Monday, July 31, 2017

पुढची पायरी : कामाची गुणवत्ता आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.

पुढची पायरी : कामाची गुणवत्ता

आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.

डॉ. जयंत पानसे | Updated: July 29, 2017 1:49 AM 
बहुतेक सर्व कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेची चर्चा सुरू होते ती वार्षिक मूल्यमापनाच्या वेळेला किंवा एखाद्या अयशस्वी झालेल्या कामामुळे. कोण कुठे चुकले, त्यामुळे काय झाले, नाहीतर काय झाले असते वगैरे. पण गुणावगुणाबद्दल चर्चा करायच्या या दोन्ही चुकीच्या वेळा आहेत. गुणवत्ता पाळणे ही फक्त एखाद्या वेळी करावयाची गोष्ट नसून ती वर्षभर, नव्हे तर सातत्याने कायमची अंगी बाणवण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजेआपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे..
दुर्दैवाने कामात गुणवत्तेची अंमलबजावणी करणे हे माझे काम नाही, वरिष्ठांचे आहे ही अनेकांची भावना असते. तसेच हे काम फक्त उत्पादन खात्याचे आहे; असाही एक गैरसमज असतो. पण प्रत्येक काम, मग ते कार्यालयातील असो वा कारखान्यातील; गुणवत्तेच्या मापदंडाप्रमाणेच झाले पाहिजे हा आग्रह कंपनीतील प्रत्येकानेच धरला तर आपोआपच सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने होतील. साहजिकच कंपनीच्या उत्पादकतेतही लक्षणीय वाढ होईल.
गुणवत्तापूर्ण काम म्हणजे काय?
  • कामाचा उद्देश लक्षात ठेवून केलेले समर्पक काम
  • पहिल्याच प्रयत्नांत केलेले संपूर्ण काम
  • अपेक्षित अशाच स्वरूपात व पद्धतीने केलेले, समाधान देणारे काम
  • कुठलेही दोष अथवा वैगुण्य नसलेले काम
  • मापदंडानुसार केलेले काम
नोकरीच्या पहिल्या वर्षांत गुणवत्तेचा प्रकर्षांने पुरस्कार करणारे एखादे वरिष्ठ भेटले तर तुम्ही स्वत:ला अतिशय भाग्यवान समजा. कारण त्यांच्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत गुणवत्तेनुसार काम करावयाचा ध्यास तुम्ही घ्याल. त्याचा सकारात्मक परिणाम कार्यालयीन कामगिरीवर तर होईलच, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील होईल. तुम्ही कार्यालयात आणि वैयक्तिक आयुष्यात अतिशय कार्यक्षम व यशस्वी व्हाल.
वरिष्ठांनी तुम्हाला गुणवत्ता पालन कसे करावयाचे शिकवले नाही तरी पुढे दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे अंमलबजावणी केल्यास तुम्हालाही त्याचा लाभ करून घेता येईल.
  • प्रथम कामाचे स्वरूप व त्यातून काय निष्पत्ती अपेक्षित आहे हे नीट समजावून घ्या.
  • काम किती वेळात पूर्ण करून कुणाकडे अहवाल द्यायचा आहे त्याची माहिती घ्या.
  • कामाच्या संदर्भात सहकाऱ्याकडून काही माहिती हवी असल्यास किंवा द्यावी लागणार असल्यास लगेचच सहकाऱ्याशी संवाद साधून माहितीचे स्वरूप व लागणारा वेळ याबद्दल जबाबदारी निश्चित करा.
  • काम वेळेत व चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे योग्य क्षमता, ज्ञान, सामग्री व वेळ आहे याची खातरजमा करा.
  • दुर्दैवाने यापैकी काही कमतरता असेल तर नि:संकोचपणे वरिष्ठांकडे ज्ञान/ सामग्री मागा. न मिळाल्यास कामाच्या निष्पत्तीवर या अभावांचा कसा परिणाम होईल ते अभ्यास करून वरिष्ठांना सांगा.
  • कामाच्या संदर्भात अगोदरच गुणवत्तेचे काही दृश्य/ अदृश्य मापदंड आहेत का याचा तपास करा. असतील तर त्या मापदंडाप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगले काम करावयाचा प्रयत्न करा.
  • संपूर्ण कामाचे छोटे विभाग करून त्या विभागानुसार काम पूर्ण करा. ते अधिक चांगले व वेळेत होते असे तुम्हाला अनुभवाला येईल.
  • नेहमी कराव्या लागणाऱ्या कामांची प्रतिक्षिप्त क्रिया करा; म्हणजे त्यामध्ये वेगळा विचार करायला न लागल्याने काम नेटके व गतिमान होईल.
विभागवार केलेल्या कामांचे वेळोवेळी स्वत:च परीक्षण करा. ती गुणवत्तेच्या निकषांप्रमाणेच आहेत की नाहीत याची खात्री करा.
शेवटी सर्व विभागवार कामांचे संकलन करा व परत एकदा परीक्षण करा, त्रुटी असतील तर सुधारून घ्या. हे काम करताना काय अडचणी आल्या व त्यावर तुम्ही कशी मात केली याचे एक लिखित तयार करा. ते तुम्हाला पुढचे काम हाताळताना उपयोगी पडेल.
प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे हे साधे व सोपे नियम तुम्ही हे दैनंदिन व्यवहारात पाळा. मग पाहा, वर्षभरात तुमच्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात भरणारा सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. तुमची उत्पादकता वाढेल, आत्मविश्वास दुणावेल. अशी गुणवत्ता अंगी बाणविण्यासाठी “Quality for the first time, every time!” एवढेच लक्षात ठेवा.
dr.jayant.panse@gmail.com
First Published on July 29, 2017 1:49 am
Web Title: quality of work work issue

 

नोकरीची संधी उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

नोकरीची संधी

उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण  मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

सुहास पाटील | Updated: July 29, 2017 1:46 AM 
भारत सरकार, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेिनग (डीजीटी) मिनिस्ट्री ऑफ स्कील डेव्हलपमेंट आणि आंतरप्रुनरशिप अंतर्गत येणाऱ्या देशभरातील अ‍ॅडव्हान्स ट्रेिनग इन्स्टिटय़ूटस (१४ इन्स्टिटय़ूटस ३३७८ जागा)
(एटीआय) आणि नॅशनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूट/रिजनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूटमध्ये (११ इन्स्टिटय़ूटस – १०६० जागा) क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेिनग स्कीमसाठी (सीआयटीएस) प्रवेश.
(कालावधी – १ र्वष, २ सत्रं)
महाराष्ट्रातील एटीआय वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन, मुंबई येथे (१) फिटर, (२) टर्नर, (३) मशिनिस्ट, (४) वेल्डर, (५) इलेक्ट्रिशियन, (६) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए), (७) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (८) ड्राफ्ट्समन मेकॅनिक, (९) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक, (१०) मेकॅनिक मोटर वेहिकल, (११) मेकॅनिक रेडिओ, टीव्ही, (१२) टूल अँड डाय मेकर प्रत्येक ट्रेडच्या ४० जागा प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
रिजनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, काशिनाथ धुरू मार्ग, दादर, मुंबई-४०० ०२८ येथे
(१) सेक्रेटरियल प्रॅक्टिस, (२) ड्रेस मेकिंग, (३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (४) आíकटेक्चरल ड्राफ्ट्समन प्रत्येक ट्रेडच्या २० जागांवर प्रवेश उपलब्ध.
पात्रता – क्राफ्ट्समन ट्रेिनग स्कीम (सीटीएस) अंतर्गत संबंधित नॅशनल ट्रेड सर्टििफकेट (आयटीआय्) किंवा संबंधित विषयातील पदविकाधारक ज्यांच्याकडे ३ वर्षांचा शिकविण्याचा अनुभव आहे, असे उमेदवार सेमिस्टर-१ परीक्षेला बसू शकतात आणि सेमिस्टर-२ ला प्रवेश मिळवू शकतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कोर्स सुरू होतो. प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार एका सेमिस्टरला सीआयटीएससाठी कोर्स फी रु. १,२००/-(अजा/अज उमेदवारांसाठी रु. ३५०/-).
दोन सेमिस्टरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेिनग (सेमिस्टर पॅटर्न) सर्टििफकेट दिले जाईल. प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९ ते ५.३० पर्यंत (शनिवार/रविवार सुट्टी). उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण  मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
First Published on July 29, 2017 1:46 am
Web Title: job opportunities 82
 

 

करिअरमंत्र या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.

करिअरमंत्र

या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.

सुरेश वांदिले | Updated: July 29, 2017 1:44 AM 
मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून १२ वी झालो आहे. मला महाराष्ट्रातील पोलीस शिपाई भरती परीक्षा देता येईल का?
आकाश काळे
यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत, ते सर्व शासकीय परीक्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे या विद्यापीठातून बारावी झाली असली तरीही पोलीस शिपाई पदभरतीची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते. या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.
माझी मुलगी नुकतीच १२ वी उत्तीर्ण झाली आहे. तिला अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेमध्ये रस नाही. तिला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. तिने कोणत्या क्षेत्रात पदवी घ्यावी?
जयश्री सुगरे
संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेसाठी कोणत्याही एका विशिष्ट पदवीची गरज नाही. या परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी अनेक प्रकारच्या शाखांमधून शिक्षण घेऊन आलेले दिसतात. अमुक एका विद्याशाखेतल्याच विद्यार्थ्यांना यश मिळते असे नव्हे. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कलाशाखेतील विषयांकडे बऱ्याच मुलांचा ओढा दिसून येतो. या विषयांचे साहित्यही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. या पर्यायाचाही विचार करता येईल. मराठी, इंग्रजी भाषेची तयारी पदवीपर्यंतच्या काळात उत्तमरीत्या करता येऊ शकते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य अध्ययन याविषयांच्या अनुषंगाने प्राथमिक व मुख्य परीक्षेत बरेच प्रश्न विचारले जातात. या बाबी लक्षात ठेऊनच विषयांची निवड करता येईल. आत्तापासूनच त्यानुसार अभ्यास केल्यास उत्तम फळ मिळेल.
मी. एम. कॉम झालो आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. मार्गदर्शन करावे.
नितीन पाटील
बँकिंग क्षेत्रात तुम्हाला लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेश्ॉलिस्ट ऑफिसर म्हणून करिअरला सुरुवात करता येईल. या संधी तुला रिझव्‍‌र्ह बँक, सार्वजनिक बँका आणि खासगी बँकांमधून मिळू शकतील.
(१) रिझव्‍‌र्ह बँकेच्या निवड मंडळामार्फत या पदांच्या नियुक्तीसाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात.
(२) बहुतांश सार्वजनिक बँकामधील पदांच्या निवडीसाठी आयबीपीएस (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) मार्फत तीन टप्यांमध्ये परीक्षा घेतली जाते.

(३) काही सार्वजनिक बँका त्यांच्या प्रोबेशनरी ऑफसर्सच्या नियुक्तीसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतात. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना एक वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा अभ्यासक्रम करावा लागतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाला की त्यांची निवड प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून केली जाते.
(४) काही खासगी बँका चाळणी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करतात. याविषयी संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाते.
(५) स्टेट बँक ऑफ इंडिया स्वत:ची परीक्षा घेते.
(६) बहुतेक सर्व खासगी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका एमबीए इन फायनान्स हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंटद्वारे करतात.
पुणेस्थित ‘नॅशनल इंस्टिटय़ूट ऑफ बँकिंग’ या संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये खासगी आणि शासकीय बँकांमध्ये चांगल्या संधी मिळतात. ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतील एम.एस्सी इन फायनान्स हा अभ्यासक्रमसुद्धा अशी संधी मिळवून देऊ  शकतो. तसेच ‘टाइम्सेप्रो’ या संस्थेमध्येही एमबीए इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस हे अभ्यासक्रम केल्यावर खासगी बँकांमध्ये संधी मिळू शकते.
ग्रामीण बँकांतील विविध पदांच्या निवडीसाठी आयबीपीएसमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. येत्या काळात आपल्या देशातील बँकिंग सेवांची व्याप्ती फार मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात मोठी भरती केली जात आहे. आयबीपीएसमार्फत पुढील काही महिन्यांत जवळपास काही हजार पदे भरली जातील.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on July 29, 2017 1:44 am
Web Title: career guidance career issue 3


 

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग

पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.

रोहिणी शहा  | Updated: July 28, 2017 1:42 AM 
मुख्य परीक्षेच्या वेगवेगळ्या पेपर्समध्ये संबंधित विभागाशी जोडून भारतीय कृषिव्यवस्थेचे वेगवेगळे आयाम विभाजीत करण्यात आले आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक्रमाची फेररचना कशा प्रकारे करावी, त्याची चर्चा मागच्या लेखामध्ये करण्यात आली आहे. पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे. पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगास अपेक्षित आहे. स्वतंत्र कृषी घटक म्हणून या सर्व पलूंचा एकत्रित अभ्यास करावा की त्या त्या पेपर्सबरोबर करावा हा आपल्या सोयीप्रमाणे घ्यायचा निर्णय आहे. दोन्ही पेपर्समध्ये कृषी हा उपघटक स्वतंत्र मुद्दा म्हणूनच देण्यात आला आहे. या घटकाच्या सगळ्या पेपर्समधील मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत या व पुढील लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.
संकल्पनात्मक मुद्दे

  • कृषीविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधी समजून घ्याव्यात. यामध्ये मृदेची निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायला हवी. मृदेचे घटक विशेषत: पीकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्वे, त्यांचे महत्त्व, त्यांच्या आभावामुळे व अतिपुरवठय़ामुळे पिकांवर होणारे परिणाम (रोग / नुकसान) या बाबी समजून घ्याव्यात. यांच्या नोट्स टेबलमध्ये काढता येतील. मृदेची धूप व दर्जा कमी होणे या समस्या कारणे, उपाय, परिणाम अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाव्यात. मृदा संधारणाची गरज, आवश्यकता, त्यातील घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात.
  • कृषी उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या जलव्यवस्थापनाचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे. मान्सूनची निर्मिती, महाराष्ट्रातील मान्सूनचे वितरण व त्या आधारे करण्यात आलेले महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभाग अशा क्रमाने संकल्पना व तथ्ये समजून घ्यावीत.
  • पर्जन्याश्रयी शेती, सिंचित शेती इत्यादी सिंचनावर आधारित शेतीचे प्रकार व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. पाटबंधाऱ्यांचे प्रकार, वैशिष्टय़े, महत्त्व माहीत असायला हवेत. जलसंधारणाचे महत्त्व, प्रकार, घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात. या दोन्हींमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी माहीत असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इ. बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल. याबाबत शासनाच्या नव्या योजनांची माहिती असायला हवी.
  • मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या क्षेत्रांची वैशिष्टय़े, गरजा, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व इत्यादी पलू व्यवस्थित समजून घ्यावेत. या क्षेत्रांच्या संवर्धनासाठीचे शासकीय उपाय व योजना इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. कृषीक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, हरितक्रांती, यांत्रिकीकरण, जीएम बियाणी यांचे स्वरूप, महत्त्व, परिणाम यांची समज विकसित व्हायला हवी. तंत्रज्ञानाच्या वापराचे आíथक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत. समस्या व उपायांचा आढावा घ्यावा व चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.
  • महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यासस्वरूप, समस्या, कारणे, उपाय या चार पलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नसíगक स्थान, स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीक पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, औद्योगिक व इतर प्रदूषकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
  • शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुद्ध वापर करणे आवश्यक आहे. कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी एम बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे याचा अभ्यास गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
भारतीय कृषिव्यवस्था या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे तर तथ्यात्मक व विश्लेषणात्मक भाग पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या भागाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
First Published on July 28, 2017 1:42 am
Web Title: indian agriculture is conceptual part
 

पंचायत महिला शक्ती अभियान पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

पंचायत महिला शक्ती अभियान

पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 1:39 AM
पंचायत राज संस्थांमधून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
  • पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत विभागनिहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.
  • पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्य़ातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा ३३ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ अशा ९९ सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या ९९ सदस्यांतून १८ प्रतिनिधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते.
  • लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या संघाची जबाबदारी
  • लैंगिक अन्याय, बालकांचे शोषण, अस्पृश्यता संबंधित विषयाबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे.
  • या बाबतचे ठराव घेऊन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणे.
  • महिला सबलीकरणासाठी कृती आराखडा सादर करणे.
  • चार्टर ऑफ डिमांडमध्ये मान्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणे.
  • या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्ह्य़ात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्य़ातील ३ महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकोरी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या ५ जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर २ महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.
  • अधिक माहितीसाठी https://rdd.maharashtra.gov.in/1041/Panchayat-Mahila-Shakti-Abhiyan?format=print
First Published on July 28, 2017 1:39 am
Web Title: panchayat mahila shakti abhiyan 2

Tuesday, July 25, 2017

नोकरीची संधी संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.

द. वा. आंबुलकर | Updated: July 21, 2017 1:55 AM 
खाण संरक्षण मंत्रालयात उप-संचालकांच्या २० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै.
इन्कम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये दिल्ली येथे स्टेनोग्राफर्सच्या ७ जागा-
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली आयकर विभागाची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, प्रिंसिपल बेंच, इन्कम टॅक्स सेटलमेंट कमीशन, ४ था मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जुलै.
केंद्र सरकारच्या युवा कल्याण मंत्रालयात युवा अधिकाऱ्यांच्या ८ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै.
जीएसपीसी एलएनजी लिमिटेडमध्ये शिफ्ट ऑपरेटर/ टेक्नीशियन्सच्या ८ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी जीएसपीसी- एलएनजीच्या www.gspcgroup.com या संकेतस्थळावरील GSPCLNG/ latest- opening या लिंकला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जीएसपीसी एलएनजी लिमिटेड, बी-१०३, पहिला मजला, आयटी- टॉवर-२, इन्फोसिटी, इन्ट्रोडिया सर्कल जवळ, गांधीनगर, गुजरात- ३८२००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ जुलै.

अ‍ॅक्सिस बँकेत मुंबईसह विविध ठिकाणी प्रशिक्षणार्थी पदाच्या संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली अ‍ॅक्सिस बँकेची जाहिरात पहावी अथवा बँकेच्या www.axisbank.com या संकेतस्थळावरील careers या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.
नॅशनल हाय वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये उप-व्यवस्थापक (टेक्निकल) च्या ४० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल हाय-वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा अ‍ॅथॉरिटीच्या www.nhai.org या संकेतस्थळावरील About us-recruitment या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै.
First Published on July 21, 2017 1:55 am
Web Title: job opportunities job issue 2


 

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास – १ या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता.

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास – १

या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता.

श्रीकांत जाधव | Updated: July 20, 2017 1:25 AM 
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकाची माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून समजली जाते. आजच्या लेखामध्ये आपण १८वे शतक आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. गतवर्षीच्या मुख्यपरीक्षामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या आधारे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या बाबींकड लक्ष देणार आहोत.
सर्वप्रथम आपण या घटकाची थोडक्यात माहिती घेऊ या. १८ व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़े सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती, त्यामुळे सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा मुघल साम्राज्याचा नावलौकिक कायम राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता. यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा. बंगाल, अवध आणि हैदराबाद), तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा. मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररीत्या उदयाला आलेल्या होत्या (उदा. राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच याच्या जोडीला १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेले व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, ब्रिटिश/इंग्रज, दानिश आणि फ्रेंच) होताच. त्यांची भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वतची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजाचा झालेला विजय या महत्त्वाच्या घटनांच्या सखोल माहितीचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. याचबरोबर भारतामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच याच्या जोडीला ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम या अंतर्गत आपणाला राजकीय आíथक, सामाजिक व  सांस्कृतिक परिणामाची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य व  ब्रिटिशांनी भारतामध्ये स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था आणि ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा परिणाम, याचबरोबर या कालखंडातील भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती व त्यांनी केलेले कार्य याची माहिती असणे गरजेचे आहे. भारतीयांनी या कालखंडामध्ये ब्रिटिशांना कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला होता व या प्रतिसादामुळे भारतीयांच्या राजकीय, आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये नेमका कोणता बदल झालेला होता, याची सखोल माहिती असावी लागते. अशा पद्धतीने या घटकाचा अभ्यास आपणाला करावा लागतो हे खालील मागील काही वष्रे विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या विश्लेषणांवरून आपण समजून घेऊ शकतो.
२०१३मधील मुख्य परीक्षेत, ‘वेगवेगळ्या पद्धतीने लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताचा पाया रचला. विस्तार करा.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न समजून घेताना आपणाला लॉर्ड डलहौसीने  राजकीय, आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीची कामगिरी केलेली होती याचा दाखला द्यावा लागतो. तसेच त्याने आधुनिक भारताचा पाया कसा रचला याचे कारणमीमांसेसहित उत्तर लिहावे लागते. यामुळे उत्तर अधिक मुद्देसुद्द व समर्पक आणि प्रश्नांचा योग्य आशय प्रमाणित करणारे ठरते.
२०१४ च्या मुख्य परीक्षेत ‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’ हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आह. याचे आकलन करताना आपणाला १५२६मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. त्यानुसार हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते. हा प्रश्न परीक्षार्थीचे विषयाचे ज्ञान व समज कशी आहे याचा कस लावणारा आहे. याच वर्षी ‘ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या १८व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यपर्यंतच्या विविध पलूचे समीक्षात्मक विश्लेषण करा’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे आकलन करताना आपणाला ब्रिटिश ध्येयधोरणे ही ब्रिटिश साम्राज्यवादाला कशी पूरक होती आणि जास्तीतजास्त याचा फायदा व्यापारासाठी कसा होईल हा मूलभूत विचार ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या रणनीतीचा भाग होता हे समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार काळानुरूप ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या रणनीतीमध्ये कोणते बदल करण्यात आले याचा उदाहरणासह परामर्श उत्तरामध्ये देणे अपेक्षित आहे.

२०१५च्या मुख्य परीक्षेत या कालखंडाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. २०१६च्या मुख्य परीक्षेत ‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटिश धोरणे याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे, त्याशिवाय हा प्रश्न योग्य पद्धतीने लिहिता येत नाही कारण १८५७च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आलेले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तरे लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते व १८५७च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.
उपरोक्त प्रश्नाच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी आपणाला बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथाचा उपयोग होतो. यापुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on July 20, 2017 1:25 am
Web Title: history of modern india 4

 

फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण फ्लोरोसिस बाधित रुग्णांवर सर्वसमावेशक उपाययोजना व त्यांचे व्यवस्थापन.

फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण

फ्लोरोसिस बाधित रुग्णांवर सर्वसमावेशक उपाययोजना व त्यांचे व्यवस्थापन.

लोकसत्ता टीम | Updated: July 20, 2017 1:23 AM 
देशातील १९ राज्यामध्ये आढळून आलेल्या फ्लोरोसिस रुग्णांच्या संख्येच्या आधारावर जास्त रूग्ण आढळलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित झाले आहे.
फ्लोराईडचा उगम
फ्लोराईडचा प्रमुख स्त्रोत फ्लोराईड युक्त पाणी आहे, तसेच चहा, तंबाखू, सुपारी इत्यादी विविध घटकांमध्ये अल्प प्रमाणात फ्लोराईड आढळते. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण १ ते १.५ मिलीग्रॅम/ लिटर (पी.पी.एम.) पेक्षा जास्त फ्लोराईड असल्यास अशा फ्लोराईडयुक्त पाण्याच्या सतत सेवनाने फ्लोरोसिस हा विकार होतो.
कार्यक्रम

  • देशातील १९ राज्यातील २३० जिल्हे फ्लोरोसिस विकाराने बाधित असल्याचे आढळून आल्यानुसार, राज्यांची तीव्रतेनुसार अति तीव्र, तीव्र, मध्ययम व कमी प्रमाणातील फ्लोरोसिस बाधित राज्ये अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने फ्लोरोसिस या विकाराची दखल घेउन विशेष व प्राधान्याने कार्यवाही करण्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला निर्देश दिले.
उद्दीष्टे
  • पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे फ्लोराईडसाठी परिक्षण व त्या पाण्याच्या स्त्रोतांवर अवलंबून असलेल्या लोकांची माहिती घेवून त्याचे संकलन.
  • फ्लोरोसिस बाधित रुग्णांवर सर्वसमावेशक उपाययोजना व त्यांचे व्यवस्थापन.
  • फ्लोरोसिस विकाराचा प्रतिबंध, निदान व व्यवस्थापनासाठी क्षमता बांधणी.
  • वैद्यकिय अधिकारी व संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फ्लोरोसिस विकार प्रतिबंध, निदान, विकारावरील उपाययोजना व रुग्णांचे पुनर्वसन यासाठी प्रशिक्षित करणे.
  • जिल्हा स्तपरावरील व्यंगोपचार व पुर्नवसन यासाठी क्षमता बांधणी.
  • पाणी नमुने व रूग्णांचे मुत्र नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये सुविधा निर्माण व विकास.
  • विकाराबाबत माहिती, लोकांमध्ये जागृतीसाठी शिक्षण व विविध संवाद साधनाचा वापर करुन विकाराचे प्रतिबंधक उपाय व योजनांची माहिती देणे.
  • विकारांचे वैयक्तिक पातळीवर निदान व त्यासंबंधी उपाययोजना.
  • अधिक माहितीसाठी: http://arogya.maharashtra.gov.in/Site/ Form/Disease Content. aspx? CategoryDetailsID=OV5EmeUkebE=
First Published on July 20, 2017 1:23 am
Web Title: prevention and control of fluorosis
 

नोकरीची संधी उपलब्ध डेटा पाहता १० सहयोगी बँकांमध्ये ३,२४७ पदांची भरती आहे.

नोकरीची संधी

उपलब्ध डेटा पाहता १० सहयोगी बँकांमध्ये ३,२४७ पदांची भरती आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत येणाऱ्या २० शेडय़ुल्ड बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती.
उपलब्ध डेटा पाहता १० सहयोगी बँकांमध्ये ३,२४७ पदांची भरती आहे. (यूआर – १,७२३, इमाव – ८०६, अजा – ४८२, अज – २३७) (विकलांग एचआय- ५१, ओसी – ५३, व्हीआय – ३८ )
वेळोवेळी रिक्त पदांचा तपशील आयबीपीएसच्या संकेतस्थळावर अपडेट केला जाईल. महाराष्ट्रात एकूण १७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.
पात्रता – दि. ६ ऑगस्ट २०१७ रोजी पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. १ जुल २०१७ रोजी २० ते ३० वष्रे (उच्चतम वयोमर्यादा शिथिलक्षम अजा/अज – ५वष्रे, इमाव -३ वष्रे, विकलांग -१० वष्रे). अजा/अज/ अल्पसंख्याक उमेदवारांना प्रि एक्झामिनेशन ट्रेिनग विनामूल्य देण्यात येईल. (महाराष्ट्रातील केंद्रे – मुंबई, नागपूर, पुणे, पणजी (गोवा)) तसे त्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना नमूद करावे.
परीक्षा शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/ विकलांग यांना रु. १००/-).
निवड पद्धती – (१) ऑनलाइन प्रीलिम एक्झाम – इंग्रजी भाषा ३० प्रश्न/गुण क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूूड – ३५ प्रश्न/गुण, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न/गुण अशा एकूण १०० गुणांसाठी कालावधी ६० मिनिटे.
(२) मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षेव्यतिरिक्त जनरल अवेअरनेस (बँकांच्या संदर्भावर अधिक भर) आणि कॉम्प्युटर नॉलेज या विषयांचीदेखील परीक्षा होईल.
एकूण २०० गुण प्रत्येक सेक्शनला कालावधी ठरलेला आहे. एकूण कालावधी १४०मिनिटे.
(३) मुलाखत. आयबीपीएस परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा हक्क राखून ठेवत आहे. याची माहिती वेबसाइटवर दिली जाईल. ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर CWE/PO/MT िलकवर दि. ६ ऑगस्ट ते २६ऑगस्ट २०१७ पर्यंत भरता येईल.
First Published on July 20, 2017 1:22 am
Web Title: job opportunities job issue
 

 

एमपीएससी मंत्र : विज्ञान व तंत्रज्ञान विकास अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.


एमपीएससी मंत्र : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

रोहिणी शहा | Updated: July 19, 2017 1:58 AM 
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर – ४ मध्ये अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. अभ्यासक्रम पाहिल्यावर हे लक्षात येते की ‘तंत्रज्ञान’ व त्याचा मानवी कल्याणासाठी वापर या अनुषंगाने अभ्यास करणे आयोगाला अभिप्रेत आहे.
*  ऊर्जा पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने – सौर, वारा, जैववायू, जीववस्तुमान, भूऔष्णिक व इतर नवीकरणयोग्य ऊर्जा साधनांची संभाव्यता, सौर साधने -सौरकुकर, पाणीतापक, इ. बायोगॅस तत्त्वे व प्रक्रिया, शासकीय धोरणे आणि वीजनिर्मितीसाठी कार्यक्रम- अणुशक्ती, औष्णिक वीज, जलविद्युत. वीज वितरण व राष्ट्रीय विद्युतपुरवठा, ऊर्जा संकट, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यात गुंतलेली अभिकरणे व संस्था.
*  संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, माहितीची देवाणघेवाण, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान यांसारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील त्याचे उपयोजन, विविध सेवांमधील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मीडिया लॉब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, कम्युनिटी माहिती केंद्र, इ.सारखे शासकीय कार्यक्रम, सायबर गुन्हे, त्यावरील प्रतिबंध, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील महत्त्वाचे प्रश्न- त्याचे भवितव्य.
*  अवकाश तंत्रज्ञान – भारतीय अवकाश कार्यक्रम, दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण, प्रसारण, हवामान अंदाज, जीपीएस, आपत्ती इशारा याकरिता भारतीय कृत्रिम उपग्रह, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम, सुदूर संवेदना, भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) आणि हवामान अंदाज, आपत्ती इशारा यामधील तिचे उपयोजन, जल, मृदा, खनिज संपत्ती विकास, कृषी व मत्स्यविकास, नागरी नियोजन, पारिस्थितीकी अभ्यासक्रम, भौगोलिक यंत्रणा व भौगोलिक माहिती यंत्रणा.
*  जैव तंत्रज्ञान – कृषी, औद्योगिक विकास व रोजगारनिर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संभाव्य शक्यता, नसíगक साधनसंपत्ती विकासाचे आवश्यक व महत्त्वाचे साधन म्हणून जैवतंत्रज्ञान उपयोजनाची क्षेत्रे –  कृषी, पशुपदास व पशुवैद्यकी, औषधनिर्माणविद्या, मानवी आरोग्य, अन्न तंत्रज्ञान, ऊर्जानिर्मिती, पर्यावरण संरक्षण, इ. देशातील जैवतंत्रज्ञानाबाबत प्रचालन, नियमन व विकासामधील शासनाची भूमिका व प्रयत्न, जैवतंत्रज्ञानाशी संबंधित नतिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्न, जैवतंत्रज्ञान विकासाचे संभाव्य प्रतिकूल परिणाम, बियाणे तंत्रज्ञान, त्याचे महत्त्व, बियाणांची गुणवत्ता, प्रकार आणि उत्पादन व प्रक्रिया तंत्रे, बी.टी. कापूस, बी.टी. वांगे, इ.
*  भारताचे आण्विक धोरण – ठळक वैशिष्टय़े, ऊर्जेचा स्रोत आणि स्वच्छ ऊर्जा म्हणून अणुऊर्जा, त्याचे महत्त्व, आण्विक कचऱ्याची समस्या, भारतातील औष्णिक वीजनिर्मिती, एकूण वीजनिर्मितीमधील त्याचे अंशदान, आण्विक चाचणी निर्धारके – पोखरण एक (१९७४) आणि पोखरण दोन (१९९८) न्यूक्लिअर नॉन-प्रोलिफरेशन ट्रिएटी आणि कॉप्रेहेन्सिव टेस्ट बॉन ट्रिएटी यांसारख्या आण्विक धोरणांबाबतचा अलीकडला कल, २००९चा इंडो-यूएस न्यूक्लिअर करार.
*  आपत्ती व्यवस्थापन -आपत्तीची व्याख्या, स्वरूप, प्रकार व वर्गीकरण, नैसर्गिक धोके, कारणीभूत घटक व ते सौम्य करणारी उपाययोजना, पूर, भूकंप, त्सुनामी, दरड कोसळणे, इ. सौम्य करणाऱ्या उपाययोजनांवर परिणाम करणारे घटक,

किल्लारी (१९९३), भूज (२००१), सिक्कीम-नेपाळ (२०११) भूकंप, बंदा आले (२००४) (सुमात्रा), फुकुशिमा (२०११) (जपान) भूकंप व त्सुनामी यांसारख्या मोठय़ा भूकंप व त्सुनामी प्रकरणांचा अभ्यास, महाराष्ट्र २००५चा मुंबईतील पूर,
डिसेंबर १९९३, जून २००६, नोव्हेंबर २००९,
जुलै २०११चे बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला, त्यांचा परिणाम.
First Published on July 19, 2017 1:58 am
Web Title: useful tips for mpsc exam 2017

 

 

नोकरीची संधी एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.

नोकरीची संधी

एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.

  दि नॅशनल स्मॉल इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसआयसी) (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम) (जाहिरात क्र. १७/००३) मध्ये पुढील पदांची भरती.

(१) अकाऊंट्स ऑफिसर – १७ पदे (अज -३, इमाव – १, यूर्आ – १३).
वयोमर्यादा – ३० वर्षे .
पात्रता – बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए. इ.
अनुभव – बी.कॉम. साठी ५ वर्षे ,
इतरांसाठी १ वर्ष.
(२) डेप्युटी मॅनेजर – २२ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ४, खुला – १४) विकलांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – ३५ वर्षे .
पात्रता –
-बिझनेस डेव्हलपमेंट मार्केटिंगसाठी पदवी  एमबीए (मार्केटिंग),
-टेक्नॉलॉजीसाठी – मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्समधील इंजिनीअरिंग पदवी.
-फायनान्स अँड अकाऊंट्स
(६ पदे. इमाव – १, यूआर – ५).
पात्रता – बी.कॉम.  एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
(३) डेप्युटी जनरल मॅनेजर.
वयोमर्यादा – ४५ वर्षे .
बिझनेस डेव्हलपमेंट/मार्केटिंग – ७ पदे.
पात्रता – पदवी  एमबीए.
टेक्नॉलॉजी /आयटी/सिव्हिल/
लॉ अँड रिकव्हरी.
पात्रता – संबंधित विषयातील पदवी.
फायनान्स अँड अकाऊंट्स – ४ पदे.
पात्रता – बी.कॉम.  एमबीए.
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी १०वर्षांचा अनुभव आवश्यक.
ऑनलाइन अर्ज www.nsic.co.in या संकेतस्थळावर दि. २१ जुलै २०१७पर्यंत करावेत.
*  भारतीय ताराभौतिकी संस्थान (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स)
(एक स्वायत्त संस्था) बंगळुरु – ५६० ०३४ (जाहिरात क्र. ११ए/७/२०१७ दि. २० जून २०१७).  इंजिनीअर पदवीधर/ पदविकाधारक/एमएस्सी उमेदवारांची भरती.
(१) प्रोजेक्ट इंजिनीअर (मेकॅनिकल/ सॉफ्टवेअर/ऑप्टिक्स) एकत्रित वेतन
रु. ५०,०००/-.
पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी/पदव्युत्तर पदवी.
(२) प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-(मेकॅनिकल)-मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदविका.
(३) प्रोजेक्ट सायंटिफिक असोसिएट-(फिजिक्स/ऑप्टिक्स) बीई – (इन्स्ट्रमेंटेशन/ ऑप्टिक्स) एकत्रित वेतन रु. ४०,०००/-.
(४) इंजिनीअर ट्रेनी – बीई (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इन्स्ट्रमेंटेशन).
(५) रिसर्च ट्रेनी – एम्एस्सी ऑप्टिक्स/फोटोनिक्स/फिजिक्स/इन्स्ट्रमेंटेशन
ट्रेनी पदांसाठी एकत्रित वेतन रु. २०,०००/-. ऑनलाइन अर्ज    या संकेतस्थळावर दि. १९ जुल २०१७ पर्यंत करावेत.
*  अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन (ईएसएसओ), मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, भारत सरकार, गोवा यांच्या नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅन्टार्टकि अँड ओशन रिसर्च
(जाहिरात क्र. एनसीएओआर/३९/१७) ऑफिसर (५ पदे) आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (१० पदे) यांची भरती.
(१) ऑफिसर फायनान्स अँड अकाऊंट्स,
ऑफिसर (पच्रेस अँड स्टोअर्स)/(अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड सर्व्हिसेस).
पात्रता – पदव्युत्तर पदवी  ३ वर्षांचा अनुभव.
(२) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. फायनान्स अँड अकाऊंट्स,  प्रोक्युरमेंट अँड स्टोअर्स,  अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सíव्हसेस.
पात्रता – पदवी ६ वर्षांचा अनुभव. ही सर्व पदे १ वर्षांच्या काँट्रक्ट बेसिसवर असून प्रोजेक्ट संपेपर्यंत दरवर्षी कामगिरीवर आधारित वर्षभरासाठी वाढवून दिली जातील.
वयोमर्यादा – ३५ वर्षे . ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज या संकेतस्थळावर दि. ३१ जुलै २०१७पर्यंत करावेत.
First Published on July 19, 2017 1:49 am
Web Title: jobs in india job vacancies in india job opportunities in india 3
0
Shares


 

Wednesday, July 19, 2017

नोकरीची संधी प्रवेश १०वीच्या गुणवत्तेनुसार होईल.

नोकरीची संधी

प्रवेश १०वीच्या गुणवत्तेनुसार होईल.

सुहास पाटील | Updated: July 15, 2017 1:10 AM

वुमन्स आयटीआय (महिलांकरिता प्रादेशिक व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण संस्था) काशिनाथ धुरू मार्ग, दादर (प.), मुंबई – ४०० ०२८ येथे ऑगस्ट, २०१७ (तिसरा आठवडा)पासून सुरू होणाऱ्या पूर्ण वेळ कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी १०वी उत्तीर्ण महिलांकरिता प्रवेश.
(अ) १ वर्ष मुदतीचे कोस्रेस.
(१) कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोसेसिंग असिस्टंट
(४० जागा),
(२) ड्रेस मेकिंग (१६ जागा),
(३) सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्रजी) (२० जागा),
(४) बेसिक कॉस्मेटॉलॉजी (२० जागा),
(५) डेस्क टॉप पब्लििशग ऑपरेटर (२० जागा).
पात्रता – १० वी उत्तीर्ण.
(ब) दोन वर्ष मुदतीचे कोस्रेस.
(१) आíकटेक्चरल ड्राफ्ट्समनशिप (२० जागा),
(२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (२० जागा).
पात्रता – बारावी (गणित व विज्ञान विषयासह) उत्तीर्ण. उमेदवारांचे किमान वय १५ वष्रे असावे. प्रवेश १०वीच्या गुणवत्तेनुसार होईल.
प्रशिक्षण शुल्क – रु. १५०/- प्रति महिना (अजा/अजसाठी रु. ५०/- प्रति महिना).
अर्ज www.dget.nic.in किंवा rvtimumbai.ac.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २१ जुल २०१७ सायं. ४ वाजेपर्यंत. दि. २८ जुल रोजी सायं. ४ वाजता संस्थेच्या सूचना फलकावर प्रवेश सूची प्रदíशत होईल.
आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – ४११ ०२१ येथे ज्युनियर रिसर्च फेलोशिपच्या ७ जागा.
पात्रता – (१) मेकॅनिकल/मेटॅलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ एअरोनॉटिकल/एअरोस्पेस इंजिनीअरिंग पदवी किंवा एमएस्सी (फिजिक्स/अ‍ॅप्लाइड फिजिक्स/मॅथ्स/केमिस्ट्री/कॉम्प्युटर सायन्स/आयटी) प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण.
(२) एनईटी/जीएटीई स्कोअर. स्टायपेंड – रु. २५,०००/- दरमहा एचआरए कॉन्टीन्जन्सी ग्रँट नियमांप्रमाणे दिली जाईल. यूजीसी/सीएसआयआर/एनईटी/जीएटीई परीक्षा उत्तीर्ण आहेत असेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – २८ वष्रे (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रे).
वॉक इन इंटरव्ह्य़ूसाठी पात्र उमेदवारांनी दि. १५ जुल २०१७ रोजी सकाळी ९.३०वाजता वरील पत्त्यावर बायोडेटा आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ८ जुल २०१७ च्या अंकात जाहिरात पहावी.
पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे – ४११०६७ येथे गट च्या १३८ पदांची भरती.
पद क्र. (१) पशुधन पर्यवेक्षक (११४पदे)
(महिला – ३६, मा.स. – १५, प्रकल्पग्रस्त – ५, भूकंपग्रस्त -२ खेळाडू – ५, अंशकालीन – १०) अपंग प्रवर्गासाठी ८ पदे. अस्थिव्यंग (ओएल) व ८ पदे कर्णबधिर (एचएच) साठी राखीव.
पात्रता – १०वी पशुधन पर्यवेक्षक/पशुधन व्यवस्थापन/बीव्हीएस्सी उत्तीर्ण.
(२) वरिष्ठ लिपिक (१० पदे).
पात्रता – पदवी उत्तीर्ण.
(३) लिपिक टंकलेखक (७ पदे). पात्रता – पदवी उत्तीर्ण  मराठी टंकलेखक ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
(४) लघुलेखक (उच्चश्रेणी) (१ पद).
(५) लघुलेखक (निम्न श्रेणी) (१ पद).
पात्रता – पद क्र. ४ व ५ साठी १०वी इंग्रजी व मराठी १२०/१०० श.प्र.मि. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण  इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
(६) वाहन चालक (५ पदे).
पात्रता – १०वी उत्तीर्ण  हेवी व लाईट मोटार वाहन चालविण्याचा परवाना ३ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – दि. ६ जुल २०१७ रोजी
१८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रे, अपंग/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त/अपंग माजी सनिक इ. ४५ वष्रे; अंशकालीन – ४६ वष्रे;
खेळाडू – ४३ वष्रे).
परीक्षा शुल्क – रु. ३००/-
(मागासवर्गीय रु. १५०/-).
निवड पद्धती – लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची पद क्र. १ ते ३ साठी २०० गुणांची – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी (पशुधन पर्यवेक्षक पदासाठी २०० पकी ८० गुण तांत्रिक विषयावर आधारित असतील.) लघुलेखक पदांसाठी १२० गुणांसाठी लेखी परीक्षा वाहनचालक पदासाठी ५० गुण सामान्यज्ञान आणि ५० गुण कौशल्य तपासणी.
ऑनलाइन अर्ज http://www.ahd.maharashtra.gov.in तसेच  http://cahexam.com/ या संकेतस्थळांवर दि. २६ जुल २०१७ पर्यंत करावेत.
First Published on July 15, 2017 1:10 am
Web Title: job opportunities 79

Tuesday, July 18, 2017

एमपीएससी मंत्र : परीक्षेला जाता जाता.. या दृष्टीने करंट ग्राफ वार्षकिी २०१७ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

एमपीएससी मंत्र : परीक्षेला जाता जाता..

या दृष्टीने करंट ग्राफ वार्षकिी २०१७ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

वसुंधरा भोपळे | Updated: July 14, 2017 12:52 AM
0
Shares

विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन तसेच अभ्यास्रोत याबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. आता परीक्षा अगदीच तोंडावर आली आहे तर परीक्षेला जाता जाता नेमक्या कोणत्या घटकांवर भर द्यावा आणि परीक्षेच्या दिवशी पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल या लेखात माहिती घेऊयात. परीक्षेला जाता जाता काही अत्यावश्यक घटकांची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते तर ते घटक खालीलप्रमाणे आहेत.
चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 
हा घटक पूर्व तसेच मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी आहे. हा घटक अभ्यासताना परीक्षेच्या किमान एक वर्ष अगोदर घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्यावे लागतात. या दृष्टीने करंट ग्राफ वार्षकिी २०१७ हे पुस्तक उपयुक्त ठरेल. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था भारतीय राजकारण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल, नवीन लागू झालेल्या करप्रणाली, जागतिक उच्चांक, राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अधिनियम, विविध योजना, विविध क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरी या घटकांवर विशेष भर द्यावा. या घटकावर साधारणपणे १५ ते २० प्रश्नांचा समावेश होतो.
नागरिकशास्त्र 
या विभागांतर्गत भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास तसेच ग्रामप्रशासन आणि राज्यव्यवस्थापन यांमधील मूलभूत संकल्पनांचे आकलन या घटकांवर विशेष भर द्यावा. साधारणपणे ८ ते १२ प्रश्न या घटकावर विचारले जातात.
आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास  –
या विभागांतर्गत भारतातील स्वातंत्र्यलढय़ात महाराष्ट्राचे योगदान, ब्रिटिशांची धोरणे, कायदे, राष्ट्रीय सभा आणि अधिवेशने, सामाजिक-धार्मिक सुधारणा, महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर विशेष भर द्यावा. या विभागावर साधारणपणे १२ ते १५ प्रश्न विचारण्यात येतात.
भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह –
या विभागांतर्गत भुरूपे, वारे, पर्यटनस्थळे, मानवी भूगोल, आदिवासी जमाती, अक्षांश, रेखांश, बंदरे, पर्वत, उद्योगधंदे या घटकांवर अधिक भर असून अभ्यासक्रमातील इतर घटक म्हणजे ते महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, पृथ्वी, जगातील हवामान विभाग या घटकांवर देखील भर देणे अपेक्षित आहे. या विभागावर साधारणपणे १२ ते १४ प्रश्न विचारले जातात.
अर्थव्यवस्था –
या विभागांतर्गत पंचवार्षकि योजना, चलनव्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक उद्योगांची सद्यस्थिती, विविध समित्या सरकारी धोरणे, वित्त आयोग व शिफारसी, परकीय गुंतवणुकीचे प्रवाह, बेरोजगारी मापनाचे निकष, मानव विकास निर्देशांक, जीडीपी कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास अशा मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. या विभागावर साधारणपणे १० ते १४ प्रश्न विचारण्यात येतात.
सामान्य विज्ञान –
यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र यांतील मूलभूत संकल्पनांवर आधारित घटकांवर विशेष भर द्यावा. या घटकावर साधारणपणे १२ ते १६ प्रश्न विचारण्यात येतात.
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित –
या विभागामध्ये दहावीच्या स्तरापर्यंतची गणिते आणि बुद्धिमापनविषयक प्रश्न विचारले जातात. यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता आहे. या विभागावर साधारणपणे १३ ते १५ प्रश्न विचारले जातात.
पेपर सोडविण्याचे तंत्र
परीक्षेच्या दिवशी पेपर सोडविताना आपली खरी कसोटी असते ती म्हणजे एका तासात शंभर प्रश्न सोडविण्याची. प्रश्नपत्रिका सोडविताना सर्व प्रथम आपल्याला अचूक माहिती असणारे प्रश्नच सोडवावेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न पेपर सुरू झाल्यानंतर २० ते २५ मिनिटांनी घ्यावेत जेणेकरून या घटकावर पूर्ण लक्ष देऊन कमी वेळात जास्त प्रश्न सोडविता येतील. यातूनही एखादा प्रश्न अधिक वेळ खाऊ आहे असे वाटल्यास तो प्रश्न सोडून पुढे जावे व सोपे प्रश्न सोडवून अधिकाधिक मार्क कसे मिळविता येतील याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर उर्वरित इतर घटकांच्या प्रश्नांकडे मोर्चा वळवावा. काही विधानांवर आधारित प्रश्न तर विद्यार्थ्यांकडून क्षुल्लक चुका व्हाव्यात असेच बनविलेले असतात असे प्रश्न हेरून ते सोडविताना विशेष लक्ष ठेवावे लागते. उदा. खालीलपकी अचूक नसलेले कोणते विधान नाही? याचा अर्थ बरोबर विधान ओळखायचे असते परंतु शब्दरचनेतील बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो तेव्हा असे प्रश्न असतील तेव्हा अधिक जागरूक राहून प्रश्न सोडवावा आणि होणाऱ्या क्षुल्लक चुका टाळाव्यात.  विद्यार्थी मित्रहो, एकंदरीतच येत्या १६ तारखेला जय्यत तयारीनिशी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. परीक्षेसाठी हार्दकि शुभेच्छा!
First Published on July 14, 2017 12:52 am
Web Title: mpsc exam preparation

करिअरमंत्र किंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू

करिअरमंत्र

किंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू

सुरेश वांदिले | Updated: July 14, 2017 12:47 AM
0
Shares

मी टीवाय बी. कॉमची परीक्षा दिली आहे. मला बँकिंग क्षेत्रात रस आहे. बँकिंग आणि फायनान्स किंवा बँकिंग आणि इन्शुरन्स यांपैकी कोणता पर्याय चांगला राहील? मी काही संस्थांची निवड करून ठेवली आहे. पुण्यातील एनआयबीएम ही संस्था कशी आहे
श्रिया नेर्वेकर
श्रिया, तू बँकिंग क्षेत्रात जाण्याचे मनापासून ठरवल्याने तुला या क्षेत्रात निश्चितच यश मिळेल ही खात्री बाळग. बँकिंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू शकतात. नॅशनल  इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट-एनआयबीएम या संस्थेमार्फत चालविण्यात येणारा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस हा चांगला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध बँकांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.
मी सध्या दहावीची परीक्षा दिली आहे. मला यूपीएस्सीची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी मी ११वी-१२वीमध्ये कोणते विषय घेऊ ? त्यासाठी तयारी कशी करू?
ओमकार देशमुख
ओमकार, यूपीएस्सीद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरीसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत ऐच्छिक विषयाचा पेपर असतो. त्याचा अभ्यास आतापासूनच केल्यास ही परीक्षा देताना त्याचा फायदा होऊ  शकतो. त्यामुळे तुला आवड आणि गती असलेल्या विषयांची निवड करू शकतोस. नागरी सेवा परीक्षा देणारे बरेच विद्यार्थी हे कला शाखेतील इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा भाषा हे विषय निवडतात.
विद्यार्थ्यांचा हा कल पाहता तू सुद्धा कला शाखेतील विषय निवडण्यास हरकत नाही. मात्र या विषयांचा परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. पदवी परीक्षेच्या पलीकडे जाऊन या अभ्यासक्रमांचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी विषयाच्या मूलभूत संकल्पना स्वयंस्पष्ट व्हायला हव्यात. मूळ दर्जेदार पुस्तके वाचायला हवीत. स्वत:च्या नोट्स काढायला हव्यात. शिवाय संबंधित विषयाच्या अनुषंगाने जे काही आधुनिक प्रवाह, नवे संशोधन, नवी माहिती असेल त्याकडेही लक्ष द्यावे लागेल. यासाठी चौफेर वाचनाची सवय लावावी लागेल. संबंधित विषयाच्या तज्ज्ञाकडून असे साहित्य मिळवावे लागेल.
माझ्या मुलाला वैमानिक व्हायचे आहे. कोणता अभ्यासक्रम केल्यास तो सहजतेने वैमानिक होऊ  शकेल?
विरेन ठेंगे
विरेनजी, सहजतेने वैमानिक होऊ शकेल असा तर अभ्यासक्रम कुठेही उपलब्ध नाही. वैमानिक होण्यासाठी डायरेक्टोरट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेने मान्यता दिलेला अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. आपल्या देशात काही अधिकृत संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम चालविला जातो. यामध्ये
(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडेमी रायबरेली – http://igrua.gov.in
(२) बॉम्बे फ्लाइंग क्लब – http://www.thebombayflyingclub.com
(३) सिएई ऑक्सफोर्ड एविएशन अ‍ॅकॅडेमी – http://www.caeoaa.com/gondia/
(४) पवन हंस लिमिटेड – http://www.pawanhans.co.in
(५) ओरिएंट फ्लाइट अकॅडेमी – www.orientflights.com
या संस्थांचा समावेश आहे. संबंधित विद्यार्थ्यांने १२वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. तो मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. या अभ्यासक्रमाचे शुल्क साधारणत: ३० ते ४० लाख रुपयांच्या आसपास असते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.
First Published on July 14, 2017 12:47 am
Web Title: career guidance 28
0
Shares

यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती-२

यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती-२

भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.

श्रीकांत जाधव | Updated: July 13, 2017 12:36 AM
1
Shares

आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. आजच्या  लेखामध्ये यामधील भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला या मुद्याविषयी सर्वागीण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण २०१३ ते २०१६मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. या घटकावर एकूण चार प्रश्न विचारले गेलेले आहेत (२०१३ मध्ये १ प्रश्न, २०१४ मध्ये २ प्रश्न आणि २०१६ मध्ये १ प्रश्न) हे प्रश्न खालीलप्रमाणे होते.
  • मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते. – चर्चा करा.
  • सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान दिलेले आहे. – चर्चा करा.
  • गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमन यांचीही लागते. – स्पष्ट करा.
  • सुरुवातीची बौद्ध स्तूपकला, लोकांची तत्व आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. – स्पष्टीकरण द्या.
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाची उकल करताना दोन महत्वपूर्ण पलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यातील पहिला पलू हा भारतातील स्थापत्य कला आणि शिल्पकला याचा इतिहास आणि दुसरा पलू म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन कालखंडामध्ये या कलांचा विकासमध्ये झालेली प्रगती. भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागतिहासिक कालखंडापासून सुरु होते ज्यामुळे या कलांची सुरुवात नेमकी कशी व कोठून झालेली आहे याची माहिती आपणाला मिळते. पण या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात त्यामुळे या मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करताना आपणाला सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते तसेच वैदिक कालखंडामध्ये या कलांची माहिती प्राप्त होत नाही. यातील सिंधू संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेषांद्वारे स्थापत्यकला आणि शिल्पकला यामध्ये झालेल्या प्रगतीचा इतिहास पहावयास मिळतो आणि इ.स. पूर्व सहाव्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहवयास मिळतो, ज्याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे समजावून घेता येऊ शकतो.
उपरोक्त विचारले गेलेले प्रश्न हे प्राचीन भारत आणि सुरुवातीचा मध्ययुगीन भारत या कालखंडाशी संबंधित आहेत. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो आणि प्राचीन भारतात सर्वाधिक बौद्ध धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली दिसून येते कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता पण याच्या जोडीला जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिर शैलीचे नागर आणि द्राविड असे दोन प्रकार आहेत जे प्राचीन कालखंडापासून अस्तिवात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये येते आणि द्राविड शैली ही दक्षिण भारतामध्ये येते आणि या दोन शैलीमधील काही वैशिष्टय़ घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे, जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते. साधारणता गुप्त कालखंडापासून िहदु धर्माशी संबंधित मंदिर शैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते. त्यापुढील काळामध्ये त्यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते उदा – गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्ताच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने पल्लव, चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये, इत्यादीची काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्टय़े याची तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्वाचे ठरते. याचबरोबर मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतात इंन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य याच्या कालखंडात ती विकसित झालेली होती. याचबरोबर  विजयनगर साम्राज्य, १३व्या आणि १४व्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, १८व्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्प कला याचीही महिती असणे गरजेचे आहे. कारण प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात त्यामुळे या घटकाची तयारी सर्वागिण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्याशी सबंधित प्रश्न सद्यस्थितीला विचारात घेऊन विचारले जातात उदा. सिंधू संस्कृतीवरील विचारण्यात आलेला प्रश्न. थोडक्यात या मुद्याची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व याची वैशिषटय़े यासारख्या बाबींचा एकत्रित विचार करुन करावा लागणार आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे.
या घटकाची मुलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे  Introduction to Indian Art – Part – I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच याच्या जोडीला १२वीचे Themes in Indian History Part – I आणि II व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. याच्या जोडीला या विषयावर गाईडच्या स्वरूपात लिहीलेली अनेक पुस्तके बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या मुद्याचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.
या पुढील लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकांमधील चित्रकला, साहित्य, आणि उत्सव या मुद्याचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त  ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on July 13, 2017 12:36 am
Web Title: indian heritage and culture upsc exam

बहि:शाल शिक्षण विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात.

बहि:शाल शिक्षण

विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात.

लोकसत्ता टीम | Updated: July 13, 2017 12:35 AM
0
Shares
शैक्षणिक संस्थांत रीतसर प्रवेश घेऊ  न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषत: प्रौढ नागरिकांना, उपलब्ध असणारा आधुनिक शिक्षणाचा प्रकार, मानव्यविद्या, निसर्गविज्ञाने आणि तंत्रविद्या, समाजशास्त्रे, कायदा, वाणिज्य, वैद्यक अशा बहुतेक सर्व विषयांचा अंतर्भाव बहि:शाल शिक्षणात होतो.
  • विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात. त्यांचा लाभ प्रौढ नागरिकांना द्यावा, या उद्देशाने प्रथम हा उपक्रम सुरू झाला.
  • पुढे केवळ बहि:शाल शिक्षणासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामग्री व अभ्यासक्रम यांच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात आल्या.
  • यासाठी विद्यापीठांच्या अध्यापक वर्गाबरोबर बाहेरील शिक्षितांचे अध्यापकवर्ग (अंशकालीन) उपयोगात आणले जातात.
  • प्रौढ वर्गाकरिता स्वतंत्र ग्रंथसंग्रहाची सामग्री पुरवली जाते आणि त्यांना उपयुक्त असे नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जातात.
  • या कामी सरकारी संस्था, शिक्षण खाते, खासगी संघटना, कामगारसंघ व स्वयंसेवी नागरिक यांचा उपयोग विद्यापीठे करून घेतात.
  • बहि:शाल विद्यार्थी वर्गाचा दर्जा त्या त्या देशातील पूर्वशिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. भारतात अद्याप प्राथमिक शिक्षण न घेतलेले ७०.६५% नागरिक आहेत. माध्यमिक शिक्षणही बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे बहि:शाल शिक्षणाचे विषय व त्याची पातळी सामान्यपणे माध्यमिक दर्जावर ठेवावी लागते.
  • पुणे विद्यापीठाने १९४९ साली बहि:शाल शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. दिल्ली, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, म्हैसूर इ. विद्यापीठांनी बहि:शाल शिक्षणाचा विभाग सुरू केलेला आहे.
  • महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर मराठवाडय़ा व शिवाजी या विद्यापीठांनीही बहि:शाल शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. मुंबई विद्यापीठातही बहि:शाल विभाग आहे.
  • अधिक माहितीसाठी: बहि:शाल शिक्षण विभाग- दुसरा मजला, आरोग्य केंद्र इमारत, विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०० ०९८, दूरध्वनी- ०२२२६५४३०११, ०२२२६५३०२६६
First Published on July 13, 2017 12:35 am
Web Title: external education educational institutions

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत

जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

वसुंधरा भोपळे | Updated: July 12, 2017 2:11 AM
4.7K
Shares

संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे.

विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांमधून आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि प्राथमिक नियोजन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या लेखातून आपण या परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाच्या अभ्यासघटकांची व अभ्यासस्रोतांची निवड आणि त्यांचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहू या.
अभ्यासक्रमाची तीन गटांत विभागणी
प्रत्यक्षात अभ्यासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी विषयानुरूप अभ्यासक्रमातील मुद्दय़ांची तीन विभागांत विभागणी करावी.
अ) विभाग १ – यामध्ये त्या विषयामधील ज्या ज्या उपघटकांवर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले आहेत त्या सर्व घटकांचा समावेश करणे.
उदा.  २०१६ च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील भूगोल विषयातील प्रश्न – आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते? हा प्रश्न अरण्यांच्या प्रकारांवर असल्यामुळे ‘अरण्याचे प्रकार’ हा भूगोल या घटकातील विभाग १ अंतर्गत येणारा घटक होय.
ब) विभाग २ – आंबोली आणि इगतपुरी येथे आढळणाऱ्या अरण्याच्या प्रकाराबरोबरच महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या अरण्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्टे, त्या प्रदेशातील हवामान, संस्कृती आणि लोकजीवनही अभ्यासने गरजेचे आहे. हे घटक विभाग २अंतर्गत येतात.
क) विभाग ३- वरील दोन विभागांमध्ये समाविष्ट न झालेले अभ्यासक्रमाचे मुद्दे या विभागामध्ये समाविष्ट करावेत. वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाची विभागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या मुद्दय़ावर कितपत भर द्यावा आणि त्या मुद्दय़ावर प्रश्न कसा येऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पहिल्या दोन विभागांतील घटकांवर ७० ते ७५ टक्के प्रश्न येतात आणि उर्वरित प्रश्न हे तिसऱ्या विभागावरील असतात, त्यामुळे अभ्यास करताना पहिल्या दोन विभागांतील घटकांवर अधिक भर द्यावा आणि त्या घटकांतील सर्व आयामांची चोख उजळणी करावी.
संदर्भग्रंथ निवड
नेमका अभ्यास कोणता करावा याचा तपशील काढून झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संदर्भग्रंथांची निवड. संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. शासनाद्वारे प्रकाशित केले गेलेले संदर्भग्रंथ आणि शासनाच्या संकेतस्थळांवरून मिळणारी माहिती ही या परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे स्रोत आहेत; परंतु हे स्रोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नसल्यामुळे आपण अभ्यास करताना त्यामधून नेमका कोणता मुद्दा उचलायचा आणि कोणता सोडून द्यायचा हे आपल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून ठरविणे क्रमप्राप्त ठरते. प्रत्येक विषयाचे अभ्यासस्रोत पुढीलप्रमाणे आहेत.
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.
२.  नागरिकशास्त्र – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता ६ वी ते १०वी पर्यंतची नागरिकशास्त्र आणि ११वी, १२वीची राज्यशास्त्राची पुस्तके.
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास – महाराष्ट्र बोर्डाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके, त्याचबरोबर बिपीन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हे पुस्तक.
४.  भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – ४ थी ते १२वीपर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ऑक्सफर्ड व नवनीत स्कूल अ‍ॅटलास, ९वी ते १२वी  N.C.E.R.T ची पुस्तके.
५.  अर्थव्यवस्था – भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त आणि सुंदरम यांचे पुस्तक.
६.  सामान्य विज्ञान – ५ वी ते १०वीपर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ९वी ते १२वी  N.C.E.R.T ची पुस्तके.
७.  बुद्धिमापन चाचणी व अंकगणित – वा. ना. दांडेकर यांची गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची पुस्तके आणि १०वीची पुस्तके
हे झाले अभ्यास कोणता आणि कोणत्या संदर्भ ग्रंथातून करायचा या संदर्भात, परंतु खरी कसोटी असते ती एका तासात १००प्रश्न सोडविण्याची. यासाठी केलेल्या अभ्यासाची उजळणी, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपूर सराव आणि ऋणात्मक गुणपद्धतीचा सामना करण्यासाठी अचूकतेवर भर देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अभ्यास, सराव आणि उजळणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयप्राप्तीपर्यंत निश्चितच पोहोचू शकतो.
First Published on July 12, 2017 2:11 am
Web Title: mpsc 2017 exam how to prepare for mpsc exam
4.7K
Shares