Sunday, July 12, 2015

नवनीत [Print] [Email] संस्थानांची बखर - राजकोट संस्थानाचे विलीनीकरण

नवनीत

संस्थानांची बखर - राजकोट संस्थानाचे विलीनीकरण

Merger of Rajkot Institution
Published: Friday, July 10, 2015
१९४० साली राजकोट संस्थानचा राजा धर्मेद्रसिंहजी सिंहाची शिकार करताना स्वतच शिकार झाला आणि त्याच्या छळवादातून जनतेची सुटका झाली. धर्मेद्रसिंह नंतर गादीवर आलेला त्याचा भाऊ प्रद्युम्नसिंहजी हा उत्तम प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याने राज्यात अनेक सुधारणा करण्यास सुरुवात केली, पण त्याच काळात दुसरे महायुद्ध सुरू होऊन विकास योजनांच्या कार्यवाहीला खीळ बसली. युद्धाची धुमश्चक्री संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ, आंदोलने इत्यादींनी गजबजलेल्या काळात प्रद्युम्नसिंहजी काही नवीन करू शकले नाहीत.
१५ फेब्रुवारी १९४८ रोजी राजकोट संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. ७३० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाची लोकसंख्या १९२१ साली ६१००० होती.  ३४ खेडी अंतर्भूत असलेल्या या राज्याला  ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
महात्मा गांधींचे वडील काही काळ राजकोट संस्थानचे दिवाण होते. महात्मा गांधी राजकोटला अिहसेवर आधारित स्वातंत्र्य चळवळींची प्रयोगशाळा म्हणत. स्वातंत्र्य आंदोलनविषयक अनेक घटना, अनेक निर्णय यांचे राजकोट राज्य साक्षीदार आहे.
राजकोट स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर सौराष्ट्र या नवीन प्रांतामध्ये वर्ग केले जाऊन राजकोट शहर या प्रांताची राजधानी करण्यात आली. यू. एन. ढेबर हे सौराष्ट्र प्रांताचे मुख्यमंत्री आणि जामनगरचे जामश्री, राज्यपाल नियुक्त झाले. राजकोटच्या जडेजा राजघराण्याचे सध्याचे वंशज मनोहरसिंहजी गुजरातमधील मोठे राजकीय कार्यकत्रे असून गुजरात विधानसभेवर अनेक वेळा निवडून आले आहेत आणि त्यांनी तिथले आरोग्यमंत्रीपद भूषविले आहे.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

No comments:

Post a Comment