Sunday, September 13, 2015

मपीएससी मंत्र- मुलाखतीची पूर्वतयारी

मपीएससी मंत्र- मुलाखतीची पूर्वतयारी

स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न

फारूक नाईकवाडे | September 12, 2015 19:03 pm
स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न देणे या गोष्टी आवश्यक असतात. त्याविषयी..
स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम िलकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवे. ते असे की, यशाच्या ध्येयाप्रती प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही. राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा अलीकडेच संपली. मुख्य परीक्षा संपली की तीन-चार दिवसांच्या लहानशा ब्रेकनंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धापरीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करावी.
राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल हा नेहमीच ठरलेला असतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा संपल्यानंतरच्या लेखात उमेदवारांना सांगितले होते की, पूर्व परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहोतच असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची तयारी भक्कम होते आणि स्पध्रेत आपली दावेदारी कायम राहते. स्पर्धापरीक्षा तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणूनच आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक गतिशील ठेवावे.
याच धर्तीवर मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे आडाखे न बांधता त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नांसाठी कार्यरत होतील. मुलाखतीची तयारी हा विषय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्व विकसन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात.
मुलाखतीसाठी निवड झाली की साहजिकच उमेदवारांना त्याचा आनंद असतो, पण त्याच प्रमाणात दबावसुद्धा जाणवतो. जे उमेदवार पहिल्यांदाच मुलाखत देत आहेत, त्यांच्यावर तर मोठा दबाव असतो. मुलाखतीच्या तयारी दबावात येऊन करणे योग्य नाही. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुमचा दबाव सकारात्मक ऊर्जेत परावíतत व्हायला हवा.
मुलाखतीची तयारी करताना उमेदवारांना येणाऱ्या तणावाचे मुख्य कारण म्हणजे त्यांना आपल्या कमतरता ठाऊक असतात. पण हे लक्षात घ्यायला हवे की, उणिवा, कमतरता असणे नसíगक आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी मिळणाऱ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या दूर करणे हे अजिबातच शक्य नाही. अशा परिस्थितीत सर्वपथम आपले कच्चे-पक्के दुवे समजून घ्यावेत आणि इच्छाशक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर उणिवांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा.
काही उमेदवारांना काही बाबतीत साशंक असतात. मुलाखतीबद्दल चुकीच्या लोकांकडून ऐकलेल्या निराधार माहितीमुळे त्यांची चुकीची धारणा झालेली असते. त्या कल्पना विस्तारातच ते उमेदवार मश्गुल असतात. उमेदवारांचा अहंकार- त्यांचे स्वत:बद्दलचे अवास्तव मत फसवे तितकेच धोकादायक असते. अशा सर्व उणिवा-कमतरता जाणून, तणावमुक्त व दबावमुक्त राहून सहजरीत्या मुलाखतीची तयारी करता यायला हवी.
मुलाखतीबाबतचे समज-गरसमज दूर होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे याआधी मुलाखतीस सामोरे गेलेल्या यशस्वी-अयशस्वी उमेदवारांशी चर्चा करणे. वेगवेगळ्या मुलाखतींचा अनुभव समजून घेतल्यास मुलाखतीची तयारी आणि विचारांना योग्य दिशा सापडू शकते. पूर्व व मुख्य परीक्षेबाबतचा दृष्टिकोन विकसित करणे, त्याबाबतचे गरसमज दूर होणे ही तुलनात्मकदृष्टय़ा सोपी गोष्ट आहे. मात्र मुलाखतीबाबतचे समज, न्यूनगंड, गरसमज, शंका दूर व्हाव्यात यासाठी नेमके प्रयत्न करणे आवश्यक असतात.
मुलाखतीचा निकाल हा नियुक्तीचे पद, त्यासाठीचे आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त/अमूर्त गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक आहे.
शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये नियुक्तीसाठी मुलाखत मंडळांकडून मुलाखती घेतल्या जातात. या प्रत्येक क्षेत्राची मागणी वेगळी असते आणि त्या त्या क्षेत्रामध्ये कामाच्या/ क्षमतांच्या/ कौशल्यांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखत मंडळे घेत असतात. केंद्र व राज्य शासनातील विविध सेवांमधील पदांवर नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही मुलाखत हा निर्णायक टप्पा असतो. या मुलाखतींच्या तयारीसाठीची चर्चा पुढील काही लेखांमध्ये करूयात..
First Published on September 14, 2015 1:06 am
Web Title: mpsc interview preparation

No comments:

Post a Comment