचारात न घेतलेले मुद्दे लक्षात आल्यास त्यानुसार बदल करण्यासाठी नियोजनात लवचीकता हवी. मात्र ते अतिलवचीक दरदिवशी व आठवडय़ास बदलणारेही असू नये. थोडक्यात आपले नियोजन व्यावहारिक असावे याची खबरदारी घ्यावी.
अर्थात या लेखात मांडलेले मुद्दे म्हणजे अंतिम शब्द नव्हे, तर एक व्यापक मार्गदर्शक चौकट म्हणूनच त्याकडे पाहावे. अभ्यासास प्रत्यक्षपणे सुरुवात केल्यानंतर यातील बऱ्याच बाबी लक्षात येतील. आपापल्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करता येतील. कारण प्रत्येक व्यक्ती ही सारखीच असत नाही आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अमुक एक प्रारूपच अंतिम व प्रमाण मानता येत नाही. म्हणून स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि गरजा लक्षात घेऊन उपलब्ध वेळेचा कमाल व प्रभावी वापर होईल हे पाहावे.
प्रवेश प्रक्रिया
*   एम फिल आणि पीएचडीसाठी प्रवेश प्रक्रियेची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि किमान दोन राष्ट्रीय स्तरावरच्या त्यापैकी एक मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल.

*  एम फिल आणि पीएचडीसाठी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाईल. यूजीसी-नेट, यूजीसी-सीएसआयआर नेट, एसएलईटी/गेट किंवा टीचर फेलोशिपधारक किंवा एम.फिल पदवीधर उमेदवारांना प्रवेश परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे. * पात्र उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे दोन टप्प्यांत केली जाईल.
*  या प्रवेश परीक्षेत १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यात बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी एक गुण असेल.
* ५० टक्के प्रश्न हे संशोधन पद्धतीवर तर ५० टक्के प्रश्न हे उमेदवाराने निवडलेल्या विषयाच्या संबंधीने असतील.
* लेखी परीक्षेत उत्तीर्ण पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. उमेदवारामध्ये संशोधनाची क्षमता, प्रस्तावित संशोधन कार्याचा उपयोग शैक्षणिक संस्थांना अथवा विद्यापीठांमध्ये कसा होईल आणि या प्रस्तावित शोधामुळे संबंधित क्षेत्रातील नवीन अतिरिक्त ज्ञान मिळू शकेल का? या घटकांचाही मुलाखतीमध्ये विचार केला जाईल.
तुकाराम जाधव
First Published on February 7, 2017 5:08 am
Web Title: upsc preparation 8

Monday, March 6, 2017

संशोधनाचा राजमार्ग पीएचडी आणि एम फिलसाठी आता प्रवेशपात्रतेबरोबरच प्रवेशपूर्व परीक्षा असते.

संशोधनाचा राजमार्ग

पीएचडी आणि एम फिलसाठी आता प्रवेशपात्रतेबरोबरच प्रवेशपूर्व परीक्षा असते.

वर्षां फडके | February 7, 2017 5:05 AM


पीएचडी किंवा एम फिल म्हणजे फक्त पुस्तकी पदवी नाही. तुम्ही केलेल्या संशोधनाचा, त्यातील निरीक्षणांचा उपयोग जनहितासाठी व्हावा, अशी त्यामागची भावना असते. अलीकडे पीएचडी किंवा एम फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळेच पीएचडी आणि एम फिलसाठी बदललेले काही नियम समजून घेणे आवश्यक आहे.
पीएचडी आणि एम फिलसाठी आता प्रवेशपात्रतेबरोबरच प्रवेशपूर्व परीक्षा असते. तसेच प्रबंध सादर करण्याच्या कालमर्यादेत आणि लेखन पद्धतीत बदल झाला आहे. महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यासाठी विशेष मुदतवाढही देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार हे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील नियमावली आयोगाच्या ६६६.४ॠू.ूं.्रल्ल या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने पीएचडी ट्रॅकिंग सिस्टीम सुरू केल्यामुळे प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणे शक्य झाले आहे.
एम फिल प्रवेशासाठी पात्रता
* किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
* अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि १९ सप्टेंबर १९९१ पूर्वी पदव्युत्तर पदवी किंवा एम फिल अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत.
* पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष विदेशी विद्यापीठाचा पदवीधर उमेदवारही प्रवेशासाठी पात्र
पीएचडी प्रवेशासाठी पात्रता-
* किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा एम फिल अभ्यासक्रम अथवा समतुल्य व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
* अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि १९ सप्टेंबर १९९१ पूर्वी पदव्युत्तर पदवी किंवा एम फिल अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत.
* ज्या उमेदवारांच्या एम फिल शोध प्रबंधाचे मूल्यांकन झाले आहे, मात्र मुलाखत बाकी आहे, त्यांनाही पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.
*  एम फिलच्या समकक्ष विदेशी विद्यापीठाचा पदवीधारक उमेदवारही प्रवेशासाठी पात्र
अभ्यासक्रमाचा अवधी
एम फिल अभ्यासक्रमासाठी किमान दोन सत्र किंवा एक वर्षे आणि कमाल चार सत्र किंवा दोन वर्षे

पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त सहा वर्षांचा कालावधी महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना अभ्यासक्रम कालावधीत एम फिलसाठी एक वर्षे आणि पीएचडीसाठी जास्तीत जास्त दोन वर्षांची सवलत दिली जाईल.
 यूजीसीचा महिलांना दिलासा
एम फिल आणि पीएचडी करणाऱ्या अनेकींना गरोदरपणासारख्या कारणामुळे आपले संशोधन मध्येच सोडून द्यावे लागते. अशा वेळी त्यांनी त्याआधीपर्यंत केलेले कामही वाया जाते. हीच अडचण लक्षात घेऊन आयोगाने संशोधन पूर्ण करण्यासाठी महिलांना दोन वर्षांचा अतिरिक्त अवधी आणि २४० दिवसांची बाळंतपण तसेच अपत्यसंगोपनाची रजा देण्यात येणार आहे. याशिवाय पीएचडी किंवा एम फिल करताना महिलेला मूळ शहर काही कारणास्तव सोडावे लागले तरी संशोधनासाठी ती दुसऱ्या विद्यापीठात, त्याच आधारावर काही अटी-शर्तीच्या आधारे आपले संशोधन पूर्ण करू शकते.
एकूणच, संशोधनाच्या क्षेत्रात भरीव आणि महत्त्वपूर्ण योगदान मिळावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या नव्या नियमामुळे एम फिल आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता येणार आहे.
varsha100780@gmail.com
(लेखिका  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ साहाय्यक संचालक असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संपर्क अधिकारी आहेत.)
First Published on February 7, 2017 5:05 am
Web Title: new rules for award of mphil phd degrees