Wednesday, March 18, 2015

नवनीत [Email] कुतूहल: सुवास घातकसुद्धा!

नवनीत

कुतूहल: सुवास घातकसुद्धा!


कुतूहल: सुवास घातकसुद्धा! 
गंध हा प्रामुख्यानं वायू अथवा बाष्प याद्वारे गंधपेशीस उद्दीपित करतो. त्याचं प्रमाण जरी अल्प असलं तरी त्यामुळे गंधज्ञान होऊ शकतं. हा वायू त्वचेवरील श्लेष्मात विरघळतो तेव्हाच गंधपेशी उद्दीपित होऊन चेतातंतूद्वारे मेंदूकडे संवेदना पाठवली जाते आणि आपल्याला त्या त्या पदार्थाचं गंधज्ञान होते. ज्या गंधानं आपलं मन प्रफुल्लित व उत्साहित होतं असे गंध आपल्याला आवडतात आणि त्या गंधाला आपण 'सुवास' असं म्हणतो.
परफ्यूम्सना मनमोहक सुवास येतात, खाद्यपदार्थाना मन चाळवणारे वास येतात, स्वच्छता करायच्या रसायनांतून मन प्रसन्न  करणारे गंध सोडले जातात, सौंदर्यप्रसाधनांना मन आकर्षून घेणारे सुगंध लाभतात, औषधांना उग्र पण मनाला बरे होण्याचा दिलासा देणारे वास येतात, तर कचऱ्याला किंवा खराब झालेल्या पदार्थाना मन कंटाळून जाईल असे दर्प असतात. गंध आणि परिणाम यांची सांगड आपला मेंदू घालत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनात भावना उमटत असतात. पण असा हा आपला तल्लख मानवी मेंदूही कधी तरी फसतो बरं का! रासायनिक शस्त्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उग्र वास येत असणार हा असाच आपला एक समज! पण शस्त्र म्हणून वापरात असलेल्या बऱ्याच रसायनांना ना रंग असतो ना गंध! याला काही अपवादही आहेत. 'ताबून' हा पदार्थ रंगहीन असून बाष्पनशील आहे (याला जीए असंही म्हणतात.). या द्रवाला उष्णता मिळताच त्याचं वाफेत रूपांतर होतं. ताबूनची वाफ झटकन हवेत पसरते आणि तिला एखाद्या फळासारखा मंद सुगंध येतो. त्यामुळे माणसांच्या तो सहजी लक्षात येत नाही आणि आला तरी त्रासदायक वाटत नाही. पण 'ताबून' हे माणसांसाठी अत्यंत घातक असं रसायन आहे. त्यामुळे युद्धामध्ये त्याचा उपयोग रासायनिक शस्त्र म्हणून केला जातो. असंच आणखी एक रसायन म्हणजे 'सोमन' किंवा जीडी. सोमन हा पदार्थ द्रव स्वरूपात असून बाष्पनशील व क्षयकारी आहे. याला कापरासारखा वास येतो आणि हा आरोग्याला विनाशकारी असतो.
डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,
चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

नवनीत [Print] [Email] पर्फ्यूमचा वास

 

नवनीत

पर्फ्यूमचा वास

Published: Monday, November 10, 2014
मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी आपण पर्फ्यूम्सचा वापर करतो, तर कधी कधी दरुगधी घालवण्यासाठीही करतो. पर्फ्यूम्सचा वास हा काही नुसता, त्यात वापरलेल्या रसायनांशी संबंधित नसतो. त्यात आणखीही काही महत्त्वाचे घटक असतात.
आपल्या सर्वानाच एक मजेशीर अनुभव आला असेल. आपला मित्र एखादा छान वासाचा पर्फ्यूम वापरतो. आपल्याला तो पर्फ्यूम आवडतो, आपणही आपल्यासाठी तो विकत आणतो. मग मोठय़ा उत्साहाने तो आपल्या अंगावर फवारतो, पण.. आपल्या पदरी थोडी निराशा येते. आपल्या मित्राच्या अंगाला येणारा सुगंध आता आपल्या अंगावर मात्र वेगळा कसा काय वाटतो, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं; पण त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, आपलं आणि आपण अंगावर मारलेल्या पर्फ्यूमचं, जसं रासायनिक सूत जमेल तसा त्या पर्फ्यूमच्या सुवासात थोडा बदल होतो.
 आपल्या प्रत्येकाचा आहार आणि आहाराच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे व्यक्तीनुसार त्वचेत रासायनिकदृष्टय़ा थोडासा फरक असतो. काहींची त्वचा अगदी सूक्ष्म प्रमाणात आम्लधर्मी, तर काहींची किंचितशी आम्लारीधर्मी असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा सामू भिन्न असतो. अंगावर शिडकावा मारलेलं अत्तर किंवा पर्फ्यूम, अंगातली उष्णता शोषतं आणि मग त्याची वाफ होऊन ती आजूबाजूच्या परिसरात पसरते. पर्फ्यूम जेव्हा आपल्या अंगातली उष्णता शोषतात तेव्हा पर्फ्यूमवर अनेक प्रकारचे रासायनिक परिणामही होत असतात. त्यामध्ये मुख्यत्वेकरून आपण घेत असलेला आहार, औषधं, आपल्या त्वचेमध्ये असलेली रंगद्रव्यं किंवा तेलाचा अंश आणि हो.. आपली मन:स्थिती आणि त्यानुसार शरीरात होणारे रासायनिक बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्याच्या आहारात चरबीयुक्त पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, त्याने वापरलेल्या पर्फ्यूमचा गंध जास्त तीव्र असतो. म्हणून तर पर्फ्यूम विकत घेताना थेट बाटलीतल्या रसायनाचा वास घेण्यापेक्षा, आपल्या हातावर वापरूनच तपासायला पाहिजे. त्वचेमध्ये तेलाचा अंश अधिक असलेल्या व्यक्तीने, अगदी थोडय़ा प्रमाणात वापरलेला पर्फ्यूम दिवसभर सुगंध देत राहतो. याउलट कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तीला दिवसभरात अनेकदा पर्फ्यूम फवारावं लागतं.

Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] नैसर्गिक आणि कृत्रिम सुंगधी द्रव्य

नवनीत

नैसर्गिक आणि कृत्रिम सुंगधी द्रव्य

Published: Saturday, November 8, 2014
फुलांना सुगंध येतो म्हणून त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. असाच सुगंध आपल्या शरीरालाही यावा असं माणसाला वाटणं साहजिकच आहे. तसं गुलाबपाणी िशपडून सुगंध निर्माण करण्याचा प्रयत्न प्राचीन काळी होत असे.
अत्तरं आणि परफ्यूम्सच्या दुनियेत पॅरिसचा फ्रॅन्कॉईस कोटी हा पहिला श्रेष्ठ निर्माता समजला जातो. याने पॅरिसमध्येच सर्वप्रथम परफ्यूम बाजारात आणला आणि एकापेक्षा एक सरस परफ्यूम्सनी या जगात गंध भरणारा त्याचा कारखाना आजही चालू आहे. सध्या परफ्यूम्स म्हणून जी रसायनं आपण वापरतो त्यांमध्ये इसेन्स किंवा इसेन्शियल तेलं असतात. त्यांना आपण आपल्या सोयीसाठी सुवासिक द्रव्यतेलं म्हणू या.
हवेच्या संपर्कात या द्रव्यतेलाचे बाष्पीभवन म्हणजेच वाफ होते आणि त्यातले सुवासिक कण आसमंतात विखुरतात. ही द्रव्यतेलं पानं किंवा फुलांपासून मिळवतात. बऱ्याचदा परफ्यूम्स किंवा सुगंधी द्रव्य तयार करताना एकापेक्षा जास्त सुगंधी द्रव्यतेलं वापरतात. सुगंधीद्रव्य तेलांचे साधारणपणे तीन गट केले आहेत. पहिल्या गटामध्ये हलका परिणाम देणारी म्हणजे ज्यांचा वास लवकर नष्ट होतो, अशी स्रिटोनेलासारखी द्रव्यतेलं! गुलाबासारखी जरा जास्त तीव्र सुगंध देणारी आणि जास्त काळ परिणाम देणारी द्रव्यतेलं दुसऱ्या गटात मोडतात. तिसऱ्या गटातली सुगंधी द्रव्यतेलं ही वनस्पतीपासूनच मिळणाऱ्या जरा जाडसर आणि िडकासारख्या पदार्थापासून मिळतात.
िडक किंवा चिकासारखे हे पदार्थ वाळवून त्यात थोडी कोळशाची पूड मिसळून त्याच्या उदबत्त्या किंवा धूपस्टिक्स बनवल्या जातात. नसíगक सुगंधी द्रव्यांची रासायनिक रचना समजल्यामुळे आता अनेक सुगंधी द्रव्यं कृत्रिमरीत्या तयार करता येतात. उदाहरणार्थ, जिरॅनिऑल, स्रिटोनेलॉल, फिनाईल इथाईल अल्कोहोल, लिनॅलूल, ही चार रसायनं एका ठरावीक प्रमाणात मिसळली की हुबेहूब गुलाबाचा गंध देणारं परफ्युम तयार होतं. कृत्रिम परफ्यूम तयार करताना त्यात जवळजवळ ७८ ते ९५ टक्के ठरावीक अभिक्रिया केलेलं इथाईल अल्कोहोल आणि उरलेला भाग सुगंधी द्रव्यतेलं असं प्रमाण असतं. सध्याच्या काळात फळांचे वास असलेले परफ्यूम्स किंवा त्याही पुढे जाऊन मसाल्याच्या पदार्थाचा गंध लाभलेले परफ्यूम्स, साबण, शाम्पूही वापरले जाताहेत.

नवनीत [Print] [Email] रसगंध रसायनांमुळेच शक्य

नवनीत

रसगंध रसायनांमुळेच शक्य

Published: Friday, November 7, 2014
ही दुनिया जितकी रंगांनी सजलेली आहे, तेवढीच गंधाने भरलेली आहे. वेगवेगळ्या पदार्थाना लाभलेले गंध कळत नकळत आपल्याला काही संदेश देत असतात आणि आपला मेंदू हे संदेश वाचत, आपण काय करावं याच्या सूचना देत असतो. गमतीची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा, ज्या वस्तूंचा किंवा पदार्थाचा संपर्क आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत, त्या पदार्थामध्ये अशी काही रासायनिक प्रक्रिया होते की त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थाना घाणेरडा किंवा उग्र वास येतो. साहजिकच आपण अशा वासांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर असलेल्या केर-कुंडीजवळून जाताना किंवा सार्वजनिक मुताऱ्यांजवळून जाताना आपली चालण्याची गती वाढते, तर एखाद्या दुकानावरून जाताना आपली पावलं काही क्षण रेंगाळतात. कधी काही वास आपल्याला संभाव्य धोक्याची सूचना देतात. गळणाऱ्या गॅसचा वास हा अशातलाच एक! किंवा काहीतरी जळल्याचा वास आला की आपण घरातली विजेची उपकरणं तपासतो.
गंध आणि तो निर्माण करणारे पदार्थ किंवा रसायनं म्हणजे रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच जणू! सकाळी उठल्यावर चहा उकळताना येणारा वास, आपल्याला चहा पिण्याआधीच चहा प्यायला मिळणार असल्याचा आनंद देतो. पावभाजी किंवा बटाटावडय़ाच्या गाडीशेजारून जाताना नुसत्या वासानेच आपली भूक चाळवते. आंघोळ करताना, साबणाचा सुवास आपल्याला आल्हाददायी वाटतो. देवपूजा करताना लावलेल्या उदबत्तीचा सुगंध साऱ्या घराचं वातावरण प्रसन्न करतो. आपल्या अंगाला दिवसभर चांगला वास येत राहावा म्हणून घराबाहेर पडताना तर आपल्यापकी बरेच जण आवर्जून परफ्यूम वापरतात. बाथरूम्स, टॉयलेट्स किंवा कपाटं यांमध्ये मंद सुगंध हवेत सोडणाऱ्या फ्रेशनर्सच्या वडय़ा टांगलेल्या असतात. लादी पुसण्यासाठी तर वेगवेगळे गंध असलेली रसायनं सध्या बाजारात मिळताहेत. सौदर्यप्रसाधनं आणि सुगंध यांचंही अतूट नातं आहे. थोडक्यात काय तर गंधांचा रसायनांशी घनिष्ट संबंध आहे म्हणून गंध आहेत आणि रसायनशास्त्र आहे म्हणूनच गंधाचा उपयोग आपण पुरेपूर करून घेऊ शकतो, हेच खरं!

नवनीत [Print] [Email] डॉ. कमला सोहोनी

नवनीत

डॉ. कमला सोहोनी

Published: Monday, October 13, 2014
घरी शिक्षणाचे वातावरण असलेल्या कमला भागवत मुंबई विद्यापीठातून बीएस्सी होऊन बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी करायला गेल्या; पण संस्थेचे संचालक व नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. व्ही. रामन त्या स्त्री आहेत म्हणून त्यांना प्रवेश देईनात. मग त्या हट्टाला पेटल्यावर त्यांच्यावर जाचक अटी घालून त्यांना तात्पुरता प्रवेश दिला. त्या अटी त्यांनी पुऱ्या केल्यावर त्यांचा तर प्रवेश नक्की झालाच, पण पुढच्या वर्षीपासून तेथे मुलींना प्रवेश मिळू लागला. बंगलोरला त्यांनी कडधान्यातील प्रथिनांवर अभ्यास केला. असा अभ्यास करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला. नंतर त्या पीएचडी करण्यासाठी केंब्रिजला गेल्या. बटाटा व वनस्पतींच्या ऊतींवर त्यांनी काम केले. वनस्पतींच्या प्रत्येक पेशीत 'सायटोक्रोम सी' हे वितंचक (एंझाईम) असते हे त्यांनी शोधून काढले. वनस्पतींच्या ऑक्सिडीकरणात या वितंचकाचा मोठा भाग असतो. या वितंचकाचे रूप ऋतूंप्रमाणे बदलते तरीही ते सायटोक्रोम सी असेच असते.
पीएचडी झाल्यावर त्यांनी तेथे राहूनच संशोधन करावे, असा आग्रह पुढे ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते चंद्रशेखर रामन कमलाबाईंना करीत असतानाही देशप्रेमाखातर कमला भारतात आल्या. दिल्लीच्या लेडी हाìडग मेडिकल कॉलेजात जीव-रसायनशास्त्र शिकवू लागल्या; पण येथे संशोधनाला वाव नसल्याने त्या कुन्नूरच्या भारतीय वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळेत आहारशास्त्रावर संशोधन करू लागल्या. तेथे त्यांनी 'प' (बायोफ्लॉवानॉइड्) व 'क' जीवनसत्त्व एकत्रितपणे वापरले तर त्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात हे संशोधनातून सिद्ध केले. नंतर त्या विवाहबद्ध होऊन कमला सोहोनी झाल्या. मुंबईला येऊन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापकी व संशोधन करू लागल्या. कुपोषितांच्या अन्नात नीरेचा उपयोग केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो हे त्यांनी शोधले. कडधान्ये, भाज्या व धान्यातील पोषणमूल्ये त्यांनी निश्चित केली. दूध प्रकल्पातील दुधाची गुणवत्ता त्यांनी वाढवून दिली. कंझ्युमर गायडन्स सोसायटीच्या त्या एक संस्थापिका होत्या.

नवनीत [Print] [Email] कुतूहल - रसायनशास्त्रातील भारतीय

नवनीत

कुतूहल - रसायनशास्त्रातील भारतीय

Published: Tuesday, October 14, 2014
प्रा. बी. सी. हलदर  (१ जाने. १९२३ ते २७ फेब. १९८३)
प्रा. बरुणचंद्र ऊर्फ बी. सी. हलदर यांचे सर्व शिक्षण कोलकात्यात झाले. ते प्रा. पी. बी. सरकार यांचे आवडते विद्यार्थी होते. १९४८ साली त्यांना प्रेमचंद रायचंद सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांना फुलब्राइट, स्मिथ-मंद आणि पलित शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यामुळे १९५० साली त्यांना अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेणे शक्य झाले. नोत्रेदाम आणि रोचेस्टर विद्यापीठात तर त्यांनी संशोधन केलेच, पण नोबेल पुरस्कार विजेते प्रा. ग्लेनटी सीबॉर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिफोíनयातील लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरीत संशोधन करायची संधी मिळाली. या संशोधनाचे फलित म्हणजे त्यांनी संशोधिलेली चार रेडिओ समस्थानिके ऊर्फ आयसोटोप्स.
अमेरिकेहून ते १९५५ साली भारतात आले व प्रथम रंगून विद्यापीठ आणि नंतर त्यांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठ येथे काम केले. तेथून १९६० साली ते मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये आले; पण लगेच पुढच्या वर्षी त्यांना नागपूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये पाठविले. १९७० साली ते मुंबईला आले व इन्स्टिटय़ूटचे संचालक झाले. त्यानंतर १९७२ साली त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक म्हणून पुण्यास पाठविण्यात आले. त्यांना खरा रस होता संशोधनात. त्यामुळे त्यांनी सरकारला विनंती केली की, मला परत मुंबईला इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जाऊ दे व माझे संशोधन करू दे. त्यांची ही विनंती मान्य करण्यात येऊन ते वर्षभरात मुंबईला आले आणि १९८१ च्या त्यांच्या निवृत्तीपर्यंत त्या पदावर राहिले. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन समितीचे ते उपसचिव होते. डॉ. हलदर इंडियन केमिकल सोसायटी, इन्स्टिटय़ूशन ऑफ न्यूक्लिअर इंजिनीअर्स-लंडन इत्यादी अनेक संस्थांचे आणि त्यांच्या शास्त्रीय नियतकालिकांचे सभासद, संपादक, लेखक होते. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल १९७८ साली कोलकाता विद्यापीठाने त्यांना आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय सुवर्ण पदकाने सन्मानित केले.
प्रा. हलदर यांनी अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री, न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि परिसर रसायनशास्त्र यांचे अभ्यासक्रम भारतभर सुरू करून दिले. डॉ. हलदर यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी एमएस्सी आणि पीएचडी केली. त्यांचे स्वत:चे २०० संशोधन निबंध प्रसिद्ध झाले. काटेकोरपणा, टिकाऊपणा आणि कुतूहल हे त्यांच्या अध्यापन, संशोधन आणि वागणुकीचे विशेष हो

नवनीत [Print] [Email] वनस्पती आणि कार्बन

नवनीत

वनस्पती आणि कार्बन

Published: Monday, October 6, 2014
वनस्पतींना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाकाहारी सजीव थेट वनस्पतींवर अवलंबून असतात, तर मांसाहारी सजीव शाकाहारी सजीवांवर अवलंबून असतात. म्हणजेच मांसाहारी सजीव अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. इतरही अनेक फायदे वनस्पतींमुळे आपल्याला होतात. जसे ऑक्सिजनचा पुरवठा आणि कार्बन डायऑक्साइडचा वापर (शोषण), जमिनीची धूप थांबवणे, विविध पद्धतींनी इंधनाची गरज भागवणे इत्यादी. त्यामुळे वनस्पतीवाढीसाठी आपण काम केले पाहिजे, हे नक्की.
मूलत: वनस्पती सजीव आहेत; पण त्यांना इतर सजीवांसारखी एकदा दिलेली जागा सोडता येत नाही. त्यामुळे त्या जागेवर वनस्पतीवाढीच्या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. पहिली गरज सूर्यप्रकाशाची, तो मिळेल अशी जागा निवडली पाहिजे.  सूर्यप्रकाशातच वनस्पती अन्न निर्माण करतात. अन्न निर्माण करणे म्हणजे वनस्पतीमधील जैव रासायनिक क्रिया. ती घडायला आपण आवश्यक अशा इतर बाबींची पूर्तता करायला हवी. सूर्यप्रकाशानंतर पानातले हरितद्रव्य महत्त्वाचे ठरते. त्याच्या उपस्थितीतच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते. बी लावून वनस्पती योग्य तऱ्हेने वाढवल्यास त्याची वाटचाल अन्न निर्माण करायच्या प्रक्रियेकडे होते. याच प्रक्रियेच्या वेळी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. अन्न उत्पादन प्रक्रियेत एका बाजूला मुख्य पदार्थ तयार होतो, तर त्या वेळी ऑक्सिजन हा उपपदार्थ तयार होऊन तो वनस्पतीद्वारे हवेत सोडला जातो.
 याचा दुसरा अर्थ असा की, हवेतील कार्बन डायऑक्साइड (उड2) मधील कार्बन (उ) वनस्पतीत राहतो आणि ऑक्सिजन (ड2) हवेत परत सोडला जातो. वनस्पतीतील एकूण सोळा घटकांपकी एका घटकाची- कार्बनची अंशत: पूर्तता अशी होते. शिवाय काही कार्बनचा अंश जमिनीतून घेतला जातो. म्हणूनच माती परीक्षणाच्या वेळी जी तपासणी करतात त्यामध्ये मातीमधील कार्बनचे प्रमाण प्राधान्याने लक्षात घेतले जाते. याशिवाय इतर घटकांची उपस्थिती आणि प्रमाण तपासले जाते. म्हणजेच आपल्याला नक्की समजते की, वनस्पतीवाढीसाठीचे कोणते घटक त्या मातीत आहेत आणि कोणत्या प्रमाणात आहेत. त्यानुसार कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता अन्य मार्गाने आपण करू शकतो. त्याचबरोबर मातीत पुरेशा प्रमाणात असलेले घटक देण्याची गरज नाही.
दिलीप हेल्रेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org