Monday, June 30, 2014

नवनीत शेवाळापासून जैवइंधन

नवनीत


शेवाळापासून जैवइंधन

Published: Tuesday, July 1, 2014
सध्या इंधनतेलाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे तेलाचा दुसरा कुठला तरी अवांतर स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, शेवाळाचा उपयोग या कामासाठी होऊ शकतो. सूक्ष्म शेवाळे प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड व पाणी वापरून इतकी कबरेदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने तयार करतात की त्यावर त्यांचे व समुद्रातील सर्व प्राण्यांचे पोट भरते. अगदी पृथ्वीवरच्या वनस्पतीप्रमाणे!
१९४२ पासून सूक्ष्म शेवाळे मोठय़ा प्रमाणावर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आतापर्यंत जवळ जवळ ३००० शेवाळाच्या जातींचे परीक्षण करण्यात आले असून त्यांमधील स्निग्धतेचा अंश कसा वाढवता येईल यावर काम सुरू आहे. पाण्याचे तापमान, त्यातील क्षार, रसायने, त्यात वाढणारे जीवजंतू व इतर सूक्ष्म गोष्टींवर त्यांची वाढ अवलंबून असते. शेवाळापासून किती व कशा प्रतीचे तेल मिळेल हे त्या शेवाळाच्या जातीवर, त्यांच्यामधील जनुकांवर व वातावरणाच्या परिणामावर अवलंबून असते. शेवाळे कुठेही वाढतात. त्यांना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सहसा शेवाळांची वाढ लहान-लहान तलावांत करतात. तलावांत विशिष्ट शेवाळाच्या जाती (उदा. Scenedesmus dimorphus,  Dunaliella tertiolecta,  Bacilliarophyta (diatom) वाढवतात. यातील काही शेवाळांमध्ये तर अनुकूल वातावरणात ३७ टक्क्यांपर्यंत तेल तयार होऊ शकते. असे म्हणतात की काही शेवाळांच्या जातीपासून दर वर्षांला एकरी ५००० ते १५००० हजार गॅलन इतके उत्पादन मिळू शकते. हे तेलबियापासून मिळणाऱ्या तेलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. शेवाळांना नेमके कोणते क्षार किती प्रमाणात घालावे की त्याची चांगली वाढ होईल ते शोधून काढावे लागते. काही शेवाळांना कबरेदके घालावी लागतात, तर काहींना सिलिकॉनची गरज असते. काही शेवाळे नायट्रोजनचा पुरवठा कमी केला की जास्त मेदाम्ले बनवितात. शेवाळांची वाढ झाली की पाण्यामधून निथरून मगच त्यापासून तेल काढावे लागते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या ढेपेत खूप प्रथिने असतात व ती पूरक खाद्य म्हणून वापरता येतात. हे तलाव उघडे असतात. त्यामुळे त्यावरील वातावरणावर अंकुश ठेवणे व वाढ होणाऱ्या शेवाळाच्या प्रतीची शुद्धता ठेवणे कठीण जाते. सध्या तर शेवाळाची जनुके बदलण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे.
डॉ. जयश्री सनिस (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नवनीत कुतूहल: इथेनॉल व जैववायू (बायोगॅस) इंधन

नवनीत


कुतूहल: इथेनॉल व जैववायू (बायोगॅस) इंध

Published: Monday, June 30, 2014
कोणती कबरेदके वापरली तर कशी दारू मिळेल याचे ज्ञान माणसाला अनादी कालापासून अवगत आहे आहे. या दारूत इथेनॉल नावाचा महत्वाचा घटक असतो. विविध वनस्पतीजन्य शर्कारामय कबरेदके आंबवून इथेनॉलची निर्मिती करता येते. त्यासाठी यीस्टचा उपयोग करतात. पेट्रोलमध्ये विविध प्रमाणात इथेनॉल मिसळून अमेरिकेत व ब्राझीलमध्ये मोटारी चालवतात. हे इथेनॉल कसावा, बटाटे, मका, ऊस यांपासून बनवितात. इथेनॉलवर चालण्यासाठी मात्र इंजिनात थोडा बदल करावा लागतो.
कुठल्याही जैव वस्तुमानाचे जेव्हा प्राणवायूशिवाय विघटन होते तेव्हा मिथेन, कार्बन मोनॉऑक्साइड, व हायड्रोजन इत्यादी ज्वालाग्राही वायू निर्माण होतात व ते नसíगक वायूप्रमाणे इंधन म्हणून वापरता येतात. साधारणत जैववायू शेणापासून तयार होतो. जैववायूपासून वीज निर्मिती सुद्धा होते. शिवाय वाहने चालवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. कुठल्याही टाकाऊ जैववस्तुमानापासून किवा शेणापासून निर्माण झालेला जैववायू(बायोगॅस) इंधन म्हणून तर कामाला येतोच, पण त्यामुळे वातावरणाचे प्रदूषणही कमी होते. जिथे जिथे कबरेदके असतील ती सर्व कबरेदके जैववायू निर्मितीसाठी वापरता येतात. ही आंबवण्याचीच क्रिया असते, फक्त यात वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव निराळे असतात.
भाभा अणुशक्ती केंद्राने मुंबईत एका 'निसर्गऋण संयंत्रा'ची कल्पना राबविली आहे. यात स्वयंपाकघर, दवाखाने व हॉटेल यांमधील घनजैव कचरा तसेच कागद, गवत, बगास्से, जंगली वनस्पती वगरेपासून जैववायू निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. यापासून प्रथम नसíगकरीतीने विघटन होणारा कचरा वेगळा केला जातो आणि त्याचे एका पातळ पेस्ट(स्लरी)सारख्या पदार्थात रुपांतर करतात. त्याचे पहिल्यांदा प्राणवायूच्या समवेत व नंतर प्राणवायूच्या शिवाय विघटन करण्यात येते. यासाठी वेगवेगळे सूक्ष्मजंतू वापरले जातात. प्राणवायूच्या समवेत होणाऱ्या विघटनात तापमान वाढवण्यासाठी सौरऊर्जा वापरतात. या प्रक्रियेपासून मिथेन, कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकले जातात. शिवाय उरलेले पाणी परत वापरता येते. मिथेन जळणासाठी किंवा विद्युत निर्मितीसाठी वापरता येतो. विघटन न झालेले सर्व वस्तुमान खत म्हणून वापरता येते. प्राणवायू समवेत जैव कचऱ्याचे विघटन करण्याची प्रक्रिया प्राण वायूशिवाय होणाऱ्या विघटनापूर्वी करणे हा मोठा फरक इतर जैववायू प्रकल्पात आणि निसर्गऋण प्रकल्पात आहे.

Sunday, June 29, 2014

नवनीत कुतूहल: जैवइंधन - बायोडिझेल

नवनीत


कुतूहल: जैवइंधन - बायोडिझेल

Published: Saturday, June 28, 2014
बायोडिझेल आणि पेट्रोडिझेल हे दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत. खनिज तेलापासून मिळवलेल्या डिझेलला पेट्रोडिझेल म्हणतात, तर बायोडिझेल हे वनस्पती किंवा प्राण्यांमधील स्निग्ध पदार्थापासून तयार करता येते. बायोडिझेल बनविण्यासाठी जे तेल वापरतात ते सोयाबीन, रेपसीड, जट्रोपा, पाम, जवस, सूर्यफूल, नारळ, करंजा, मका, शेंगदाणे, सरकी, मोहरी इत्यादींपासून मिळवतात. अगदी तळणाचे तेलसुद्धा चालते. याशिवाय प्राणी, अगदी गटारात जगणारे जीवजंतू, शेवाळ वगरेमध्ये असलेल्या स्निग्धांशापासून पण बायोडिझेल बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 या तेलापासून डिझेल मिळवण्यासाठी त्यावर बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात. या तेलात ट्रायग्लिसराइड हे रसायन असते. ट्रायग्लिसराइड हा एक ग्लिसरॉलचा रेणू व तीन मेदाम्लांचे रेणू याचा संयोग होऊन बनलेले असते. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या मेदाम्लात साधारणत: १६-१८ कार्बनचे अणू असलेल्या साखळ्या असतात. ट्रायग्लिसराइडमधली तीन मेदाम्लेपण सारखी नसतात. यातली काही मेदाम्ले असंपृक्त असतात व त्यामुळे त्यात हायड्रोजनचे प्रमाण कमी असते. पेट्रोडिझेलमध्ये संपृक्त मेदाम्ले असतात. त्यात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे त्याची प्रत चांगली असते. शिवाय त्यामुळे त्यांच्या गुणधर्मात थोडा फरक असतो. बायोडिझेलमध्ये सल्फर कमी असते व प्राणवायू जास्त असतो. बायोडिझेलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते. अल्कली वापरून ट्रायग्लिसराइडचे विघटन करतात. त्यामधून ग्लिसरॉल हा जास्त घनता असलेला पदार्थ वेगळा करतात व कमी घनता असलेल्या मेदाम्लाचे मिथेनॉल याबरोबर संयोग करून बायोडिझेल बनवितात.
वनस्पती आणि प्राणी यांमध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ आढळतात. प्राण्यात कोलेस्टेरॉल तर वनस्पतीत मेणासारखे पदार्थ असतात. निरनिराळ्या तेलातील वेगवेगळ्या स्निग्ध पदार्थामुळे व मेदाम्लांमुळे बायोडिझेलची प्रत थोडी वेगळी असते.
१९०० मध्ये रुडोल्फ डिझेल याने डिझेल इंजिन शेंगदाण्याच्या तेलावर चालवून पाहिले होते. आता परत वनस्पती तेलावर इंजिन चालवायची वेळ आली आहे!

Friday, June 27, 2014

नवनीत कुतूहल: जैवइंधन

नवनीत


कुतूहल: जैवइंधन

Published: Friday, June 27, 2014
जैवइंधन म्हणजे जिवंत वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळवलेले इंधन. वनस्पती आणि प्राणी मुख्यत: कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन व थोडय़ा प्रमाणात इतर खनिज यांपासून बनलेले असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, जमिनीतील पाणी आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा वापरून वनस्पती, शेवाळे आणि इतर हरित वनस्पतीसारखे जिवाणू प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे शर्कारामय कबरेदके तयार करतात. ही कबरेदके त्या वनस्पतींच्या स्वत:च्या वाढीसाठी व संवर्धनासाठी उपयोगात येतात व त्यातूनच प्राणिजगतासाठी अन्नपुरवठा होतो. ह्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेतून निर्माण झालेल्या कबरेदकांपासून जैववस्तुमान तयार होते. जैवइंधनात जैववस्तुमान, जैवतेल व जैववायू यांचा समावेश असतो. जैववस्तुमानावर जीवरासायनिक प्रक्रिया वापरून इथेनॉल म्हणजेच दारू व तत्सम इतर रसायने पण निर्माण होऊ शकतात. त्यातील काही रसायनेही इंधन म्हणून वापरता येतात.
सध्याची पेट्रोरासायनिक खनिज तेलेसुद्धा प्राणी आणि वनस्पतीपासून तयार झालेली आहेत व ती एक प्रकारची जैवइंधनेच म्हणता येतील. फक्त ही खनिजतेले हजारो-लाखो वर्षांपूर्वी सडलेल्या व पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या प्राणी आणि वनस्पती यांवर तेथील उष्णतेच्या व दबावामुळे झालेल्या रासायनिक प्रक्रियेपासून तयार झालेली असतात. रूढार्थाने मात्र केवळ सध्याच्या काळात जगत असलेल्या वनस्पतीपासून जी इंधने तयार होतात त्यालाच 'जैवइंधन' असे म्हणतात.
अगदी पुराणकाळापासून जेव्हा माणसाने अग्नीचा शोध लावून शिजलेले अन्नप्राशन करण्यास सुरुवात केली तेव्हापासून तो आजपर्यंत इंधनाची गरज सतत वाढत गेली आहे. सुरुवातीला लाकडे जाळून माणसाची इंधनाची गरज भागत होती. पण प्रगती होत गेली तसतशी त्याची ऊर्जेची गरज वाढत गेली. जेव्हा पृथ्वीच्या पोटातील खनिजतेलांच्या साठय़ाचाही शोध लागला नि माणसाची कार्यक्षमता आणि गती अमर्याद वाढली.
अलीकडे इंधनाच्या उपलब्धीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे अनुमान आहे की खनिजतेलाचे व कोळशाचे साठे  ५०-६० वर्षांपेक्षा जास्त पुरणार नाहीत. हे साठे संपतील तसे त्याच्यावरून लढाया होतील! आपण आता जर खनिज तेल व कोळशाला पर्याय शोधला नाही तर आपल्या पुढील पिढय़ांसाठी इंधनसाठा शिल्लक राहणार नाही.

नवनीत- कुतूहल: ट्रान्सफॉर्मरमध्ये SF6 वायू

नवनीत

कुतूहल: ट्रान्सफॉर्मरमध्ये SF6 वायू

Published: Thursday, June 26, 2014
महानगरामधील प्रमुख बाजारपेठांच्या भागात विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात असून दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी विद्युत कंपन्यांना 'विद्युत उपकेंद्र' उभारावे लागते. त्यासाठी लागणारी जागा अशा भागात मिळणे कठीण  व खर्चीक असते. अशा ठिकाणी गॅस इन्सुलेटेड सब-स्टेशन (GIS) उभारून सल्फर हेक्झाफ्लोराइड (SF6)वायूच्या वापरामुळे नेहमीच्या उपकेंद्रापेक्षा २५% जागेत पूर्तता करता येते.
का बरं या उपकरणात सल्फर हेक्झाफ्लोराइड वापरत असावेत?
सल्फर हेक्झाफ्लोराइड या वायूचे संयुगसन १९०० मध्ये मौसन व प्लीबी या शास्त्रज्ञांनी पॅरिसमध्ये केले. या वायूचे विद्युतरोधक गुणधर्म १९३७ मध्ये जनरल इलेक्ट्रिकमधील संशोधकाच्या     लक्षात आले. १९४७ मध्ये या वायूचा वापर विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये तेलाच्या ऐवजी केला गेला. पुढे १९६४ मध्ये पॅरिसमध्ये प्रथमत: हा वायू वापरून जीआयएस उभारण्यात आले. आज जगभरातील महानगरांमध्ये, डोंगर-दऱ्यात जेथे विद्युत उपकेंद्रासाठी पुरेशी, योग्य जागा मिळणे खर्चीक होते, अशा ठिकाणी जीआयएस पद्धतीचे उपकेंद्र वापरले जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भांडुप, कोयना टप्पा-४ येथे अशा प्रकाराची उपकेंद्रे आहेत.
सल्फर हेक्झाफ्लोराइड हा वायू हवेपेक्षा वजनाने सुमारे सहापट जड आहे. हा वायू रंगहीन, चवहीन असून बिनविषारी, अज्वालाग्राही आहे. अतिप्रखर उष्णतेमध्ये सल्फर हेक्झाफ्लोराइडचे सल्फर टेट्राफ्लोराइड (SF4) व सल्फर डायफ्लोराइड (SF2)मध्ये विघटन होते. हेही वायू विद्युतरोधक आहेत. तपमान कमी झाल्यावर त्यांचे पुन्हा संयोजन होऊन सल्फर हेक्झाफ्लोराइड बनतो.  ५०० अंश सेल्सियस तपमानापर्यंत या वायूचे विघटन होत नाही. हायड्रोजन, क्लोरिन, प्राणवायू व आम्ले यांचा सल्फर हेक्झाफ्लोराइडवर परिणाम होत नाही. रासायनिकदृष्टय़ा हा वायू जवळजवळ निष्क्रिय आहे. या वायूवरील दाब वाढविला असता त्याचे विद्युतरोधक गुणधर्म वाढतात. त्यामुळे जीआयएसमधील उपकरणात सामान्य वातावरणीय दाबाच्या सहा ते सातपट दाब राखला जातो. त्यामुळे दोन विद्युतभारित तारांमधील अंतर अतिशय कमी ठेवून सुरक्षा राखता येते. उच्च दाबाच्या स्विचेसमध्ये जेव्हा विद्युतप्रवाह बंद होतो, तेव्हा मोठय़ा प्रमाणात विजेच्या ठिणग्या निर्माण होतात. त्याचे त्वरित खंडन करण्यासाठी अशा स्विचेसमध्ये अधिकतम दाबाचा सल्फर हेक्झाफ्लोराइड वायू वापरला जातो.

नवनीत - कुतूहल - पॉपकॉर्नचा वास

नवनीत

कुतूहल - पॉपकॉर्नचा वास

Published: Wednesday, June 25, 2014
आजकाल साधारणपणे जेवणातल्या डिशेसमध्ये मका असतो. मक्यामध्ये काबरेहायड्रेट्स अन्न विपुल प्रमाणात असते, शिवाय त्याच्या दाण्याभोवती असलेले सेल्युलोजचे आवरण न पचणारे असते, त्यामुळे पचनमार्ग साफ ठेवायला मदत होते. मक्यापासून तयार केलेला पॉपकॉर्न हा पदार्थ तर मुलाबाळांचा नि तरुणाईचा आवडता पदार्थ होय. त्यातच लोण्यांत तयार केलेल्या पॉपकॉर्नची मजा काही वेगळीच असते, पण सावधान, बरं का!
कृत्रिम लोण्याचा थर दिलेल्या पॉपकॉर्नला खमंग वास येतो ना, त्याने 'पॉपकॉर्न लंग' ही व्याधी जडू शकते. आपल्या श्वासातून हा हवाहवासा गंध फुफ्फुसात जातो तेव्हा त्यासोबत एक रसायन आपल्या पोटात जाते. त्याचे नाव 'डायअ‍ॅसिटील' होय. वास्तविक, हे नसíगक रसायन लोण्याचा एक घटक असतो व तो दूध, लोणी, मस्का, चीज, बीअर, वाइन यांत सापडतो. या मूळ पदार्थातील त्याचे अस्तित्व मुळीच हानिकारक नसते. त्याचे रासायनिक सूत्र आहे H3COOCH3.. पण, हे रसायन वायुरूपात फुफ्फुसात घुसते तेव्हा तिथल्या लघुश्वासनलिकांना इजा पोहोचते. त्या खराब झालेल्या फुफ्फुसाच्या नळ्या कायमस्वरूपी निकामी होतात. त्याला 'ब्रोंकाओलिसीस अ‍ॅब्लिटेरंस' असे म्हणतात.
तुम्हाला पॉपकॉर्नची प्लास्टिक थली हुंगण्याची सवय असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे, हे लक्षात घ्यावे. पॉपकॉर्न भाजणारे विक्रेते आणि पॉपकॉर्नच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांना फुफ्फुसाच्या आजाराचा धोका असतो. दिवसातून दोन वेळा मक्यापासून तयार होणाऱ्या लोणीयुक्त पॉपकॉर्नच्या पिशव्या हजम करणाऱ्यांनी सावधानता बाळगलेली बरी. त्याचप्रमाणे, चित्रपटगृहातील विक्रेतीमुलेसुद्धा या मक्याच्या पदार्थाच्या सतत सान्निध्यात राहिल्याने आपले स्वास्थ्य बिघडवू शकतात.
घरी पॉपकॉर्न तयार करताना एक खबरदारी घेता येते ती म्हणजे ओव्हनमध्ये भाजलेल्या नि फुललेल्या मक्याच्या लाह्य़ा द्रवरूप लोणी लावून खात मजा लुटता येते. शिवाय भाजलेले मकेदेखील खायला चविष्ट असतात, त्याला पसंती दिली तर उत्तमच.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

नवनीत कुतूहल - फळे पिकविणारी रसायने

नवनीत


कुतूहल - फळे पिकविणारी रसायने

Published: Tuesday, June 24, 2014
झाडावरचे फळ पक्व होते तेव्हा त्यातील काबरेहायड्रेट अन्नाचे शर्करेत रूपांतर होते व आपल्याला गोड-मधुर फळे चाखायला मिळतात. काही फळे ही विशिष्ट हंगामातच मिळतात. पक्व झालेल्या फळात इथिलिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होते व ते फळ पिकविण्यास हातभार लावते. एखादे पक्व  झालेले फळ तयार फळांच्या सान्निध्यात ठेवले की इतर फळे तुलनेत लवकर पिकतात. कारण पक्व फळातील इथिलिन वायू त्यांच्या पिकण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतो. कित्येकदा एखाद्या फळाच्या हंगामाच्या आधी आपणास ती फळे बाजारात दिसू लागतात. ती दिसायला आकर्षक असतात, पण चव योग्य नसते. कारण ती कृत्रिमरित्या पिकविलेली असतात. निसर्गत: पिकलेली फळे फारशी टिकत नाहीत, पण कृत्रिमरित्या पिकविलेली फळे बराच काळ टिकतात. त्यांचे रंग आकर्षक असतात. ती टवतवीत वाटतात. ही सारी त्यांच्यावर प्रयोग केलेल्या रसायनांची किमया असते. फळे पेटीत ठेवून त्यांच्यावर इथिलिन वायूचा फवारा दिला की ती जलद पिकतात. काही वेळा असिटिलीनचा वापर करतात. केळी, आंबे ही फळे खोलीत बंद करून या रासायनिक वायूचा मारा केला की, ती अपरिपक्व फळे पिकल्यासारखी होतात. त्यांचा रंग पिवळाधमक किंवा लालभडक होतो. ती दिसायला आकर्षक होतात. त्यामुळे, गिऱ्हाईकांच्या तोंडाला पाणी सुटते खरे, पण चवीच्या बाबतीत ती निराश करतात. कारण ती चवीला गोड नसतात. फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या रसायनाचा देखील वापर होतो. ते फळावर लावले असताना हवेतील बाष्प शोषते व रासायनिक क्रिया होऊन असिटिलीन वायू मुक्त होतो. हा वायू फळांना पिकवतो. फळे व भाज्यांना रंग देण्यासाठी सुदानरेड, मेथॅनॉल, यलो लेड क्रोमेट या रंगीत रसायनांचा सर्रास वापर होतो. फळांना त्यांची इंजेक्शने टोचली जातात. ही इंजेक्शने फळे आणि भाज्या आकर्षक दिसल्या तरी पक्व नसतात. त्यात नसíगकरित्या शर्करा तयार झालेली नसते.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

के.जी. टू कॉलेज 'एमपीएससी'च्या अध्यक्षपदी व्ही.एन. मोरे

के.जी. टू कॉलेज


'एमपीएससी'च्या अध्यक्षपदी व्ही.एन. मोरे

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी व्ही. एन. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे यापूर्वी अध्यक्ष सुधीर ठाकरे निवृत्त झाल्यापासून गेले महिनाभर हे महत्वाचे पद रिक्त होते. अखेर आज  परिवहन आयुक्त व्ही.एन. मोरे यांची तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

के.जी. टू कॉलेज 'टीवायबीकॉम'चा निकाल जाहीर

के.जी. टू कॉलेज


'टीवायबीकॉम'चा निकाल जाहीर

Published: Friday, June 27, 2014
मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉमच्या मार्च महिन्यात घेतलेल्या सहाव्या सत्राच्या परीक्षांचा निकाल गुरूवारी रात्री उशीरा जाहर झाला. हा निकाल ७३.७१ टक्के लागला आहे. या परीक्षेला ६३ हजार ७३७ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४६ हजार ८३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Sunday, June 22, 2014

गंध पावसाचा- जिओस्मिन

गंध पावसाचा- जिओस्मिन

Published: Monday, June 23, 2014
पावसाळ्याला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा पहिल्या पावसाच्या सरी बरसतात आणि वातावरणात मातीचा एक वेगळाच गंध पसरतो. हा वास काही पावसाच्या थेबांचा नसतो तर अनेक रसायनांच्या मिश्रणाचा तो वास असतो. या वायूंच्या मिश्रणात ओझोन वायूचा समावेश असतो. वातावरणाभोवतीचा संरक्षक थर हा ओझोन वायूचा असतो. विजेच्या चमचमाट होतो तेव्हा हवेतील ऑक्सिजनचे (ड2) ओझोनमध्ये (ड3) रूपांतर होते. कोरडय़ा हवामानात पाऊस येतो तेव्हा जो वास सुटतो त्याला 'पेट्रीकोर' असे संबोधितात. 'पेट्रीकोर' हा शब्द ज्या गंधासाठी वापरतात तो गंध 'जिओस्मिन' या रेणूपासून येत असतो. 'जिओस्मिन' हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ 'पृथ्वीचा वास' असा आहे. हा वासयुक्त रेणू स्ट्रिप्टोमायसेस या जीवाणूत आढळतो. हे जीवाणू मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरातून हा रेणू उत्सर्जति होत असतो. हा रेणू एकप्रकारे बायसायक्लिक अल्कोहोल असून त्याचे रासायनिक सूत्र  उ12ऌ22ड  असे आहे. मानवी नाकाला या रेणूचा वास ५ पी.पी.एम (दशलक्षांश भाग) इतक्या कमी पातळीवर जाणवू शकतो. अन्नात जिओस्मिनचे अस्तित्व असेल तर तो अन्नाची चव बिघडवतो. बीटसारख्या पदार्थात तसेच गोडय़ा पाण्यातील माशात या रेणूचा अंश असतो. हे अन्न शिजविताना त्यात आम्लीय घटक वापरले तर जिओस्मिन वासरहित होते.
पावसाच्या सरीनंतर येणारा वास हा केवळ ओझोन आणि जिओस्मिनमुळेच येतो असे नव्हे तर तो सुगंध वनस्पती तेलापासूनसुद्धा येतो. हा संशोधकांना लागलेला नवा शोध आहे. पावसाआधीच कोरडय़ा वातावरणात काही वनस्पती तेलाचा अंश मुक्तकरतात. ती तेले सभोवतालच्या मातीत किंवा चिकणमातीत शोषली जातात. ही तेले जमिनीत पडलेल्या बियांचे रुजणे थोपविण्यासाठी असतात. अपुऱ्या पाण्याअभावी जर बिया रुजल्या तर त्यांची वाढ नीट होऊ नये, ही त्यामागची नसíगक योजना असते. हुंगावासा वाटणारा पहिल्या पावसानंतर येणारा मातीच्या वासाची ही पाश्र्वभूमी होय.

नवनीत कुतूहल: सिगारेटचा धूर

नवनीत

कुतूहल: सिगारेटचा धूर

Published: Friday, June 20, 2014
धूम्रपानाचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तंबाखूयुक्त सिगारेटच्या धूम्रपानाने स्वास्थ्याला धोका असतो व त्यासंबंधी सूचना देणाऱ्या जाहिराती ठायी ठायी नजरेस पडतात. तंबाखूतील निकोटीन हे रसायन, मानसिक उभारी देणारे (सायकोअ‍ॅक्टिव) असते व त्यामुळे सिगारेटचे व्यसन जडते. सिगारेट ओढणाऱ्यांचे आयुर्मान साधारण १४ वर्षांनी कमी होते. गर्भवती बाईने सिगारेटी फुंकल्यास विकृती असलेले बाळ जन्माला येते. त्यात कमी वजन, शारीरिक व्यंग, अकाली जन्म यांचा समावेश असतो. सिगारेटच्या तंबाखूत प्रोपेलिन ग्लायकोल, ग्लिसरॉल यांसारखे आद्र्रता टिकविणारे पदार्थ, सुगंधित द्रव्ये इ. मिसळलेले असतात.
प्रत्यक्ष धूम्रपान करणाऱ्याइतकाच अप्रत्यक्ष धूर पोटात जाणाऱ्यांनादेखील या धुरातील घातक रसायनांचा फटका बसतो. त्यासाठीच तर गाडीघोडय़ातील प्रवासात तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला मज्जाव असतो. धूम्रपानाचे इशारे तर सर्वत्र झळकत असतात. इतके असूनही काही शौकीन मंडळी या व्यसनाच्या आहारी गेलेली आढळतात.
त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ी-्रूॠं१ी३३ी२ किंवाी-्रूॠ२) चा शोध लागलेला आहे. विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या या सिगारेटमधून धूर येत नाही, विशिष्ट प्रमाणातले निकोटिन (तंबाखूमधले नशा देणारे रसायन) धूम्रशौकीनांच्या पोटात जाते. आजूबाजूच्यांना त्याचा कोणताच त्रास होत नसतो.
नव्या शोधांनुसार या सिगारेटमध्ये तंबाखूतले कर्कप्रेरकी असतातच पण त्याव्यतिरिक्त एरवीच्या तंबाखूत न आढळणारी घातक रसायनेदेखील त्यात असतात. तंबाखूत चार प्रकारची नायट्रोसामाइन गटातील रसायने असतात आणि ती कर्कप्रेरकी असतात. तंबाखूत एन- नायट्रोसोनिकोटिन (ठठठ) एन-नायट्रोसोनबेसिक (ठअइ) एन-नायट्रोसोअनाटॅब्बाईट (ठअळ) आणि ४ (मिथाईल नायट्रोसो)-१- (३ पायरीडिल -१ ब्युटेनॉन (ठठङ) ही ती विषारी रसायने होत. ई-सिगारेट्मध्ये तर यांच्या व्यतिरिक्त फॉर्मोल्डिहाइड, 'असिटाल्डिहाइड आणि अक्रोलिन यांसारखी कबरेलीन संयुगे आढळली आहेत. या ई-सिगारेटमधून उत्सर्जति होणारी ग्लिसरॉल आणि प्रोपिलिन ग्लायकोल ही बाष्परूपातील रसायने फारशी अपायकारक नसतात, पण त्यातून बाहेर पडणाऱ्या कॅडमियम, शिसे आणि निकेल या धातूंच्या वाफा संशोधकांना चिंताजनक वाटतात. साधारण सिगारेटमध्ये ही रसायने नसतात. त्यातच ई-सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवणारे कायदेकानून अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील नाहीत. भविष्यातला धोका ई-सिगारेटचाही आहे

नवनीत - कुतूहल: कार्बन डायऑक्साइडची विषबाधा

नवनीत - कुतूहल: कार्बन डायऑक्साइडची विषबाधा

कुतूहल: कार्बन डायऑक्साइडची विषबाधा
Published: Saturday, June 21, 2014
आपल्या श्वासोच्छ्वासात कार्बन डायऑक्साइड हा वायू असतो. वनस्पती या वायूचा वापर करून शर्करा तयार करीत असतात. आपल्या श्वसनातील बायप्रोडक्ट म्हणून हा कार्बन डायऑक्साइड वायू आपण श्वासातून मुक्त करतो. वातावरणात वावरणारा कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायूच्या रूपात असतो. तो वायू सोडा वॉटर, थंड पेयांत वापरतात. याच्यापासून कोरडा बर्फ तयार करून औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो. हा वायू विषारी आहे का, अशी शंकाही आपल्याला येत नाही. पण खरंच तो विषारी आहे? साधारणत: कार्बन डायऑक्साइड वायू विषारी नसतो. आपल्या पेशीतील ज्वलनातून मुक्त झाला की तो रक्तप्रवाहात घुसतो. मग फुप्फुसातून बाहेर पडतो. तरीही तो शरीरभर वावरत असतो.
परंतु जर का आपल्या श्वसनात तो मोठय़ा प्रमाणात आला किंवा आपण प्लास्टिक बॅग किंवा एखाद्या तंबूत वास्तव्य करून पुन:पुन्हा श्वास घेतला आणि जर वायुविजनची सोय नसेल तर या वायूने विषबाधा होऊ शकते. कार्बन डायऑक्साइड वायूच्या विषबाधेचा ऑक्सिजन वायूच्या प्रमाणाशी संबंध नसतो. श्वसनातून पुरेसा ऑक्सिजन मिळत असला तरी कार्बन डायऑक्साइडच्या रक्तातील व ऊतीतील अवाजवी प्रमाणाने काही दुष्परिणामांना तोंड द्यावे लागतेच. रक्तदाबातील वाढ, डोकेदुखी, त्वचेचे फुगणे आणि स्नायूचे आखडणे या त्रासांचा भडिमार होतो. त्याचे प्रमाण वाढले तर हृदयक्रिया अनियमित होणे, जीव घाबरणे, उलटय़ा होणे, बेशुद्ध होणे किंवा मृत्यू येणे या विपरीत गोष्टी घडू शकतात. या विषबाधेला 'हायपर कॅप्निया' किंवा 'हायपर कार्बयिा' असे नाव आहे. शरीरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अती प्रमाणात वाढले आणि या वायूचा शरीराशी दीर्घकाळ संपर्क आला की वरील जैवरासायनिक प्रक्रिया घडतात. त्यास कारणीभूत ठरणाऱ्या काही बाबी म्हणजे फुप्फुसाचे विकार, बेशुद्ध अवस्था, कमी वायुविजन, निद्राविकारावर ऑक्सिजनचा उपाय करतो त्या वेळचा प्रारंभीचा परिणाम, ज्वालामुखीच्या उद्रेकातील वायू श्वासात जाणे, श्वास रोखून धरणे, कमी दाबाच्या हवेत वावरणे (उदा. अंतराळ, खाणी, बोगदा, बंदिस्त खोली.) इत्या

युजीसीचा आदेश दिल्ली विद्यापीठाने डावलला

युजीसीचा आदेश दिल्ली विद्यापीठाने डावलला

Published: Monday, June 23, 2014
विद्यापीठ अनुदान आयोगाने(युजीसी) सर्व महाविद्यालयांना तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबवण्यास सांगितलेले असताना दिल्ली विद्यापीठाने मात्र हा आदेश मोडीत काढून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबवला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यार्थ्यांना बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम यांसारख्या पदवीसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असून त्यात एक मुख्य विषय असणार आहे. दिल्ली विद्यापीठाने काढलेल्या निवेदनानुसार त्यांचा निर्णय हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आहे. अधिसभेत याबाबतचा ठराव ८१ विरुद्ध १० मतांनी मंजूर करण्यात आला. चौथे वर्ष हे वैकल्पिक असून ज्या विद्यार्थ्यांना, बी.ए., बी. एस्सी. ऑनर्स, बी. कॉम. ऑनर्स व बी.टेक. ऑनर्स करायचे आहे त्यांनी चौथे वर्ष पूर्ण करावे, असे विद्यापीठाचे म्हणणे आह़े

Thursday, June 19, 2014

नवनीत कुतूहल - हायड्रोजन वायू (H2)

नवनीत

Published: Wednesday, June 18, 2014
इंधनांची वानवा होत चालली आहे. त्यामुळे दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला हा स्फोटक वायू इंधन म्हणून वापरता येईल किंवा कसे? त्यावर विचार चालू आहे. खनिज तेल, कोळसा, लाकूडफाटा या इंधनांमुळे हवेचे प्रदूषण घडते व जागतिक स्तरावर वातावरण बदलत जाते. याउलट वाहतुकीसाठी गाडय़ांच्या इंजिनात हायड्रोजन वायूचा वापर केला तर केवळ ऑक्सिजन वायू व बाष्पाची निर्मिती होते. हे दोन्ही घटक वातावरणाला बाधा आणणारे नाहीत.
निसर्गातील आम्ल-अल्कलीचा समतोल राखण्यास हायड्रोजनचा हातभार लागतो. कारण त्याचा अणू निरनिराळ्या परिस्थितीत धनभार वा ऋणभार धारण करू शकतो. हायड्रोजनचा समस्थानिक असलेल्या प्रोटियम या मूलद्रव्यात एक प्रोटॉन असतो व न्यूट्रॉन नसतो. त्याचे हे एक अणुरूप या विशाल विश्वात मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहे. ताऱ्यांमध्ये हा वायू प्लाझ्माच्या रूपात असतो. हेन्री स्कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने १७६६-८१ च्या दरम्यान धातूवर आम्लाची प्रक्रिया करून या वायूची निर्मिती केली होती. औद्योगिक क्षेत्रात नसíगक वायूपासून त्याची उत्पत्ती होते.
परंतु हायड्रोजन वायूचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून तो 'फ्युएल सेल'द्वारा दूरवर पसरवलेल्या ग्राहकांना पुरवणे खíचक असते. 'फ्युएल सेल'ची अवास्तव किंमत आणि हायड्रोजन वायूची वितरण करणारी यंत्रणा या दोन समस्या मोठय़ा जिकिरीच्या ठरत आहेत. जनरल मोटार, टॉयोटा, होंडा या दादा कंपन्या मात्र हायड्रोजन वायूवर धावणाऱ्या गाडय़ा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच भरपूर खर्च आणि कमी मागणी त्यामुळे पेट्रोल पंपावर हायड्रोजन वायूच्या वितरणाची यंत्रणा बसवून घ्यायला वितरक नाखूश असतात.
हायड्रोजन वायू एक तर खनिज तेलांतून मिळवला जातो किंवा खनिज इंधनाद्वारे घडवून आणल्या जाणाऱ्या विद्युतप्रक्रियांतून निर्माण केला जातो. त्यामुळे या निर्मितीत नकळत हवेचे प्रदूषण होत राहतेच. त्यामुळे जल-वायू-सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून हायड्रोजन वायूची निर्मिती करता आली तरच या वायुरूप इंधनाची 'क्लीन फ्युएल' म्हणून प्रशंसा होईल.
हायड्रोजन वायूचा वाहनातील इंधन म्हणून वापर करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न चालू आहेत. 'मोअर िथग्स चेंज मोअर दे स्टे', हीच गत हायड्रोजन इंधनाबाबत होत आहे.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

कुतूहल - कार्बन मोनॉक्साईड (CO)

कुतूहल - कार्बन मोनॉक्साईड (CO)

Published: Thursday, June 19, 2014
वातावरणातील कार्बन डायॉक्साईड (CO2)चा दबदबा वाढल्यामुळे की काय, आपण त्याच्या धाकटय़ा भावंडाकडे म्हणजे कार्बन मोनॉक्साईड (CO)कडे कानाडोळा केलेला आढळतो. पण हा एक अल्प प्रमाणात वावरणारा घातक वायू आहे.
एका गॅरेजमधल्या मेकॅनिकला एकदा दुपारची वामकुक्षी घ्यायची होती म्हणून गिऱ्हाईकाच्या गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू करून आरामात आत पहुडला. त्याला मस्त झोप लागली खरी, पण त्याच्या गाडीतल्या आतल्या वातावरणात जमा झालेला कार्बन-मोनॉक्साईड वायू वातानुकूलित यंत्रणेच्या हवेत फिरत राहिला. तो त्या मेकॅनिकच्या शरीरात गेला. तो बिचारा मेकॅनिक झोपेतून उठलाच नाही. आपल्या बेडरूममध्ये वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) सुरू असेल तर मेणबत्ती मुळीच लावू नये. मेणबत्ती अर्धवट जळत असताना आजूबाजूला कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जति होतो.
कार्बन मोनॉक्साईड जेव्हा फुप्फुसात घुसतो तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो. त्यामुळे शरीरभर एरवी ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनसोबत हा घातक वायू शरीरपेशीत पोहोचतो. शरीरपेशी ऑक्सिजनला वंचित होतात व माणसाला 'हायपोक्सिया' ही व्याधी जडते.
शरीरात कार्बन मोनोक्साईड असेल तर डोकेदुखी, मळमळ, थकवा ही फ्ल्यू तापासारखी लक्षणे आढळतात. जसे त्याचे प्रमाण वाढत जाते तसतशी मन:स्थितीचा गोंधळ, अशक्तपणा, चक्कर येणे, सुस्ती येणे ही लक्षणे उठून दिसतात. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही म्हणजे माणूस बेशुद्ध पडतो, मेंदूला इजा होते, माणूस कोमात जातो आणि मृत्युमुखी पडतो. हा वायू सतत शरीरात गेला तर काही मिनिटांतच हे सारे घडते आणि आपण बळी जाऊ शकतो. हळूहळू आणि कमी प्रमाणात हा वायू शरीरात जातो तेव्हा इंद्रियांना इजा होते, विविध व्याधी माणसाचा जीव घेतात. मुले आणि पाळीव प्राण्यांना विशेषकरून या वायूची त्वरित बाधा होते.
हा वायू वाहतूक करणाऱ्या गाडय़ांतून बाहेर पडणारा धूर, आग, धूम्रपान, खराब धुरांडी, लाकडाचे जळण, नादुरुस्त गॅसवर चालणारी उपकरणे यांद्वारे आपल्या नाकातून शरीरात घुसतो. या वायूचा आजूबाजूच्या परिसरातील थांगपत्ता लागावा म्हणून 'इलेक्ट्रॉनिक अलार्म' उपलब्ध असतात. हे तपासक आपणास त्यासंबंधी सावध करतात.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंब

अकरावी ऑनलाइन प्रवेश : पहिल्या दिवशी अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

अकरावी ऑनलाइन प्रवेश : पहिल्या दिवशी अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

Published: Thursday, June 19, 2014
दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली असून मुंबई महानगर क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच अर्ज भरून ठेवले होते. निकाल लागल्यावर त्यांनी महाविद्यालयांच्या पर्यायांचे अर्ज सादर केले.
पहिल्या दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण २५,११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. यातील ११ विभागांमधील १४,०८९ विद्यार्थ्यांनी पर्याय अर्ज अर्धवट ठेवले आहेत. तर ८,५६६ विद्यार्थ्यांनी हे अर्ज पूर्ण केले आणि २,४५५ विद्यार्थ्यांनी अर्ज नक्की केले.
अर्ज भरण्याचा पहिला टप्पा बुधवापर्यंत ९५,२५४ विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. यातील ७५,७८७ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत.
जेईई अ‍ॅडव्हान्सचा आज निकाल
मुंबई : आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल http://jeeadv.iitd.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. जेईई मेन या परीक्षेतील पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स दिली होती. देशभरात आयआयटीमध्ये ९,७८४ जागा उपलब्ध आहेत.

Wednesday, June 18, 2014

प्रथम वर्ष पदवी प्रवेशपूर्व नोंदणीस गुरुवापर्यंत मुदतवाढ

प्रथम वर्ष पदवी प्रवेशपूर्व नोंदणीस गुरुवापर्यंत मुदतवाढ

Published: Tuesday, June 17, 2014
मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीची मुदत १९ जूनपर्यंत वाढविली आहे. यामुळे अद्याप नाव नोंदणी न करता आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ही मुदत सोमवारी संपणार होती.
प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २ जूनपासून प्रवेशपूर्व नोंदणी सुरू असून विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार होती. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करता न असल्याने ही मुदत १९ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.  दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ४८ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी ६ लाख ५३ हजार ३५४ अर्ज भरले आहेत.

बुकमार्क - सर्वोत्तम आर. के. नारायण

सर्वोत्तम आर. के. नारायण

Published: Saturday, June 14, 2014
आर. के. नारायण यांच्या ललित आणि ललितेतर साहित्यातील निवडक लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक नारायणप्रेमींसाठी पर्वणी आहेच, पण 'मालगुडी' न वाचलेल्यांसाठीही चांगला पर्याय आहे. नारायण यांच्या भाषाशैलीचे, व्यक्तिचित्रांचे आणि त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे दर्शन या पुस्तकातून होते. वास्तव आणि प्रतिमांमध्ये असलेला विरोधाभासही 'गाइड'वरील दोन लेखांतून व्यक्त होतो. थोडक्यात विचारप्रवृत्त करत अंतर्मुख करणारे हे संकलन आहे.
ललित आणि वैचारिक हे दोन्ही वाङ्मय प्रकार तितक्याच ताकदीने हाताळणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकांमध्ये आर. के. नारायण यांचा उल्लेख करावा लागेल. या प्रतिभासंपन्न लेखकाने स्वत:ला 'रिअ‍ॅलिस्टिक फिक्शन रायटर' म्हटले आहे. त्यांच्या या वाक्याची प्रचीती थोडक्यात देणारे अलीकडेच प्रसिद्ध झालेले पुस्तक म्हणजे 'द व्हेरी बेस्ट ऑफ आर. के. नारायण - टाइमलेस मालगुडी - सिलेक्टेड फिक्शन अ‍ॅण्ड नॉन फिक्शन.' यात फिक्शन विभागांतर्गत सात आणि नॉन फिक्शनअंतर्गत चार लेखांचा समावेश आहे.  
 काळजाला भिडणारे प्रसंग, नाटय़ात्मक कथन, शैलीमुळे डोळ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या घटना आणि सोप्या भाषेत सहजपणे सांगून जाणारा खोल, गंभीर जीवनानुभव हे  नारायण यांच्या सृजनात्मक साहित्याचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. त्यांची पहिली कादंबरी अर्थातच 'स्वामी अ‍ॅण्ड फ्रेंन्ड्स'. मालगुडी गाव, स्वामी, त्याचे नातेवाईक, मित्र आणि तेथील ग्रामस्थ अनेकांना परिचित झाले ते या आणि यानंतर आलेल्या पुस्तकांमुळे. आणि इतर अनेकांना हे सगळे परिचित झाले ते त्यावर कित्येक वर्षांनंतर आलेल्या दूरदर्शन मालिकेमुळे. मानवी स्वभावाचे विविध पलू 'मालगुडी'मध्ये पाहायला मिळतात. अगदी स्वामीच्या घरातले कुटुंबीयसुद्धा आपल्याला आपलेच वाटतात इतके ते प्रसंग कुणाच्याही घरात घडणारे आहेत. आणि ते तितकेच सकसपणे उतरलेले आहेत.
या पुस्तकात अर्थातच त्याची फक्त एक झलकच वाचायला मिळते ती 'स्वामी अ‍ॅण्ड फ्रेंन्ड्स' या एका प्रकरणातून. शाळेला सुट्टी पडल्यामुळे स्वामी दुपारच्या वेळात खेळायला येतो म्हणून मित्रांना सांगून बसलाय. मित्रही वाट बघताहेत. पण नेमका वडिलांना तो सापडतो आणि ते त्याला एकेक कामे सांगतात. वडिलांना तो उलट उत्तरे देऊ शकत नाही, पण त्याची होणारी सारी चरफड शब्दबद्ध करणारी त्याची देहबोली आपल्याला त्याचा उद्वेग जाणवून देते.  बाबांना हवे असलेले कापड खूप शोधूनही त्याला सापडत नाही. आजी, आई काही मदत करत नाही, त्यामुळे चिडलेला स्वामी आपल्या तान्ह्य़ा भावाच्या अंगाखालचे कापड ओढून काढून बाबांना देतो. त्यावर टिप्पणी करताना नारायण लिहितात, 'आपल्या या सगळ्या समस्येला आईला जबाबदार धरत बाळाला त्रास देत त्याच्या अंगाखालचा कपडा ओढून काढण्याने स्वामीला आपल्यावरील अन्यायाचा बदला घेतल्याचा बालसुलभ दिलासा मिळाला.' खेळायला पाठवण्याऐवजी वडील जेव्हा त्याला गणित घालतात तेव्हा मात्र त्याच्या संयमाचा कडेलोट होतो. इतका की महाप्रयासाने जेव्हा ते गणित सुटते तेव्हा त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागते.   
या पुस्तकातील सर्वाधिक जागा व्यापणारी दोन प्रकरणे म्हणजे 'द गाइड' आणि 'मिसगायडेड गाइड'. देव आनंद आणि वहिदा रेहमान यांचा 'गाइड' बघणं आणि नारायण यांनी शब्दबद्ध केलेली 'द गाइड' ही कादंबरी 'वाचणं' हे दोन स्वतंत्र अनुभव आहेत. गाइड राजू, रोझी, मार्को, राजूची आई, मामा ही व्यक्तिमत्त्वे पुस्तकात अधिक ठसठशीतपणे येतात, अधिक कळतात. खोटी सही केल्यानंतर राजू पकडला जातो, तेव्हा अपेक्षाभंगामुळे रोझीला झालेले स्वाभाविक दु:ख आणि त्याच वेळी त्याच्यावरचे निरतिशय प्रेम यांची सरमिसळ पुस्तकातून अधिक ठसते. तुरुंगवासानंतर राजूचे गावात येणे, तिथे त्याला संतपद मिळणे आणि त्यातच त्याचा शेवट होणे या राजूच्या अनपेक्षित जगण्यातून मानवी जगण्यातली अपरिहार्यताच व्यक्त होते.
'मिसगायडेड गाइड' या प्रकरणात प्रत्यक्षातला 'गाइड' आणि पडद्यावर साकार झालेला 'गाइड' या दरम्यानची लेखक म्हणून सहन करावी लागलेली तडजोड व्यक्त होते. 'आम्ही नारायण यांनी लिहिलेला 'गाइड' अगदी तसाच्या तसा पडद्यावर साकारू, तेही प्रत्येक टप्प्यावर त्यांना घेऊनच' या नारायण यांनी शूटिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात सातत्याने ऐकलेल्या वाक्यातला विरोधाभास नंतर त्यांना सातत्याने प्रत्ययास येऊ लागला. आपली कथा आपल्याच हातातून निसटून चालली आहे, याची जीवघेणी वेदना या  प्रकरणात प्रभावीपणे उतरली आहे.
सुरुवातीच्या काळात अमेरिकी दिग्दर्शक, निर्मात्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिका पर्ल बक यांनी भारतीय मातीतला 'गाइड' बनवण्याची स्वप्ने दाखवली होती. पण त्यांना पहिला धक्का बसला तो मालगुडीच्या अस्तित्वाचाच. 'मालगुडी' हे गाव जरी नारायण यांच्या कल्पनेतले असले तरी दक्षिण भारतातले त्यांनी निर्माण केलेले ते असे गाव आहे जे हजारो लोकांच्या मनात घर करून राहिलेले आहे. त्या गावाला स्वत:चा असा रंग, रूप, अर्थ आहे. त्यामुळे 'गाइड'ची कथाही गावातच साकार व्हायला हवी होती. मात्र सिनेमा वाइड स्क्रीनवर आणि इस्टमन कलरमध्ये दाखवला जाणार असल्याने साहजिकच त्यांना देखणे शहर दाखवायचे होते. ज्यासाठी त्यांनी निवडले जयपूर, जे नारायण यांच्या कल्पनेतल्या गावाशी फटकून वागणारे होते. यावर लिहिताना नारायण यांची उपहासात्मक शैली अधिक तेज होताना दिसते. ते लिहितात, 'चच्रेदरम्यान मला विचारले गेले, 'तुम्हाला वाटतेय तिथेच मालगुडी आहे हे तुम्हाला कसे माहीत, ते कुठेही असू शकते.' तेव्हा मात्र मी माघार घेतली. तरीही मी त्यांना म्हटले, 'मालगुडी माझ्या कल्पनेतले आहे. मी तयार केलेय त्याला. आणि गेली तीस वष्रे या परिसरातल्या कादंबऱ्या मी एका मागोमाग लिहितोय.' ' शेवटी असे जाहीर करण्यात आले की ही कथा मालगुडीमध्ये घडतेय हेच चित्रपटातून काढून टाकू या. ही एका शहरातली प्रेमकथा होईल. तेव्हा मात्र नारायण यांना त्यांच्या मनातल्या मालगुडीला, त्यात साकारत गेलेली प्रेमकथा, त्या मातीचा गोडवा, गावाच्या अस्तित्वातून व्यक्त होणारे लोकमानस या सगळ्याला भव्य-दिव्य सिनेमाच्या स्वप्नापुढे तिलांजली द्यावी लागली. त्यानंतरही मूळ कथेत, प्रसंगात बदल घडवणारे प्रस्ताव सुचवण्यात आले. काही स्वीकारले गेले, काही रद्द केले गेले. ते सांगणारी नारायण यांची प्रसंगी उपहासात्मक शैली वाचण्यासाठी आणि सिनेमापलीकडचा 'गाइड' जाणून घेण्यासाठी मूळ प्रकरणेच वाचायला हवीत.
उर्वरित वाचण्यासाठी: 1 2संपूर्ण

ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Published: Wednesday, June 18, 2014
मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर होताच मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
* ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे - १८ ते २५ जून
* ऑनलाइन सादर केलेले अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तपासून त्रुटी दुरूस्त करून अद्ययावत करणे - २६ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
* प्रथम गुणवत्ता यादी - २ जुलै रोजी सायं. ५ वाजता.
*  प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - ३ ते ५ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत.
* द्वितीय गुणवत्ता यादी - ९ जुलै रोजी सायं. ५ वाजता.
* द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - १० ते ११ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत.
* तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी - १५ जुलै रोजी सायं. ५ वा.
* तृतीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - १६ ते १७ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत.
मुंबईतील शाखानिहाय प्रवेश क्षमता
१ कला - शाखेसाठी एकूण ३८ हजार ५५९ जागा आहेत. यातील १५ हजार ०८८ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित २३ हजार ४७१ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
२ वाणिज्य - शाखेसाठी एकूण ८४ हजार २१६ जागा आहेत. यातील ३६ हजार ४९४ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित ४७ हजार ७२२ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
३ विज्ञान - शाखेसाठी एकूण एक लाख ६० हजार ९४७ जागा आहेत. यातील ७२ हजार ०१२ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित ८८ हजार ९३५ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
गुणपत्रकांचे वाटप २६ जून, दुपारी ३ वा.
गुणपडताळणीचा अर्ज करण्यासाठी मुदत २६ जून ते ५ जुलै
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ७ जुलै
निकाल वेळेतच : यावर्षी दहावीच्या निकालाला झालेला उशीर राज्यमंडळाला मात्र मान्य नाही. निकाल वेळेतच लागला असल्याचे राज्यमंडळाचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले, ''गेल्या वर्षी ७ जूनला निकाल जाहीर झाल्यामुळे निकालाला उशीर झाला असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर्षी निकालाला उशीर झाला नाही, तर गेल्यावर्षी निकाल लवकर लागले होते.''

Monday, June 16, 2014

प्रवेशपूर्व नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस

प्रवेशपूर्व नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस

Published: Monday, June 16, 2014
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची संख्या शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० इतकी झाली आहे. ही नोंदणी या नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस उरले असल्याने ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. २ जूनपासून प्रवेशपूर्व नोंदणी सुरू आहे. नोंदणीच्या पहिल्या दिवशी चार हजार ८३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी पाच लाख ८०८ अर्ज भरले आहेत. विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्या िपट्र कॉपीसह विद्यार्थ्यांना १९ जूनपर्यंत कॉलेजात प्रवेश अर्ज भरता येईल. अर्ज सादर केल्यानंतर कॉलेजची पहिली गुणवत्ता यादी १९ जून रोजी कॉलेजांमध्ये जाहीर होणार आहे.

Monday, June 9, 2014

ग्रीन टी मुळे मेंदूला फायदा

Thats इट

ग्रीन टी मुळे मेंदूला फायदा

Published: Saturday, June 7, 2014
आपण जो नेहमी चहा पितो त्यापेक्षा ग्रीन टी महाग असतो पण त्यात जास्त औषधी गुण असतात. तो दुधाबरोबर वापरला जात नाही तर काढय़ासारखा वापरला जातो. त्यामुळे माणसाचे सर्वागीण आरोग्य सुधारते. मेंदूची शक्ती वाढते. स्वित्र्झलडच्या संशोधकांच्या मते ग्रीन टी मुळे आकलन वाढते, डिमेन्शिया (विसरभोळेपणा) यात सुधारणा दिसून येते. आतापर्यंत ग्रीन टी कर्करोगावर कसा गुणकारी आहे यावर बरेच संशोधन झाले आहे, पण ग्रीन टी मुळे मेंदूची बोधन क्षमता वाढते हे बॅसेल विद्यापीठाचे ख्रिस्तोफर बेगलिंगर व सायकिअॅट्रिक युनिव्हर्सिटी क्लिनिकचे स्टेफन बोरगाईट यांनी एक प्रयोग केला. त्यानुसार ग्रीन टी चा अर्क घेतल्यास मेंदूतील जोडण्या सुधारतात. तसेच मेंदूची तंदुरुस्ती वाढते. दोन्ही भाग कार्यक्षमतेने काम करतात, कामचलाऊ स्मृती लगेच सुधारते. काही प्रौढांना ग्रीन टी देऊन स्मृतींशी संबंधित कामे सांगितल्यानंतर त्यांनी ती चटकन केली. मॅग्नेटिक रेझोनन्स पद्धतीने मेंदूचा अभ्यास केला असता मेंदूच्या पॅरिएटल व फ्रंटल कॉर्टेक्स या भागातील जोडणी चांगली झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यांच्यावर प्रयोग केला त्या प्रौढांची काम करण्याची क्षमता सुधारली. ग्रीन टी मुळे मेंदूतील जोडण्यांची लवचिकता वाढते, असे बोर्गवार्डट यांचे मत आहे. ज्यांच्यात बोधनात्मक क्रियेमध्ये बिघाड आहे अशा लोकांमध्ये मेंदूचे कार्य ग्रीन टी मुळे सुधारते. डिमेन्शिया या न्यूरोसायकिअॅट्रिक आजारातही त्याचा फायदा होतो. सायकोफार्माकोलॉडी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
पाणी तपासण्याचे यंत्र
आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचा दर्जा तपासून बघण्याच्या भानगडीत कुणी फारसे पडत नाही. श्रीमंतांच्या घरात ते तपासण्याची गरज नसते कारण अगदी बोअरचे पाणीही शुद्ध करणारी यंत्रे मिळतात. दूषित पाण्यामुळे माणसाला अनेक आजार होतात, त्यामुळे सुरक्षित पेयजल मिळणे हा खरा तर सर्वाचाच अधिकार आहे. पाणी दूषित आहे की स्वच्छ हे ओळखण्यासाठी भारतीय वंशाच्या मनूप्रकाश या अमेरिकी वैज्ञानिकाने एक रासायनिक संच तयार केला आहे त्याची किंमत अवघी पाच डॉलर आहे. विकसनशील देशात पाण्याच्याच नव्हे तर रोगांच्या निदानासाठी त्याचा वापर करता येणार आहे. मनूप्रकाश हे स्टॅनफर्डच्या जैवअभियांत्रिकी विभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना हे यंत्र आणखी विकसित करण्यासाठी पन्नास हजार डॉलरचे अनुदान मिळाले आहे. त्यात बऱ्याच नावीन्यपूर्ण कल्पना वापरल्या असून ते यंत्र मुलांना संगीत खेळणे म्हणूनही वापरता येते त्यामुळे तो म्युझिक बॉक्सही आहे. म्हटलं तर पाणी किंवा द्रवाची चाचणी करणारे यंत्र  नाहीतर खेळणे आहे. त्यात एक चाक, एक सिलिकॉन चिप, आवर्ती छिद्र असलेला पेपर टेप आहे. सिलिकॉन चिपमध्ये द्रव वाहिन्या आहेत. जेव्हा पिन पेपर टेपमधील छिद्रात जाते तेव्हा द्रवाचा ठिपका पडतो. असे पंधरा पंप एकावेळी थेंब पडण्याने सुरू होतात. हा रासायनिक संच कुठेही नेता येतो व पाण्याचा, मातीचा दर्जा त्याच्या मदतीने तपासता येतो. शिवाय सापाच्या विषाची चाचणीही करता येते. मनूप्रकाश व जॉर्ज कोरिक यांनी हे यंत्र स्वस्तात तयार केले आहे.
तुमच्या हृदयाचे वय किती?
हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असतो. वैज्ञानिकांनी आता हृदयाचे खरे वय ठरवणारे साधन शोधून काढले आहे. कौटुंबिक व जीवनशैलीविषयक जोखमीचे घटक पाहून हे साधन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जोखमीचे घटक नसलेल्यांच्या तुलनेत ते असलेली व्यक्ती उपचार न केल्यास हृदविकाराचा झटका येण्यापूर्वी किती काळ जगू शकेल याचा अंदाज करता येतो. ब्रिटिश मेडिकल सोसायटीजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जेबीएस३ जोखीम मापक त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका कितपत आहे? तो कसा टाळता येईल हे अगदी अलीकडच्या टप्प्यात समजते. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.सध्याची जीवनशैली, रक्तदाब, कोलेस्टेरॉल पातळी, वैद्यकीय स्थिती यांचा हृदयावर जो परिणाम होतो याचा विचार यात केला जात आहे. समजा ३५ वर्षांच्या एका स्त्रीचा सिस्टॉलिक रक्तदाब १६० एमएम व कोलेस्टेरॉल ७ एममोल/ लिटर आहे शिवाय घरात हृदयविकाराचा इतिहास आहे तर तिच्या हृदयाचे वय ४७ समजावे व हृदयविकारापुरता विचार केला तर तिला ७१ व्या वर्षीपर्यंत हृदयविकार व पक्षाघाताचा धोका नाही. दहा वर्षांतील तिची जोखीम ८ टक्के असेल. जर स्त्रियांनी धूम्रपान सोडले, कोलेस्टेरॉल ४ एम.मोल/ लि. व सिस्टॉलिक रक्तदाब १३० ठेवला तर त्यांच्या हृदयाचे वय ३० पर्यंत खाली येते व या स्त्रिया हृदयविकार न होता ८५ वर्षे जगतील. दहा वर्षांत त्यांची जोखीम ०.२५ टक्केही राहणार नाही. जेबीएस३ हा मोठा जोखमीचा घटक असतो. तो तुमच्या जीवनशैलीने किती परिवर्तन घडले हे दाखवतो. धूम्रपान सोडणे, आरोग्यदायी आहार पद्धती, नियमित व्यायाम यामुळे हृदयविकाराचा धोका टळू शकतो.
मेदाचे प्रमाण तपासणारी रक्तचाचणी
डीएनएचे वाचन करणारी एक साधी रक्त चाचणी. तुमच्या मुलात लठ्ठेपणा येणार की नाही हे सांगू शकणार आहे. साऊथहॅम्पटन, एक्स्टर, प्लायमाऊथ या विद्यापीठातील संशोधकांनी ही चाचणी विकसित केली असून, त्यात 'पीजीसी१ए' या जनुकातील एपिजेनेटिक स्वीचेसचा अभ्यास करण्यात आला आहे, हे जनुक शरीरात मेदाचा साठा करण्यास कारणीभूत ठरत असते. डीएनए मेथिलेशन. या रासायनिक बदलामुळे एपिजेनेटिक स्वीचेस तयार होतात. ही स्वीचेस जनुकाचे नियंत्रण करीत असतात. साऊथहॅम्पटन विद्यापीठाच्या संशोधकांना असे दिसून आले की, पाच वर्षांच्या मुलांवर ही चाचणी केली असता ते मोठे होतील तेव्हा त्यांच्या रक्तात मेदाचे प्रमाण किती असेल हे सांगता येते. डीएनए मेथिलेशन हे वयाच्या ५ व्या वर्षी १० टक्के जास्त असले तर वयाच्या १४ व्या वर्षी त्या मुलात मेदाचे प्रमाण हे १२ टक्के असणार हे उघड आहे. मुलगा असो की मुलगी मेदाचे हे गणित चुकणार नाही, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. साऊथ हॅम्प्टन विद्यापीठाचे डॉ. ग्रॅहॅम ब्रज व डॉ. कॅरेन लिलीक्रॉप यांनी हे संशोधन केले आहे. मोठेपणी मुले लठ्ठ होतील की नाही हे वयाच्या पाचव्या वर्षीय समजण्यासाठी त्यांनी ही  चाचणी विकसित केली आहे. या संशोधनाचा दुसरा अर्थ लहानपणीचा लठ्ठपणा हा केवळ जीवनशैलीवर नव्हे तर त्याचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतो. या ज्ञानातून पुढे विकसित व विकसनशील देशातील मुलांमध्ये असलेला लठ्ठपणा रोखण्यात मदत होणार आहे. यात एक्स्टर विद्यापीठाच्या टेरेन्स विलकीन, प्लायमाऊथ विद्यापीठाच्या डॉ. जोआन होस्किंग यांचा सहभाग होता. 'डायबेटिस' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अर्ली बर्ड प्रोजेक्ट या प्रकल्पात प्लायमाऊथ विद्यापीठात ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ४० मुलांची डीएनए तपासणी करण्यात आली. वय वर्षे पाच ते १४ या काळात त्यांच्यावर संशोधन करण्यात आलो. मुले किती मेद सेवन करतात, किती व्यायाम करतात, याचा अभ्यास करून त्यांचे रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यातील जनुके काढून एपिजेनेटिक स्वीचेस तपासण्यात आली. लठ्ठपणामुळे टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता असते.

बहुगुणी प्लास्टिक

Thats इट

बहुगुणी प्लास्टिक

Published: Saturday, June 7, 2014
नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही प्लास्टिक 'राग' आवळणारी वृत्तचित्रे माध्यमांकडून जोमाने दाखविली जात होती. प्लास्टिकचा भस्मासुर कसा बोकाळत आहे हे आपण गेली अनेक वर्षे पाहतो आहोत. बाजारात जाताना आपण नेमकी कापडी पिशवी न्यायची विसरतो आणि प्लास्टिक पिशवीत सामान घेतो. काही वेळा तर त्यासाठी पाच रुपयेही मोजतो. मोठय़ा दुकानात प्लास्टिकची पिशवी देतात, पण त्याचे दोन ते पाच रुपये आकारले जातात. पण या प्लास्टिकचे कचऱ्यात गेल्यानंतरही विघटन होत नाही, नदी-नाले तुंबतात, मग या प्लास्टिकच्या कचऱ्याचे करायचे तरी काय? पर्यावरण दिनानिमित्तानेच प्लास्टिकविरोधी पारंपरिक सूर टाळून गरज आणि इच्छाशक्ती असली तर प्लास्टिकचे काय करता येईल, याचा सकारात्मक आढावा.
बंगळुरूतील प्रयोग
खरेतर याला प्रयोग म्हणता येणार नाही कारण ती सिद्ध झालेली गोष्ट आहे, की प्लास्टिकचा वापर रस्ते तयार करण्यासाठी करता येतो. बंगळुरूत रोज एक चतुर्थाश कचरा हा प्लास्टिकचा असतो, पण या प्लास्टिकचे काय करायचे याची चिंता केके प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे अहमद खान यांना पडली होती, त्यांनी प्लास्टिक त्याज्य वस्तू मानतो त्याचा दुसरीकडे काही उपयोग करता येईल का, असा विचार केला. गांधीजी म्हणायचे, की कुठलीही वस्तू पूर्ण वापरल्याशिवाय फेकून देऊ नका. चंगळवादी संस्कृतीत लोक कपडे बदलावे तशा वस्तू बदलतात आणि त्यांचा शेवटी कचराच होतो. तर खान यांनी प्लास्टिक गोळा करून ४३० कि.मी.चा रस्ता तयार केला आहे. अहमद खान सांगतात, की प्लास्टिकचा वापर रस्त्यांसाठी करावा, की करू नये यावर आपण अनेकांशी बरीच सल्लामसलत केली, त्यामुळे आणखी जनजागृती झाली. खान रोज कचराकुंडीत जायचे व प्लास्टिक गोळा करायचे. हे प्लास्टिक गोळा केले, की ते बिटूमेनमध्ये मिसळतात, बिटूमेन हा पदार्थ अस्फाल्ट सिमेंट किंवा अस्फाल्ट म्हणून ओळखला जातो. खनिज तेलशुद्धीकरणात तो तयार होतो व सामान्य तपमानाला अर्धघनअवस्थेत राहतो. काही वेळा दगड, वाळू व बिटूमेन यांच्या मिश्रणाला अस्फाल्ट म्हणतात तर रस्ते निर्मितीत ५ टक्के बिटूमेन वापरलेले असते. तर खान नावाचे हे गृहस्थ बिटूमेनमध्ये प्लास्टिक मिसळत होते. प्लास्टिकमुळे रस्ते टिकतात अधिक. शिवाय रोज ९००० टन प्लास्टिक तयार होते ते सत्कारणीही लागते.
अमेरिकेत प्लास्टिकपासून पेट्रोल
जगात सगळीकडेच वेगवेगळे प्रयोग सुरू असतात पण त्याची माहिती आपल्यापर्यंत येतेच असे नाही. अमेरिकेतील उद्योजिका व वैज्ञानिक प्रियांका बकाया हिने प्लास्टिकपासून वीज तयार करण्याचा प्रयोग केला आहे, हे सगळे प्रकार येथे सांगत आहे, त्याला इनोव्हेशन असे गोंडस नाव आहे व त्यालाच टाकाऊपासून टिकाऊ असे म्हणतात. आता अमेरिकेसारखा देश तिथे तर सगळेच यूज अँड थ्रो. पण फेकून दिलेल्या वस्तूंचा ढीगच जमतोय त्यात प्लास्टिक आहे. प्लास्टिक हे खनिज तेलापासून बनते व त्यामुळे त्याचे ऊर्जा मूल्य खूप अधिक असते त्यामुळे या प्लास्टिकला पुन्हा तेलात रूपांतरित करण्याचा आमचा उपक्रम आहे. त्यामुळे त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल. ही नवीन कल्पना पी.के. क्लीन या अमेरिकेतील एमआयटी संस्थेने स्थापलेल्या संस्थेने साकार केली आहे. प्रियंका ही त्या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. प्रियंकाचे ऑस्ट्रेलियातील कौटुंबिक मित्र पर्सी क्लीन यांनी ही कल्पना प्रथम मांडली. पर्सी हे संशोधक होते व त्यांचा विवाह झालेला नव्हता, मुलेबाळे नाही, ते अगदी आजोबाच होते असे बकाया सांगते. त्यांचे घर म्हणजे रसायनशास्त्राची प्रयोगशाळाच होती. टाकाऊ पदार्थापासून ते तेल तयार करायचे व त्यावर दिवा पेटवायचे, त्यांचे हे सगळे प्रयोग बघून आश्चर्य वाटायचे ,प्रियंका सांगते. कीन यांचे २००७ मध्ये ९५ व्या वर्षी निधन झाले, त्यांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण झाले नाही पण त्यांनी काही नोट्स ठेवल्या होत्या नंतर न्यूयॉर्क येथे मी त्यांच्याप्रमाणेच संशोधन हाती घेतले. खनिज तेलाच्या किमती तर वाढतच आहेत. मग स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा असे वाटले. एमआयटीमध्ये प्रियंका ऊर्जा विषय शिकत होती, तेव्हा तिने उटाह येथील सॉल्ट लेक येथे एक कंपनी सुरू केली. तेथे प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी यंत्रे तयार केली व ते अमेरिकेत सगळीकडे उपलब्ध करून दिली. २०१० मध्ये तिने भारतातही हा प्रयोग केला. तिच्या पी.के.क्लीन या कंपनीला २०११ मध्ये एमआयटीचा स्वच्छ ऊर्जा पुरस्कार मिळाला, यामागे टीमवर्कचे यश आहे असे ती सांगते.
तंत्रज्ञान काय
प्रियंकाने खनिज तेलापासून प्लास्टिक बनवतात तर प्लास्टिकपासून खनिज तेल का बनवता येऊ नये ही संकल्पना वापरली, हे नव्या जगाचे रसायनशास्त्र आहे. पी.के.क्लीन या कंपनीच्या वतीने तिने या तंत्रज्ञानाचे पेटंटही घेतले आहे. प्लास्टिक हे अनेक कार्बन रेणूंचे बनलेले आहे. आमच्या प्रक्रियेत आम्ही कार्बनच्या या मोठय़ा साखळ्या तोडून छोटय़ा करतो. डिझेल हे कार्बनचे १२ ते २० रेणू एकत्र साखळीत जोडून बनते, हे नेमके तंत्र त्या सांगता नाहीत पण हे मात्र खरे, की सरते शेवटी उष्णता व उत्प्रेरक यांच्या वापराने केलेल्या या प्रक्रियेतून ७५टक्के तेलच मिळते. यात प्रदूषण होत नाही. २०  टक्के नैसर्गिक वायू तयार होतो, तो पुन्हा उष्णता निर्मितीसाठी वापरला जातो म्हणजे प्लास्टिक तापवायला वेगळे इंधन वापरावे लागत नाही व ५ टक्के अवशेष राहतात, तेही कसले असते तर प्लास्टिकवर जी लेबले लावतात त्यांचे असते. प्लास्टिकपासून जास्त ऊर्जा मूल्याचे तेल मिळवता येते असा याचा अर्थ आहे.
प्लास्टिक वापरलेला पहिला रस्ता
कणेगरी येथे बंगळुरू विद्यापीठाच्या बाहेर जो ट्रॅक रोड बांधलेला आहे, तो देशात या तंत्रज्ञानाने बांधलेला पहिला रस्ता आहे. यात प्लास्टिक बिटूमेनमध्ये टाकून त्याच्या गोळ्या करण्याचे यंत्र असते, त्याचा वापर केला जातो. खरेतर प्लास्टिकपासून रस्ते तयार करता येतील याचा पथदर्शक प्रकल्प बंगळुरूच्या आर.व्ही कॉलेज अफ इंजिनीयिरगच्या विद्यार्थ्यांनी तयार केला, त्यांनी रस्ते संशोधन संस्थेचे समन्वयक ए.वीरराघवन व तज्ञ प्राध्यापक जस्टो यांना अहवाल सादर केला, त्यात असे दिसून आले, की रस्त्यांमध्ये प्लास्टिक वापरल्याने ते मजबूत होतात व प्रदूषणाचे संकटही टळते.रस्त्यासाठी जे बिटूमेन वापरावे लागते त्यात प्लास्टिक मिसळले जात असल्याने खर्चही कमी होतो., रस्त्याची मजबुती तीन पट वाढते.
प्लास्टिकचे धोके
अगदी २० मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही त्यासाठी वापरतात येतात, ज्यांच्यावर अनेक राज्यात बंदी आहे. के.के.पॉलिफ्लेक्स ही कंपनी कागद-कचरा व्यावसायिकांकडून प्लास्टिक विकत घेते. आता प्लास्टिकमध्ये बिसफेनॉल असेल तर त्यामुळे कर्करोग होतो त्यामुळे लहान बाळांसाठी दुधाच्या बाटल्या चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या हव्या. हल्लीतर लोक चहाही प्लास्टिक पिशवीत देतात, इतका अतिरेक झाला आहे. उकळता चहा आणि कमी दर्जाचे प्लास्टिक मिळून आपण काय पित असतो ते आपल्याला नंतरच कळते तो भाग अलाहिदा. प्लास्टिकमुळे शुक्रजंतूंचे प्रमाण कमी होते. स्तनाचा कर्करोग होतो. प्लास्टिकच्या पिशव्या नदी-नाल्यात साठून त्यांचे मार्ग बंद होतात असे अनेक दुष्परिणाम आहेत. गाईंच्या पोटातून प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्याच्या घटनाही आपण वाचतो. मग त्यावरचा हा उपाय सर्वच महापालिकांनी करायला काय हरकत आहे, कदाचित त्यात व्यवहाराच्या दृष्टीने काही भाग नकोसा असेल, तरी शहर विकासासाठी तो आवश्यक असू शकतो.
'प्लास्टिक हा सर्वात वाईट प्रकारचा कचरा असतो, त्याचे विघटन व्हायला कित्येक शतके लागतात, खड्डय़ांमध्ये कचराकुंडीत, पर्यटन स्थळी आपण नकळत हा कचरा टाकत असतो, हजारो टन  प्लास्टिक लँडफील्समध्ये गाडले जाते.'
प्रियंका बकाया
'सुरुवातीला आम्ही रस्ते बांधणीसाठी प्लास्टिक वापरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जे हाताला लागेल ते प्लास्टिक गोळा करत होतो, विकतही घेत होतो. कुठेही थांबायची आमची तयारी नव्हती, मग आम्ही त्याचा साठा करून ठेवला, मग आम्ही बंगळुरू महापालिकेपुढे शहरातील ४० टक्के रस्ते प्लास्टिकने तयार करण्याचा प्रस्ताव मांडला, रस्ते बांधलेही, आज या रस्त्यांनी अनेक पावसाळे पाहिले आहेत.'- अहमद खान