Wednesday, January 4, 2017

यूपीएससीची तयारी : सीमेपलीकडचा दहशतवाद

यूपीएससीची तयारी : सीमेपलीकडचा दहशतवाद

भारताचा आíथक व लष्करी महासत्ता म्हणून उदय होत आहे.

  

प्रस्तुत लेखातून ‘भारताच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेपुढे मोठे आव्हान ठरलेल्या सीमापार दहशतवाद (उ१२२ इ१ीि१ ळी१११्र२े) या समस्येवर चर्चा करूयात. भारतासाठी सीमापार दहशतवाद हे नवीन आव्हान नाही, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच पाक पुरस्कृत ‘आझाद काश्मीर दल’ या पाकव्याप्त काश्मीर (ढङ)मधील स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असणाऱ्या दलाने जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला होता. यापासून भारत सीमापार दहशतवादाच्या समस्येचा मुकाबला करत आहे. अशाच प्रकारची समस्या १९८०च्या दशकामध्ये पंजाब, त्यापाठोपाठ आसाम व १९९०च्या दशकामध्ये पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्भवली. सध्या छत्तीसगड, बिहार, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल व ओरिसा हे माओवादी कारवायांशी दोन हात करताना दिसतात. भारत व शेजारी देशांमध्ये वांशिक, धार्मिक व सांस्कृतिक समानता आढळते. संघर्षांच्या काळात तणावाचा काही भाग राज्यपुरस्कृत दहशतवादाच्या रूपामध्ये व्यक्त होत असतो. अशा देशांकडून थेट भरती करण्यात आलेल्या व नियंत्रित असणाऱ्या दहशतवादी गटांमार्फत किंवा काही छुप्या गटांमार्फत सीमापार दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात. अशा देशातील सरकार वा सरकारी एजन्सीमार्फत (उदा. आयएसआय ही पाकिस्तानमधील सरकारी गुप्तचर एजन्सी) वित्त व इतर सामग्री दहशतवाद्यांना पुरविली जाते. परिणामी सीमापार दहशतवादाच्या समस्येवर तातडीने उपाय न केल्यास देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका उत्पन्न होतो.
भारताचा आíथक व लष्करी महासत्ता म्हणून उदय होत आहे. या पाश्र्वभूमीवर भारताच्या शेजारी देशांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे घुसखोरी, शस्त्रास्त्रे व अमली पदार्थाची तस्करी, मानवी व्यापार, बेकायदेशीर स्थलांतरे, दहशतवादी कारवायांच्या रूपातील आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीमध्ये इतर कुठल्याही देशापेक्षा पाकिस्तानकडून देशाच्या सुरक्षेला अधिक धोका आहे, ही बाब गुरुदासपूर, पठाणकोट व उरी येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी अधोरेखित केली आहे. भारताचा जम्मू आणि काश्मीर, पाणी वाटप, सरक्रीक, इ. मुद्दय़ांवरून पाकिस्तानशी अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपासून संघर्ष होत आहे.
पाकिस्तानला भारताचे प्रादेशिक श्रेष्ठत्व मान्य नसल्याने स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच भारताला अस्थिर बनविण्यासाठी लष्करी व दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जम्मू आणि काश्मीरपुरत्या मर्यादित न राहता देशभरामध्ये पसरल्या आहेत, याची भारताला खात्री आहे. आयएसआयच्या वाढत्या कारवाया व इतर राज्यांमध्ये सतत दिसत असलेल्या दहशतवादी हालचालींवरून हे स्पष्ट झाले आहे. याकरिता भारताने पाकिस्तानातून संचालित होणाऱ्या दहशतवादी गटांचा बंदोबस्त करण्यासाठी सुसज्ज राहणे श्रेयस्कर ठरते. नुकताच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जकिल स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. पण अशा पद्धतीच्या कारवाया झाल्यानंतर गुप्तता राखणे आवश्यक असते.
भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा सामना करण्याच्या मुद्दय़ांवर जोर देत आहे व या लढय़ामध्ये दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशावर राजकीय व आíथक र्निबधांच्या स्वरूपात जागतिक कृतीसाठी प्रयत्नशील आहे. तथापि अमेरिका व चीनसारख्या महासत्तांचे पाकिस्तानमध्ये व सभोवती राजकीय व लष्करी हितसंबंध गुंतल्याने पाकिस्तानच्या गरकृत्यांकडे डोळेझाक केली जात आहे. परिणामी भारताने आपले लष्कर, पोलीस व अर्धलष्करी दले, गुप्तचर यंत्रणा इत्यादीचे बळकटीकरण करून सोबतच आंतरराष्ट्रीय समुदायाचे याकामी समर्थन प्राप्त करून घेत ही लढाई एकटय़ाने लढणे उचित ठरेल.
भारताने सीमापार दहशतवादाच्या समस्येचे निराकरण लष्करी, द्विपक्षीय राजनय व आंतरराष्ट्रीय, राजकीय समर्थनाच्या माध्यमातून करता येईल ही बाब जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. सोबतच देशांतर्गत स्थिरता, विशेषत: धार्मिक बाबींमध्ये राखणे व सीमापार दहशतवादाच्या लढाईमध्ये सर्व धर्माच्या गटांचे समर्थन प्राप्त करून घेणे आवश्यक ठरते. लष्करी उपायांमुळे सीमापार दहशतवादी कारवायांविरोधात वचक निर्माण होईल व दहशतवादी व त्यांना पािठबा देणारे राष्ट्र यांची अभद्र युती मोडता येईल. याकरिता लष्कर व अर्धलष्करी दलांना अद्ययावत शस्त्रे, उपकरणे, निगराणी ठेवणारी उपकरणे, हेलिकॉप्टर्स, विमाने व इतर परिवहन साहाय्यता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सनिकी कारवायांमध्ये समन्वय ठेवण्याकरिता सर्व सुरक्षा दलांमध्ये सहकार्य असणे महत्त्वाचे ठरते. भारताने फक्त पाकिस्तानच नाही तर नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांना राजनयाद्वारे व्यस्त ठेवणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आíथक, लष्करी, सांस्कृतिक क्षेत्र आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहकार्याकरिता धोरणे सूत्रबद्ध करता येतील. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी एकत्रित धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे सूत्रबद्ध करण्यासाठी पावले उचलली आहेत. तरीही अमेरिका व चीनसारख्या देशांना पाकिस्तानला नियंत्रित करण्यासाठी उद्युक्त करणे गरजेचे आहे. यासोबतच सर्व धर्म व समुदायांमध्ये शांतता व सुसंवाद राखण्यावर भर द्यावा लागेल. यामध्ये विशेषत: काही अल्पसंख्याक समुदाय ईशान्येकडील राज्यातील लोक व माओवादी कारवायांनी प्रभावित क्षेत्रातील लोकांचा अंतर्भाव होईल. कारण आयएसआयसारखी संघटना या प्रदेशातील संघटनांना हाताशी धरून अस्थिरता निर्माण करत असते.
एकूणच दहशतवादाविरोधातील लढाई कठीण व आव्हानात्मक असते. याकामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जबाबदार संघटनांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. सीमापार दहशतवादाशी यशस्वीपणे लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन व शेजारील देशांमध्ये सहकार्य व समन्वयाची गरज असते.

No comments:

Post a Comment