Tuesday, July 18, 2017

यूपीएससीची तयारी : निबंध लेखनातील अडचणी प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे.

यूपीएससीची तयारी : निबंध लेखनातील अडचणी

प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे.

या लेखात आपण निबंध लेखनाविषयीचे अजून काही मुद्दे पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने निबंध लिखाणाला सुरुवात केल्यानंतर प्रभावी सुरुवात आणि शेवट कसा करावा हे आपण पाहणार आहोत. तसेच एकंदरीत निबंध लेखनासाठी आवश्यक भाषा व शैली याचा विचारही आपण करणार आहोत.
प्रस्तावनेचा परिच्छेद
प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे. दिलेल्या विषयाची प्रमुख भूमिका निश्चित करणे आणि प्रमुख मुद्दा ठामपणे मांडणे हे या परिच्छेदाचे महत्त्वाचे काम आहे. पुढे येणाऱ्या गुंतागुंतीच्या लेखनाला दिशा देणारा हा परिच्छेद आहे. वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी वाक्ये येथे असली पाहिजेत. अशा प्रकारची सुरुवात खालीलपकी एखादी मांडणी करून केली जावू शकते.
  • माहितीचा रंजक नमुना
  • आश्चर्यकारक माहिती
  • विषयास लागू असणारा सुविचार
  • आपल्या आजूबाजूला असणारा पण सहज लक्षात न येणारा विरोधाभास
  • अवघड संकल्पनेचे स्पष्टीकरण
  • एखाद्या घटनेचे थोडक्यात वर्णन
  • विचार करण्यास प्रवृत्त करणारा प्रश्न
  • थेट विषय प्रवेश
  • ८०० शब्दापेक्षा कमी शब्दात लिहिलेल्या निबंधाकरता खूप मोठी प्रस्तावना आवश्यक नाही. परंतु १२०० शब्दांचा निबंध लिहीत असताना सविस्तर प्रस्तावनेतून निबंधाची भूमिका स्पष्ट करणे शक्य होते. अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर स्पष्टीकरणांवर वेळ अथवा शब्द वाया न घालवता प्रमुख मुद्दय़ांच्या मांडणीला सुरुवात करावी. आपण लिहीत असलेल्या विषयांच्या संदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा दाखला देऊन मूळ लिखाणाला सुरुवात करता येते. मात्र अशी सुरुवात करत असताना तोचतोचपणा टाळावा. तसेच ‘सध्या क्ष हा अतिशय कळीचा प्रश्न बनला आहे…’ किंवा ‘मनुष्य कायमच क्ष प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे…’ अशा ठोकळेबाज वाक्यांचा वापर टाळावा. इतकी व्यापक मांडणी जवळपास कोणताही महत्त्वाचा मुद्दा कवेत घेऊ शकते, म्हणूनच आपली सुरुवात ही अचूक भूमिका असणाऱ्या वाक्यांनी व्हावी.
अतिशय व्यापक – गुन्हेगारी ही सर्वच काळातील एक मोठी समस्या आहे.
मुद्देसूद – बालगुन्हेगारांच्या शिक्षेची तीव्रता व त्यासंबंधीच्या समस्यांनी सध्याचे चर्चा विश्व व्यापले आहे. गेल्या काही वर्षांतील बालगुन्हेगारांच्या वाढत्या नोंदींमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
निष्कर्ष
निबंधाच्या शेवटचे परिच्छेद प्रभावी असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. निष्कर्षांचे परिच्छेद डौलदार भाषेत, योग्य शैलीचा वापर करून लिहावेत. एखादा संस्मरणीय विचार, चलाख, ताíकक युक्तिवाद किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यातील प्रश्न सोडवण्यासाठीचा कृतीक्रम या किंवा अशा मुद्दय़ांनी निबंधाचा शेवट करावा. निबंध वाचून पूर्ण झाल्यानंतर वाचणाऱ्यांच्या मनात कोणती छाप असावी असे आपल्याला वाटते? त्यास धरून निष्कर्ष लिहावा.
निष्कर्षांच्या परिच्छेदामधील आधी लिहिलेले मुद्देच परत लिहिण्याने निष्कर्ष प्रभावी होत नाही. असे केल्याने निष्कर्ष एकसुरी व निष्प्रभ ठरतो. प्रभावी शेवट करण्यासाठी वरती दिलेल्या मुद्दय़ांव्यतिरिक्त विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा, अर्थपूर्ण शब्दांची योजना करून वाचणाऱ्याच्या लक्षात आणून दिले जाऊ शकते.
निष्कर्षांचा परिच्छेद आटोपशीर असावा. २०ओळींपेक्षा मोठा निष्कर्ष लिहिण्याचे टाळावे. अतिशय हुशारीने तुम्ही विषयाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडत आहात, अशा भूमिकेतून निष्कर्ष लिहिला जाणे अपेक्षित आहे. पूर्णत नवीन संकल्पना, विचारांची साखळी या परिच्छेदात मांडू नये. परंतु असे करत असताना निबंधातील मुद्दे पुन:पुन्हा देण्याचे टाळावे. अशा प्रकारच्या निष्कर्षांचा परिच्छेद लिहिण्यासाठी पुरेसा सराव अत्यावश्यक आहे.
भाषा व शैली
व्याकरणाच्या दृष्टीने योग्य, सुटसुटीत व प्रभावी वाक्ये कोणत्याही चांगल्या निबंधाचा महत्त्वाचे घटक असतात. सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा नाही. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या निबंध विषयांवर लेखन करताना मजकुराबरोबरच भाषेचीही प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे.
एखाद्या मुद्दय़ाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कशा प्रकारे भर द्यावा, दोन वाक्यांमधील तर्कसंगती स्पष्ट करण्यासाठी कोणते शब्द वापरावेत, आपल्याजवळील माहितीचा वापर करून ठामपणे मत मांडत असताना अनावश्यक अधिकाराचा सूर कसा टाळावा या सर्व गोष्टी योग्य भाषेच्या वापरामधून साध्य होतात.
प्रगल्भ विचार व भाषा यांचा वापर म्हणजे केवळ जड व मोठय़ा शब्दांची खिरापत नाही. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्याला खात्री नाही, असे शब्द वापरणे टाळावे. तसेच मोठे, अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपले लिखाण दिखाऊ होत नाही ना याची काळजी घ्यावी. मात्र आपले लिखाण जर नसíगकरीत्या गुंतागुंतीचे व अनेक पातळ्यांवर विश्लेषण करणारे असेल तर, शब्दांचा वापर आपोआपच अधिक प्रगल्भ होत जातो.
प्रत्येक वाक्य छोटे व सुटसुटीत असेल याची खबरदारी घ्यावी. वाक्य मोठे झाल्यास योग्य ठिकाणी स्वल्पविराम, अर्धस्वल्पविराम, विसर्ग चिन्हांचा योग्य वापर करावा.
संपूर्ण अर्थबोध होऊ शकणार नाही इतकी मोठी वाक्य करण्याचे मुळातच टाळावे. कोणतेही अर्थपूर्ण लेखन करण्याकरिता वरील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
First Published on July 6, 2017 1:11 am
Web Title: essay writing issue upsc exam
134
Shares

Monday, July 10, 2017

‘गुणां’चे अवगुण! ‘‘क्षणभरही सवड नसते त्याला इकडे तिकडे वेळ काढायला, पुरतं ‘बिझी शेडय़ूल’ असतं

‘गुणां’चे अवगुण!

‘‘क्षणभरही सवड नसते त्याला इकडे तिकडे वेळ काढायला, पुरतं ‘बिझी शेडय़ूल’ असतं

मेघना जोशी | Updated: June 24, 2017 4:23 AM
‘‘क्षणभरही सवड नसते त्याला इकडे तिकडे वेळ काढायला, पुरतं ‘बिझी शेडय़ूल’ असतं त्याचं, सकाळी आठ ते दीड वाजेपर्यंत शाळा आणि नंतर अडीच ते साडेआठ क्लासेस. कसा वेळ देणारेय तो खेळ आणि कलेसाठी? कशाला वेळ फुकट घालवायचा खेळ आणि कलेसाठी?’’   माझ्यासमोर बसलेले पालक त्यांचं म्हणणं मला, शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच पटवून देण्याचा आटापिटा करत होते. इयत्ता सहावीतला त्यांचा पाल्य आणि आमचा विद्यार्थी आणि त्याचं हे एवढं ‘सो कॉल्ड पॅक्ड शेडय़ूल’ ऐकून आणि बालमानसशास्त्रनुसार खेळ आणि खेळणी यांना बालकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे या मी शिकलेल्या वाक्याला छेद देणारं प्रतिपादन ऐकून माझ्या कपाळावर घामाचे थेंब नकळतच डवरले. ते पुसत त्यांना मी विचारलं, ‘‘हे एवढं का पण? कशासाठी बिचाऱ्याची एवढी ससेहोलपट.’’
‘‘काय मॅम, काय शब्द वापरता तुम्ही? ससेहोलपट कसली, सगळ्या आवडीनिवडी पुरवतो, लाड करतो आणि दोन वर्षांनी आठवीत स्कॉलरशिपला स्कोअिरग करायचं असेल तर एवढं नको का करायला?’’
‘‘एवढं?’’ माझ्या तोंडून मोठय़ा आवाजात निसटलेल्या त्या प्रश्नाकडे त्या बिच्चाऱ्यांचं लक्षच नव्हतं. कारण आठवीपुढे त्याचं नववी. ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, संगीत वगैरे नकोच बरं का, कारण संगीताचे गुण मिळवायचे तर किमान पाच र्वष क्लासला जावं लागेल, पण चित्रकलेचे गुण दोन वर्षांत मिळतील आणि त्यानंतर गुणांपुरते खेळ वगैरे आणि पुढे दहावीत जास्तीतजास्त गुण याबाबतचं त्याचं नियोजन चालू होतं. ‘शिक्षण’ या संज्ञेच्या एकंदर उद्दिष्टालाच पानं पुसणारा हा प्रसंग.  हे प्रसंगांचं अतिशयोक्तीकरण वगैरे मुळीच नाहीए. अतिशय वास्तव उदाहरण, अगदी माझ्या समोर घडलेलं म्हणूनच काळीज चिरत गेलं.
मूल शाळेत घातलं की नव्वद किंवा त्याहून जास्त टक्के पालकांचा विषय म्हणजे त्याला मिळणारे गुण. इथे मी ‘विषय’ हे विशेषण सहेतुकच वापरलं नाहीए, कारण काहींचा तो चिंतेचा विषय, काहींचा चर्चेचा, काहीजण त्याबाबत इतकं बोलतात की गुण हा मिळवण्याचा विषय आहे की बोलण्याचा हाच प्रश्न पडतो, तर अनेकांच्या तो प्रतिष्ठेचा विषय! मुलाला कमी गुण मिळाले तर शाळेच्या कार्यालयात येऊन एक एक गुणासाठी भांडणाऱ्या नि रडणाऱ्या आया पूर्वीपासून आहेतच, पण खेदाची गोष्ट म्हणजे आजकाल अशा पुरुष पालकांची संख्याही वाढत चालली आहे. इथे स्त्री-पुरुष हा भेद नाही, पण यापूर्वी पुरुष पालक गुणांच्या बाबतीत एवढे ‘पझेसिव्ह’ नव्हते तेही आजकाल या प्रवाहात वाहत चालले आहेत, हेच सांगण्याचा उद्देश!
ज्या व्यक्तींचा शिक्षणक्षेत्राशी फारसा संबंध नाही किंवा शिक्षणक्षेत्राचा ज्यांनी गांभीर्याने विचार केला नाही त्यांना वरचं सगळं विवेचन न पटण्याचीच शक्यता जास्त, कारण अशा व्यक्ती फक्त वर्तमानपत्रातील दहावी-बारावीचे निकाल त्यातील खूप मोठ्ठे आकडे, मोठ्ठा मोठ्ठाले पुष्पगुच्छ आणि तसेच सत्कार नि भाषणे यांच्याशी परिचित असतील. पण, यामागे खूप काही दडलंय ते समोर येतच नाही. या सगळ्यांतून निर्माण झालीए ती या सगळ्यामागे जीव तोडून ऊर फुटेपर्यंत धावण्याची वृत्ती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना या सगळ्याची हाव निर्माण झाली आहे. काहीही झालं तरी दहावीत शंभर टक्के, ही ती हाव. मग या शंभर टक्क्यांसाठी काहीही. चित्रकला लागणारे का यासाठी? मग आम्ही देतो परीक्षा, संगीतही हवंय का? मग शिक तू संगीत, खेळालाही गुण आहेत? मग खेळ हवाच म्हणजे हे सगळं गुणांसाठी पण ‘गुण’ म्हणून या सगळ्याकडे पाहण्याची वृत्ती नाहीच. याचं एक मनाला टोचणी देणारं उदाहरण म्हणजे इयत्ता दहावीत कॅरममधील कौशल्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक मिळवलेली आमची एक विद्यार्थिनी दहावीत खेळाचे २५ गुण मिळवत सत्त्याण्णव टक्क्यांवर पोहोचली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतर तिने कॅरम खेळणंच सोडलं.
फक्त एवढंच नाही तर दहावीला मिळणारे गुण म्हणजे गुणांचं अतिशयोक्तीकरणच वाटतं. निर्जीव मशीनच्या बाबतीतही ‘आउटपुट इज नेव्हर इक्वल टू इनपुट’, असं म्हटलं जातं आणि यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते फ्रिक्शन. मग, सजीव माणसाच्या स्मृतीमध्ये गेलेल्या माहितीचा शंभर टक्के साठा होईल आणि तो तसाच उतरेल हे पटतच नाही. म्हणजेच आजची परीक्षा केवळ ज्ञानाधिष्ठित आहे, असं जरी मानलं तरी हे पटत नाही, मग शिक्षण ही प्रक्रियाच जर सर्वागीण विकासासाठी असेल तर हे १०० टक्केचं गृहीतक कसं काय पचनी पडावं. याला कोणी नव्वद टक्क्यांची सूज म्हणतं तर कोणी बोर्डाने दिलेलं दान म्हणतं. या संदर्भात ज्या ज्या शिक्षकांशी बोलले त्या सगळ्यांचं एकमत आहे, हे गुण विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा ‘किमान’ वीस टक्के तरी जास्त असतात. हा निकाल म्हणजे क्षणिक समाधान आहे हो, असं सहकारी उद्विग्नतेने म्हणाले, पूर्वी पुस्तक किंवा गाइडमधली प्रश्नोत्तरं पाठ करून लिहिणारे जर का वीस टक्के असतील तर आज ते सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त टक्के आहेत आणि शिक्षणक्षेत्रात ‘घोका आणि ओका’ या पद्धतीला कात्री लावायची म्हणता म्हणता तीच पद्धत जास्त प्रचलित झालीये आणि हे घोकणंही अगदीच तात्पुरतं. या तात्पुरत्या घोकण्यापायी अनेक शाळांमध्ये आणि घरांमध्ये दहावीची मुलं वेठीला धरल्याचं चित्र सर्रास दिसतं. दहावी म्हणजे गॅदिरगमध्ये सहभाग नाही, क्रीडामहोत्सवात भाग नाही, टी.व्ही. वगैरे बंदी असतेच घरात, पण शालेय स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांला भाग घे म्हटलं तर एखादा गुण तर यामुळे कमी
होणार नाही ना, असं दहा-दहादा विचारणारे पालक बघून जीव घाबराच होतो. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा दृढ समज व्हायला लागलाच की अभ्यासातलं जे काही लक्षात ठेवायचं आहे ते फक्त येणाऱ्या परीक्षेपुरतंच. परिणामत: विद्यार्थ्यांचा दीर्घकालीन स्मरणशक्तीकडे कलच कमी होत चाललेला आहे. बरं, कमी श्रमात जास्त गुण मिळाले की, श्रम करण्याची वृत्तीच लोप पावत जाते तेच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसतंय. अजूनही एक मोठ्ठी खंत आहे, अगदी लहानपणापासूनच गुणांची जी ही अकारण अशी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे भावी आयुष्यात मुलाला जेव्हा खरी लढत देण्याची गरज असते तेव्हा तो जिद्द हरवून बसलेला असतो, स्पर्धेबाबतची गंमतच करपून गेलेली असते. त्यामुळेच खऱ्या स्पर्धापरीक्षांमध्ये आमचा टक्का नगण्यही उरत नाही. का नाही आपण फार आय.ए.एस. घडवू शकत, ऑलिम्पिकपटू खूप कमी का याची सारी मेख त्या अकाली स्पर्धेमध्ये आहे यावरही माझ्या सर्व शिक्षकमित्रांचं एकमत झालं. दहावीबरोबर एन.टी.एस.(नॅशनल टॅलेंट सर्च) परीक्षेसाठीचं विशेष कोचिंग करणारे माझे एक मित्र एन.टी.एस.च्या निकालाच्या बाबत मात्र समाधानी आहेत. ते म्हणतात, एन.टी.एस. पात्र विद्यार्थ्यांबद्दल प्रश्नच नाही, एन.टी.एस.च्या पहिल्या फेरीत निवडला गेलेला आणि दुसऱ्या फेरीत अपात्र ठरलेला विद्यार्थीही पुढच्या आयुष्यात खचून गेलेला पाहिला नाहीए, पण दहावीत शंभर टक्के मिळवत राज्यात पहिला आलेला विद्यार्थी मात्र बारावी व त्यापुढील स्पर्धेत टिकतोच असं नाही, कारण दहावीपर्यंतचा अभ्यास हा हे मला करायचंच आहे म्हणून केला जातो, हे मला आवडतं का, हे करताना मला आनंद होतोय का याचा विचार करायला विद्यार्थ्यांला सवड दिली जात नाही किंवा त्याला तशी सवय लावली जात नाही. त्यामुळे दहावीत शंभर टक्के मिळवणाराही त्यानंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सी.ई.टी.मध्ये किंवा त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये मागे पडतो, कारण त्यासाठी अभिरुची आणि अभिवृत्तीची गरज असते. त्याचा विचार कोठेच झालेला नसतो. त्यामुळे भावी जीवनात आई-वडिलांकडे पैसा असेल तरच ते त्याला तारून नेऊ शकतात हेही ते सोदाहरण सांगतात.
गुणदानाच्या अतिरेकाने चौऱ्याण्णव टक्के मिळवूनही हमसाहमशी रडणारी, मिटून गेलेली मुलगी पाहून माझी एक शिक्षिका मैत्रीण स्वत:च मिटून जात उद्गारली, ‘‘यापेक्षा जास्त हवेयत?’’ शिक्षक म्हणून गुण देणाऱ्याच्या भूमिकेत जेव्हा आम्ही असतो, तेव्हा या गुणांच्या हव्यासाचा आणि रॅट रेसचा खूप वाईट परिणाम भोगतो. एक तर आम्ही नेहमी संशयाच्या भोवऱ्यात उभे असतो, हे आमचे गुण कमी करणार नाहीत ना, हे पार्शलिटी तर करत नाहीत ना, हे माझे गुण खाणार(?) तर नाहीत?  या मुद्दय़ावर एकजण रागारागाने म्हणतात, ‘‘आमचं आयुष्य हे सापेक्ष आहे, विद्यार्थ्यांचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवेपर्यंतच त्या विद्यार्थ्यांपुरतं माझं आयुष्य.’’ हे सगळ्यांचंच मत नाहीए पण असं मत तयार होतंय हे कानाडोळा करण्यासारखं मुळीच नाहीए. बरं, हे गुण कमी द्यावेत तर ते अशक्य. हे मात्र सगळेजण एकमुखाने मान्य करतात. शाळा तर जास्तीतजास्त गुण देण्यासाठी आग्रही असतेच, पण बोर्डातही मुलांना सढळ(?) हाताने गुण द्या, अशी तोंडी सूचना असते हे अनेक मॉडरेटर आणि परीक्षक खासगीत सांगतात. सढळ म्हणजे काय, सढळ म्हणजे अवास्तव का, सढळ म्हणजे डोक्यात जातील एवढे का, सढळ म्हणजे त्याच्या क्षमतेच्या कक्षेच्या कितीतरी बाहेर असणारे का असे सढळतेबाबतचे अनेक प्रश्न आहेत. विशेष म्हणजे या अवास्तव अतिरेकी सढळतेबाबत पालकांची तक्रार तर नाहीच, उलट त्याचं त्यांना प्रचंड कौतुक आहे.
‘सढळ’ या शब्दाबाबत हे अनेक प्रश्न मनात येतात, कारण हे ‘सढळ’ गुण देण्याच्या गडबडीत गुण कमवायचे असतात, त्यासाठी परिश्रम करायचे असतात, ते कोणी दान देण्याची गोष्ट नाहीच आहे हो, हे कोणी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतं; त्यापेक्षा वाईट शब्द म्हणजे गुण पाडणे. दहावीत एवढे गुण पाडायचे, ते असे पाडायचे ते तसे पाडायचे. अभ्यास, त्याची खोली, त्याचं महत्त्व हे सारं दृष्टीआड करून हे गुण पाडण्याचं ‘स्टॅटिस्टिक’ मांडत बसणाऱ्यांचा मला तरी हेवा वाटतो. त्याबरोबरच व्यवस्थेला नाके मुरडत परत गुणांचाच विचार करत बसणाऱ्यांची कीवही येते, कारण याच व्यवस्थेने कलचाचणीसारखा (अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट)उत्तम मार्गदर्शक समोर ठेवला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कलचाचणीला गुणदान नाही त्यामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं की काय अशी शंकेची पालही मनात चुकचुकते. अजूनही दहावीच्या गुणांबाबत खूप म्हणजे खूपच संवेदनशील असलेले पालक कलचाचणीच्या निकालाबाबत अत्यंत असंवेदनशील कसे असतात तेच समजत नाही. अनेकदा सांगूनही त्यांना त्या निकालामध्ये स्वारस्य नसतंच. आमच्या या निमशहरी भागात साठ टक्क्यांच्या पुढे गुण मिळाले म्हणजे सायन्स असा शेरा मारणारे व तो आचरणारे पालक आहेत, तर शहरी किंवा महानगरी भागात जिथे आयुष्य म्हणजेच एक स्पर्धा आहे तिथे उत्तीर्णापैकी ४५ ते ४८ टक्के लोंढा आंधळेपणाने सायन्सकडे जातो आणि दोन वर्षांनी त्यातला मोठ्ठा वर्ग अनिश्चिततेच्या गर्तेत सापडतो यात आश्चर्य ते काय? दहावीला ८४ टक्के मिळाले म्हणून गणित-सायन्समध्ये कोणतीही गती नसताना सायन्स शाखा निवडत बारावीला आपटी खाणारा माझा एक नातेवाईक हे त्याचं उत्तम उदाहरण. पैसा, श्रम यांची हानी झालीच पण कधीही भरून न येणारी र्वष आणि न्यूनगंडाची पेरणी होते याचं काय?
माझ्या एका पंचविशीच्या माजी विद्यार्थ्यांने गुणांच्या या कसरतीबाबतचे काही अनुभव सांगितले, तो म्हणाला, ‘‘माझे काही मित्र-मैत्रिणी असे आहेत की दहावीमध्ये हे सगळं स्टॅटिस्टिक मांडत भरपूर गुणांचे धनी ठरले, पण पुढे हरतच गेले. कारण तिथे हे स्टॅटिस्टिक उपयोगी पडलं नाही, मग कोणी इंजिनीअिरग अध्र्यातनंच सोडलं, कोणी अनेक कोर्सेसची धरसोड केली वगैरे वगैरे’’ पण बरोबरच त्याला नि मलाही त्याच्या वर्गातल्याच सिद्धेशचं उदाहरण चटकन आठवतं. दहावीला पंचाहत्तर टक्के मिळवलेल्या सिद्धेशने इंजिनीअिरगचा डिप्लोमा ऐंशी टक्क्यांनी पास करत डिग्री तशीच पूर्ण केली आणि वयाच्या पंचविशीतच वेल सेटल्ड झाला. आजच्या भाषेत बोलायचं तर पॅकेजही उत्तम आहे. सिद्धेशसारखी अनेक उदाहरणं आहेत, पण जाणता-अजाणता त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. या सढळतेच्या गडबडीत अजून एक गडबड होतेय ती म्हणजे उत्तीर्णतेचं प्रमाणही सढळ असावं म्हणून प्रश्नपत्रिका अजून अजून सोप्प्या काढल्या जातात म्हणजेच काठिण्यपातळी घसरतेय आणि त्यामुळे जे प्रथम श्रेणीत आहेत ते विशेष श्रेणीत आणि विशेष श्रेणीत असणारे त्याच्याही पुढे जातात, कारण अध्यापनात जरी सोप्याकडून कठीणाकडे ही पद्धत असली तरी मूल्यमापनात मात्र सोप्याकडून अजून सोप्याकडे असा प्रवास चाललाय काय अशा संशयाने अनेक शिक्षकमित्रांना भंडावलंय.
जेव्हा मी माझ्या आत्ताच्या विद्यार्थ्यांशी या गुणांच्या हव्यासाबाबत बोलले तेव्हा असं आढळलं की हे असं हवंच हे त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे ‘बाय हुक ऑर क्रुक’ ते तसे गुण मिळवणार, त्यात त्यांचं भलंच आहे असं त्यांना वाटतं. पण जेव्हा पंचविशीच्या मुलांशी बोलले तेव्हा त्यांचं म्हणणं खूप वेगळं होतं. भरपूर गुण मिळवायचे(की पाडायचे?) या वृत्तीमुळे शालेय जीवनात फोकस फक्त गुण आणि त्यासाठीच्या पूरक गोष्टी. त्यामुळे आजची मुलं मल्टीटास्किंग कपॅसिटीज, खूप काही गोष्टी करण्यातलं कौशल्य हरवत चाललीत असं त्यातल्या अनेकांना वाटतंय, ही मुलं पुढे असमाधानी वृत्तीची शिकार होतील अशीही भीती त्यातील काहींनी बोलून दाखवली, कारण गुणांबाबतचं जसं असमाधान तसंच जीवनाबाबतचं. खेळ खेळण्याचं प्रमाण कमी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग बेताबेताने, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी क्वचितच त्यामुळे त्यांचं सामाजिक जीवनही धोक्यात येतंय हे सगळ्यांचंच म्हणणं पडलं.
पेशाने डॉक्टर असणाऱ्या माझ्या पालक मैत्रिणीने खूप दूरगामी विचार करून एक भाष्य केलं ते खरंच हेलावणारं आहे, ती म्हणते, या मुलांना खूप गुण मिळवायची सवय आहे हा मोठय़ा मुलांबाबतचा विचार, पण लहानपणापासूनच श्रेणी जरी असेल तरी अ+ किंवा शेरा जरी असला तरी अप्रतिम वगैरेच मिळण्याची सवय त्यामुळे जेव्हा पुढे हे संसारात पडतील किंवा नोकरीला जातील तेव्हा सहचराने किंवा सहकाऱ्याने यांची चूक दाखवून दिली ती तर यांना रुचणारच नाही, त्यातून विमनस्कता किंवा वैफल्य येईल, मानसिक शांती ढळेल, त्यातून कौटुंबिक वादळं निर्माण होतील, घटस्फोटाचं प्रमाण अतिरेकी होईल, सतत नोकरीधंदा बदलण्याची वृत्ती वाढेल आणि त्याचा परिणाम त्यापुढच्या पिढीवर नक्कीच होईल आणि तो नकारात्मकच असेल. हा विचार डोक्याला झिणझिण्या आणणाराच आहे. विचार करायला लावणारा आहे.
एकेकाळी कमी लागणारे निकाल, नापास होण्याचं मोठं प्रमाण, स्थगन आणि गळती हे सारे प्रश्न शिक्षणक्षेत्राला भेडसावत होते म्हणून हा सढळतेचा पर्याय काढला गेला तर त्यावरही हे भाष्य करतायत, काहीही करा त्यावर भाष्य करणारे असणारच असं मत या सर्व लिखाणाबाबत व्यक्त होऊ शकतं. पण हा विरोधाला विरोध नाहीए, स्थगन आणि गळती हे नापास होण्याचे किंवा कमी गुणांचे दृश्य परिणाम होते, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या हाही दृश्य परिणाम पण आजच्या या भरपूर गुणांचे अदृश्य आणि दूरगामी परिणाम त्यापेक्षा जास्त आहेत. तरुणपणात न्यूनगंड, वैफल्य निर्माण होऊन या मुलांच्या ज्या मानसिक आत्महत्या होतात याबाबतचा विचार किंवा अभ्यास कोणी केलाय का? कारण ज्यांना भरपूर गुण मिळून ते याच्यातून बाहेर पडलेयत ते सिंहावलोकन करत, याच व्यवस्थेचे ते परिणाम आहेत हे मान्य करायला कचरतायत त्यामुळे त्याचा पुरता स्फोट होईपर्यंत ते पुढे येणार नाहीत. पण हे असंच चाललं तर भौमितिक श्रेणीने बदल घडत स्फोट व्हायला जास्त काळ लागणारही नाही.
आज मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांना अभ्यासात रस नाही, जास्त गुण मिळवणारे सगळेच घोकू आहेत असं मुळीच नाही. असे अपवाद आहेत, पण ते नियमाला असणारे अपवाद, संख्येने कमी. जास्त संख्येने असणाऱ्यांना त्यांच्या क्षमतेची अचूक जाणीव करून द्यायची असेल तर गुण त्यांच्या क्षमतेच्या प्रमाणातच असावेत हे सांगण्यासाठीच हा सारा प्रपंच!
‘सढळ’ या शब्दाबाबत हे अनेक प्रश्न मनात येतात, कारण हे ‘सढळ’ गुण देण्याच्या गडबडीत गुण कमवायचे असतात, त्यासाठी परिश्रम करायचे असतात, ते कोणी दान देण्याची गोष्ट नाहीच आहे हो, हे कोणी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतं; त्यापेक्षा वाईट शब्द म्हणजे गुण पाडणे. दहावीत एवढे गुण पाडायचे, हा विचार फारच भयावह.
सढळतेच्या गडबडीत अजून एक गडबड होतेय ती म्हणजे उत्तीर्णतेचं प्रमाणही सढळ असावं म्हणून प्रश्नपत्रिका अजून अजून सोप्प्या काढल्या जातात म्हणजेच काठिण्यपातळी घसरतेय आणि त्यामुळे जे प्रथम श्रेणीत आहेत ते विशेष श्रेणीत आणि विशेष श्रेणीत असणारे त्याच्याही पुढे जातात, कारण अध्यापनात जरी सोप्याकडून कठीणाकडे ही पद्धत असली तरी मूल्यमापनात मात्र सोप्याकडून अजून सोप्याकडे असा प्रवास चाललाय काय अशा संशयाने अनेक शिक्षकमित्रांना भंडावलंय.
दहावीला मिळणारे गुण म्हणजे गुणांचं अतिशयोक्तीकरणच वाटतं. सजीव माणसाच्या स्मृतीमध्ये गेलेल्या माहितीचा शंभर टक्के साठा होईल आणि तो तसाच उतरेल हे पटतच नाही. म्हणजेच आजची परीक्षा केवळ ज्ञानाधिष्ठित आहे असं जरी मानलं तरी हे पटत नाही, मग शिक्षण ही प्रक्रियाच जर सर्वागीण विकासासाठी असेल तर हे १०० टक्केचं गृहीतक कसं काय पचनी पडावं? याला कोणी नव्वद टक्क्यांची सूज म्हणतं तर कोणी बोर्डाने दिलेलं दान म्हणतं. या संदर्भात ज्या ज्या शिक्षकांशी बोलले त्या सगळ्यांचं एकमत आहे, हे गुण विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा ‘किमान’ वीस टक्के तरी जास्त असतात.
स्थगन आणि गळती हे नापास होण्याचे किंवा कमी गुणांचे दृश्य परिणाम होते, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या हाही दृश्य परिणाम पण आजच्या या सढळ हस्ते दिल्या जाणाऱ्या भरपूर गुणांचे अदृश्य आणि दूरगामी परिणाम त्यापेक्षा जास्त आहेत. तरुणपणात न्यूनगंड, वैफल्य निर्माण होऊन या मुलांच्या ज्या मानसिक आत्महत्या होतात याबाबतचा विचार किंवा अभ्यास कोणी केलाय का?
मेघना जोशी
joshimeghana.23@gmail.com

First Published on June 24, 2017 4:23 am
Web Title: ssc result 2017 and student psychology marathi articles

शिक्षणातून सक्षमीकरण मानव विकासाची संकल्पना दृष्टिपथात ठेवून किंबहुना शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढावा सुरेखा मुळे | Updated: July 8, 2017 12:22 AM

शिक्षणातून सक्षमीकरण

मानव विकासाची संकल्पना दृष्टिपथात ठेवून किंबहुना शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढावा

सुरेखा मुळे | Updated: July 8, 2017 12:22 AM
मानव विकासाची संकल्पना दृष्टिपथात ठेवून किंबहुना शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढावा, त्यांची शैक्षणिक गळती थांबावी या दृष्टीने शिक्षण विभागाने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली. ‘विद्यार्थ्यांसाठी’ या शब्दात मुले आणि मुली अभिप्रेत असून काही योजना या खास मुलींसाठी आहेत. आदिवासी विद्यार्थी शाळेत येत नाहीत म्हणून या मुलांना शाळेत येण्याकरिता प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना विद्यावेतन देण्याची योजना शासनाने सुरू केली.
मानव विकासाच्या संकल्पनेत स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क आणि संधी अभिप्रेत आहे. हीच मानव विकासाची संकल्पना दृष्टिपथात ठेवून, किंबहुना शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढावा, त्यांची शैक्षणिक गळती थांबावी या दृष्टीने शिक्षण विभागाने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली. ‘विद्यार्थ्यांसाठी’ या शब्दात मुले आणि मुली अभिप्रेत असून काही योजना या खास मुलींसाठी आहेत. त्या सर्व योजनांची ही थोडक्यात माहिती.
शिष्यवृत्ती योजना
१) पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
२) ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (केंद्र सरकार)
३) ग्रामीण भागातील हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
४) कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय (खुल्या) गुणवत्ता शिष्यवृत्त्या
५) संस्कृत शिक्षण-माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्त्या
६) राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय, डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्त्या
७) आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
८) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (केंद्र सरकार)
९) अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – विद्यार्थ्यांसाठीच्या (मुले/मुली) योजना –
१) स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती –
गोवामुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना १९९०-९१ वर्षांपासून शुल्कमाफीची सवलत दिली जाते. सवलती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरांवर दिल्या जातात. या योजनेतील उत्पन्न मर्यादेची अट काढून टाकली आहे. (ही संख्या कमी झाली आहे.)
२) आजीमाजी सैनिकांच्या मुलांना-मुलींना – पत्नी आणि विधवांना शैक्षणिक सवलती- योजनेत सैनिकांच्या मुलांना, मुलींना, पत्नीला, विधवांना शैक्षणिक सवलती देण्यात येतात. प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय व इतर सर्व स्तरांवर या शैक्षणिक सवलती देण्यात येतात. यात शिष्यवृत्ती, विद्यावेतन, परदेश शिक्षण, संगणक प्रशिक्षण आणि पुस्तक अनुदानासह इतर सवलतींचा समावेश आहे.
३) एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना फी माफी –
ज्या विद्यार्थ्यांच्या (मुले) पालकांचे उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफीची ही योजना आहे. (ईबीसी) १२ वीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत असल्याने सध्या या योजनेचा लाभ ११ वी व १२ वीमधील विद्यार्थी (मुले) घेतात.
४) १० वीपर्यंत सर्वाना मोफत शिक्षण
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून इयत्ता १ ली ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणित दराने मोफत शिक्षण योजना लागू आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य आवश्यक आहे. राज्यातील शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
५) आदिवासी विद्यावेतन –
गरिबीमुळे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शाळेत उपस्थित राहण्याचे प्रमाण कमी आहे. ते नियमित शाळेत उपस्थित राहावे याकरिता त्यांना मोफत गणवेश, पुस्तके, पाटय़ा इत्यादी साहित्य पुरवण्यात येते. असे असूनही हे विद्यार्थी शाळेत येत नाहीत म्हणून या मुलांना शाळेत येण्याकरिता प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना विद्यावेतन देण्याची योजना शासनाने सुरू केली. ज्या ठिकाणी मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय आहे अशा आश्रम व निवासी शाळांमधील विद्यार्थी विद्यावेतनास पात्र नाहीत. विद्यावेतन मिळण्यासाठी चांगली वर्तणूक, कमीत कमी ७५ टक्के उपस्थिती आणि अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वर्षांला सरासरी ५०० रुपयांचे विद्यावेतन देण्यात येते. (संपर्क – योजना पहिली ते पाचवीसाठी अंमलबजावणी यंत्रणा शिक्षणाधिकारी ‘माध्यमिक’ जिल्हा परिषद)
इतर योजना
राज्यात टंचाई जाहीर झाल्यानंतर टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ केली जाते. याशिवाय राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक महाविद्यालयातील सर्व स्तरांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण योजनादेखील राबविली जाते. याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांत अत्यंत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती दिल्या जातात. यात परीक्षा शुल्क माफ करणे, संपूर्ण प्रवेश व शैक्षणिक शुल्काचा परतावा, वह्य़ा, पुस्तके व इतर किरकोळ खर्चासाठी किरकोळ वार्षिक अनुदान याचा समावेश आहे. (संपर्क- अंमलबजावणी यंत्रणा विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद)
मुलींसाठीच्या योजना
१. अध्यापक विद्यालयातील स्त्रियांसाठी ३० टक्के आरक्षण व मोफत शिक्षण –

स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिल्यामुळे स्त्री शिक्षकांची संख्या वाढण्यासदेखील मदत होते हे लक्षात घेऊन जिथे स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी आहे अशा औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, धुळे, नंदूरबार व गडचिरोली या जिल्ह्य़ातील शासकीय अनुदानित व विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या जातात व यातील ज्या मुली दारिद्रय़रेषेखालील आहेत त्यांना गुणवत्तेनुसार व त्यांच्या पसंतीनुसार राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित/विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयात प्रवेश देऊन मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी ती मुलगी किंवा स्त्री ही त्या जिल्ह्य़ात १५ वर्षे रहिवासी असली पाहिजे तसेच तिने दारिद्रय़रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र सोबत दिले पाहिजे.
(संपर्क- अंमलबजावणी यंत्रणा- शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद)
२. माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून ३ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता –
केंद्र शासनाची ही योजना खासगी विनाअनुदानित शाळांमधील आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून इयत्ता ८ वी उत्तीर्ण झालेल्या आणि ९ वीत शिकत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या मुलींना लागू आहे. वयाची १६ वर्षे पूर्ण न झालेल्या अविवाहित मुलींसाठीच ही योजना लागू आहे. (संपर्क- शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद)
३. मॉडेल स्कूल व मुलींचे हॉस्टेल
केंद्र शासनाने प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच मुलींच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्य़ांतील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नंदूरबार, नवापूर, गेवराई, वडवणी, धारूर, हिंगोली, परभणी, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा, पाथरी, सेलू, मानवत, भोकरदन, परतूर, मंठा, घनसांगवी, अंबड, जालना, बदनापूर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, गगनबावडा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, मुखेर, उमरी, धर्माबाद, बिलोली, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या ४३ ठिकाणी मॉडेल स्कूल व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याची योजना राबविली आहे. (संपर्क – शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद)
४. मुलींना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण –
राज्यात १० वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त ११ वी १२ मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळतो. अनुदानित तसेच विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना ही योजना लागू आहे. योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची अट नाही. सर्व आर्थिक स्तरांतील विद्यार्थिनी आपोआपच या योजनेस पात्र ठरतात.
५. अहल्याबाई होळकर मुलींना मोफत पास योजना
स्त्री शिक्षण हे प्रगतीचे सूत्र मानून शासन मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील ज्या मुली गावात शाळा नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांच्याकरिता इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. ही सवलत फक्त ग्रामीण मुलींसाठीच आहे. ग्रामीण भागात जिथे माध्यमिक शिक्षणाची सोय आहे, पण दुसऱ्या गावात अथवा शहरात जाऊन माध्यमिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना ही सवलत घेता येणार नाही.
६. राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील मुलींचे शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्रय़रेषेखालील इयत्ता ८ वीच्या मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भाग व क वर्ग नगर परिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी ही योजना लागू आहे. यासाठी इयत्ता ७ वीमध्ये ४५ टक्के गुण प्राप्त केलेले असणे तसेच लाभार्थी शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेली असणे आवश्यक आहे. योजनेत लाभार्थ्यांची निवड करताना दुर्गम, अतिदुर्गम भाग तसेच शहरी भागात झोपडपट्टी तसेच गलिच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य दिले जाते. (संपर्क – अंमलबजावणी यंत्रणा- शिक्षणाधिकारी- माध्यमिक जिल्हा परिषद) याशिवाय बालवीर आणि वीरबाला (महाराष्ट्र राज्य स्काऊट व गाइड योजना) राज्यात राबविली जाते.
७. स्वयंसिद्धा स्त्रियांकरिता स्वसंरक्षण व प्रशिक्षण
महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री ही स्वयंसिद्धा व्हावी, निर्भयपणे वावरावी यासाठी क्रीडा विभागातर्फे मुली आणि स्त्रियांसाठी ही योजना राबविण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ात यासाठीचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. योजनेत स्त्री मास्टर्सकडून विविध शाळांमध्ये, महाविद्यालयातील मुलींना तसेच इतर घटकांतील स्त्रियांना स्वसंरक्षणाचे पाठ तसेच कायदेशीर मार्गदर्शन दिले जाते. (संपर्क – साहाय्यक संचालक क्रीडा व युवक सेवा) याशिवाय शालेय पोषण आहार योजना, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठय़पुस्तक योजना, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनांचा लाभदेखील मुलींना मिळतो.
सुरेखा मुळे
drsurekha.mulay@gmail.com
First Published on July 8, 2017 12:22 am
Web Title: marathi articles on importance of girls education

Wednesday, March 22, 2017

जीवशास्त्रात रस घ्या जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा अतिशय मनोरंजक विषय आहे.

जीवशास्त्रात रस घ्या

जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा अतिशय मनोरंजक विषय आहे.

प्रा. श्यामलता कुलकर्णी | February 10, 2017 12:26 AM


बारावी विज्ञान विभागाचा विचार केल्यास पीसीएमबी या गटाचे महत्त्व मोठे आहे. काल आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या टिप्स पाहिल्या. आज गणित आणि जीवशास्त्रासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी पाहू. या टिप्स दिल्या आहेत, या विषयांसाठी एचएससी बोर्डामध्ये परीक्षा नियामक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांनीच.
जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा अतिशय मनोरंजक विषय आहे. याला घाबरून न जाता यात रस घेऊन, समजून अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रहो, तुम्ही छान गुण मिळवू शकता.
  • बायोसाठी विभाग १ आणि २ असतात. सर्वप्रथम सुपरवायझरकडून या दोन्ही विभागांच्या पेपरसाठी योग्य तो यूआरडी कोड लावला आहे ना हे तपासून घ्या.
  • पेपर लिहिताना शक्यतो निळ्या पेनाचा उपयोग करा.
  • जे विषय कळायला कठीण जातात, त्यांचे तक्ते बनवा. त्यातून त्यातल्या संज्ञा, व्याख्या लक्षात ठेवा.
  • जो विषय वर्षभर कधीही वाचला नाही, तो आता ऐनवेळीसुद्धा पाहू नका. पेपरच्या आधी त्याचे वाचन टाळाच. कारण आता तो वाचून नीट समजला नाही तर गोंधळ उडण्याची शक्यता दाट असते.
  • चांगली झोप घ्या. पण फार लोळतही बसू नका. सकाळी योग्य नाश्ता करून जा. जास्त खाऊ नका किंवा कमीही खाऊ नका.
  • पेपरमध्ये अनेक ठिकाणी आकृत्या काढण्याची गरज लागणार आहेच. प्रमाणबद्ध, स्वच्छ आकृत्या काढा. त्याला योग्य ठिकाणी नावे द्या. आकृत्या सजवत बसू नका.
  • आपल्या पुस्तकातील जे धडे ३ गुणांसाठी असतात त्यावर शक्यतो वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. उदा. मायक्रोब्ज ऑफ ह्य़ुमन वेल्फेअर. विभाग दोनमध्ये जेनेटिक इंजिनीअिरग, जिनॉमिक्स, क्रोमोझोमल बेसेस ऑफ इनहेरिटन्स आहे. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ अर्थ, अ‍ॅनिमल हजबंडरी हे ३ गुणांसाठी असतात. त्यावरच शक्यतो वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात.
  • जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा पेपर २ मधला महत्त्वाचा धडा आहेच. तसेच बायोटेक्नॉलॉजी हा पेपर १मधला महत्त्वाचा धडा आहे. फिजिओलॉजी चॅप्टर्स पेपर १ मधले फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन आहे. त्याचसोबत विभाग २मध्ये आहेत, सक्र्युलेशन, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ह्य़ुमन रिप्रोडक्शन. या धडय़ांना गुण जास्त दिलेले आहे. पण फक्त जास्त गुण दिलेल्या धडय़ांनाच महत्त्व द्यायचे असे करू नका.
  • जीवशास्त्रासाठी महत्त्वाच्या धडय़ांचा विचार करताना जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक्स इन मेडिसिन, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन आहेत. हे धडे पर्यायांशिवाय ८ गुणांचे आहेत. तसेच बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड अ‍ॅप्लिकेशन, एनहान्समेंट इन द फूड प्रोडक्शन यासाठी  ७ गुण आहेत. मायक्रोब्ज ऑफ ह्य़ुमन वेल्फेअरसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न नक्कीच येईल. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन सात मार्काचा आहे. रिप्रोडक्शन इन प्लँट्स हासुद्धा महत्त्वाचा धडा आहे. ऑरगॅनिझम इन एन्व्हायर्न्मेंटलाही महत्त्व द्या. तसेच ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाइफमध्ये कनेक्टिंग लिंक, युरे अँड मिलर्स एक्स्पेरिमेंट, ह्य़ुमन एव्हेल्युशन, होमोलॉगस ऑर्गन्स, अ‍ॅनालॉगस ऑर्गन्स आदी आहेतच. जीवशास्त्रात उत्तरे लिहिताना उदाहरणांवर भर द्या. त्यासाठी तुम्हाला गुण मिळतात. ते न दिल्यास गुण जातात. ह्य़ुमन हेल्थ अँड डिसिजेस, अ‍ॅनिमल हजबंडरीज यामध्येसुद्धा बरेच पॅथोजन्स आहेत. अ‍ॅनिमल हजबंडरीजमध्ये प्राणी पैदास आहे. क्रोमोझोमल बेसेस ऑफ इनहेरिटन्समध्ये विभाग २मध्ये लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर्स या पाठावरही भर देऊ शकता. तसेच बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सक्र्युलेशन, एक्सक्रीशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ह्य़ुमन रिप्रोडक्शन हा विषय तुम्हाला ७ गुणांसाठी येऊ शकतो. ऑर्गनिझम्स इन एन्व्हायर्न्मेंट हा पाठ पेपर १ आणि २ दोन्हीमध्ये आहे. त्याचा चांगला अभ्यास करा. त्यात अनेक उदाहरणे सापडतील. पेपर २मध्ये इन्डेजिअस स्पेसीजचाही चांगला अभ्यास करा.
गणिताची गंमत
  • प्रा. सतिश मेस्त्री
बारावीच्या विज्ञान विभागात गणिताला खूप महत्त्व आहे. पुढे इंजिनीअरिंगसाठीही या विषयाची गरज पडते. आता बोर्डाच्या परीक्षेला काही दिवसच उरलेले असताना या विषयाचा अभ्यास कसा करावा, याविषयी काही टिप्स..
वर्षभर गणिताचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्याची भीती वाटण्याची आवश्यकता नाही. मला गणिताच्या पेपरमध्ये चांगले यश मिळणारच असा आत्मविश्वास बाळगा, पण तसे प्रयत्नही कराच. गणित भाग (१) व गणित भाग (२) या दोन्ही विषयांचा एकच पेपर असतो, त्याचे एकूण गुण ८० आहेत. पेपरला जाण्याच्या अगोदर या दोन पुस्तकांचा अगदी थोडय़ा कालावधीत कसा अभ्यास करावयाचा हे आपण पाहू.

  • गणित भाग १ व भाग २ मधील सर्व थिअरम्स आणि फॉम्र्युले वाचणे.
  • सोप्या घटकापासून सुरुवात करा. उदा. लॉजिक, मॅट्रिक्स
  • बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले थिअरम्स परत परत वाचा.
  • गणित भाग (१) व भाग (२) मधील प्रत्येक घटक संपल्यावर ‘रिमेंबर धिस’ हा तक्ता दिलेला असतो, तो अवश्य वाचणे.
  • दोन्ही पुस्तकांतील सोडविलेल्या सर्व उदाहरणांवरून नजर घाला.
  • प्रत्येक उदाहरणातील मुख्य पायऱ्या लक्षात ठेवा.
  • तुम्ही सोडविलेले उत्तर, काही वेळाने वाटले की ते चूक असेल, तर ते उत्तर न खोडता दुसऱ्या पानावर त्याचे उत्तर लिहावे.
  • शक्यतो सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणित भाग (१) व गणित भाग (२) या दोन्ही पुस्तकांतील कोणत्याही घटकाकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही.
गणित भाग (१) ची थोडय़ा वेळात कशी तयारी करायची, ते पाहूया
  • मॅथेमेटिकल लॉजिक प्त, ॰, ऽ, ञ् ज्ज् ची ट्रथटेबल आणि विदाऊट ट्रथ टेबलवरील उदाहरणे,  तसेच सर्किट डायग्राम शिफ्टेड फ्रॉम ट्रथ टेबल, डय़ुएल अँड निगोशनमधील फरक ओळखणे.
  • मॅट्रिक्समध्ये को फॅक्टर मॅट्रिक्स –
  1. अ‍ॅडजॉइंट मॅट्रिक्स
  2. एलिमेंट्री रो, कॉलम्स टू फाइड ए मॅट्रिक्स
  3. इनव्हर्जन मेथड
  4. रिडक्शन मेथड
  • ट्रिगनोमेट्रीक फंक्शन्सची सर्व सूत्रे आणि उदाहरणे काळजीपूर्वक वाचणे.
  • पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्समधील दोन सूत्रे आहेत. त्यातील एक विचारले जाते.
  • व्हेक्टर- कोलिनिअर अँड कोप्लॅनरवर आधारित उदाहरणे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि अ‍ॅप्लिकेबल व्हेक्टर टू जॉमेट्रीवर आधारित उदाहरणे.
  • थ्री डायमेन्शनल जॉमेट्री
  • लाइन – यातील बेसिकल कार्टेजन अँड व्हेक्टर रिप्रेझेंटेशन आणि एक्झाम्पल्स बेस्ड ऑन डिस्टन्स अभ्यासणे.
  • प्लेन जॉमेट्रीमधील- सर्व सोडवलेली उदाहरणे पाहणे.
  • लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम हे आलेख पेपरवर उदाहरणे सोडवणे.
गणित भाग २)
  • कंटीन्युइटी – यामध्ये कंटीन्युइटी अ‍ॅट द पॉइंट आणि कंटीन्युइटी ओव्हर (b) & (a.b)
  • डिफरन्शिएशन- यामध्ये तीन महत्त्वाचे थिअरम्स आहेत.
  • डेरिव्हेशन ऑफ कंपोझिट फंक्शन, डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्ज फंक्शन, डेरिव्हेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन इतर सर्व सूत्रे व त्यावरील आधारित उदाहरणे.
  • अ‍ॅप्लिकेशन ऑफ डेरिव्हेशन – प्रत्येक उपघटकातील उदाहरणांचा अभ्यास करणे.
  • इंटिग्रेशन – यात एकच थिअरम आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स सर्व सोडवलेली सूत्रे व त्यावर आधारित उदाहरणे अभ्यासावीत.
डेफिनिट इंटिग्रल- यामध्ये डेफिनिट इंटिग्रल अ‍ॅज अ लिमिट ऑफ सन हा टॉपिक ऑप्शनला ठेवू शकतो.
  • प्रॉपर्टीज ऑफ डेफिनिट इंटिग्रलचे थिअरम पेपरमध्ये विचारले जातात. त्यावरील सर्व उदाहरणे अभ्यासावीत.
  • अ‍ॅप्लिकेशन ऑफ डेफिनिट इंटिग्रल- फक्त एरिया अंडर द कव्‍‌र्ह यावर आधरित उदाहरणे असतील.
  • डिफरन्शिअल एक्वेशन- सर्व उदाहरणांचा अभ्यास करावा.
  • प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन यातही सर्व उदाहरणांचा अभ्यास करावा.
  • बिनोमियल डिस्ट्रिब्युशन लाही विसरू नका.
First Published on February 10, 2017 12:26 am
Web Title: biology

करिअरमंत्र कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते.

करिअरमंत्र

कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते.

सुरेश वांदिले | February 10, 2017 12:25 AM


कम्बाइंड डिफेन्सच्या जागा कधी सुटतात? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे? कोणती पुस्तके वाचू?
आकाश घोरपडे
कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते. पहिली परीक्षा साधारणत: फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. यंदा पहिल्या परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये १५० जागा, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडेमीमध्ये ४५ जागा, एअर फोर्स अ‍ॅकॅडमी येथे ३२ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे २२५ जागा भरल्या जाणार आहेत.
मी आता बारावी विज्ञान शाखेत आहे. मला औषधीनिर्माणशास्त्र शिकायचे आहे. त्यासाठी मला बी.फार्म आणि डी.फार्म यामध्ये काय फरक असतो ते सांगा?
आकाश सातव
बॅचलर ऑफ फार्मसी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्वत:चे औषधाचे दुकान सुरू करता येऊ  शकते. औषधीनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ  शकतात. एम.फार्म करून अध्यापन किंवा संशोधनाच्या क्षेत्रात संधी मिळू शकते. डी.फार्म हा दोन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर औषधी विक्रीचे दुकान काढता येऊ  शकते. औषधी विक्री करणाऱ्या मोठय़ा दुकानांत किंवा कॉर्पोरेट रुग्णालयांमधील औषधी विभागातसुद्धा नोकरी मिळू शकते. फार्मा डी हा १२वीनंतरचा सहा वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे. यातील एक वर्षे रुग्णालयामध्ये इंटर्नशिप करावी लागते. हा अभ्यासक्रम केल्यावर डॉक्टर अशी पदवी लावता येते. मोठय़ा रुग्णालयांमध्ये रुग्णांशी थेट संपर्क व समन्वय साधून सल्ला देण्याचे, औषधी सुचवण्याचे कार्य करू शकतात.
मी भूगोल/ गणित/ केमिस्ट्री हे विषय घेऊन बी.एस्सी. करत आहे. मला वैमानिक व्हायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल व त्यासाठी फी किती आहे?
सिद्धेश सोमनाथ चांडोल
वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेतलेले असणे गरजेचे असते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on February 10, 2017 12:25 am
Web Title: career guidance 18

Tuesday, March 7, 2017

संगणकावर कृषी माहिती सहज उपलब्ध या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.

संगणकावर कृषी माहिती सहज उपलब्ध

या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.

देशभरातील शेतीविषयक माहिती एका क्लिकवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मराठवाडा कृषी विद्यापीठात लवकरच प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्या प्रकल्पाचे नाव ‘नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन इनग्रो’ असे आहे.
Ads by ZINC

  • या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.
  • या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर देशातील कुठल्याही भागात सध्या असलेली पीक परिस्थिती, त्या ठिकाणी घेतले जाणारे पीक, हवामानाची स्थिती, हवामानाच्या बदलानुसार पीक नियोजनात केलेले बदल, पावसाचे प्रमाण, वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक सल्ला याबरोबरच कच्च्या मालासाठी बाजारपेठ, बाजारपेठेतील भाव आदी माहिती एकाच ठिकाणी मिळविणे सहज शक्य होणार आहे.
  • अलीकडच्या काळात हवामानात बदल होत आहे. पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे शेतीतही अचूकता आणणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचा सल्ला वापरून शेती केल्यास ती निश्चितच फायद्याची ठरेल आणि यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांना फलदायी ठरणार आहे.
  • शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे या बाबींची सांगड घालून शेती करणे गरजेचे झाले आहे. या संगणक कक्षात शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणाची शास्त्रीय माहिती मिळणार आहे. तसेच याच माहितीच्या आधारे पीक नियोजन करणे सोयीचे जाणार असल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • ई गव्हर्नन्सी प्लॅनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात बसून विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे सोपे होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यात त्या गावातील शेतकऱ्यांच्या गटाशी संपर्क साधून शास्त्रीय सल्ला देणे सोयीचे होणार आहे.
First Published on February 9, 2017 12:17 am
Web Title: agricultural information easily available on the computer

भौतिकशास्त्रात गती मिळवा लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते.

भौतिकशास्त्रात गती मिळवा

लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते.

प्रा. विलास बसरे | February 9, 2017 12:17 AM


रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विज्ञान विभागातले दोन महत्त्वाचे विषय. बारावीच्या परीक्षेसाठी आता या अंतिम टप्प्यांत याची तयारी कशी करावी, याबद्दल सांगताहेत, , एचएससी बोर्डामधील परीक्षा नियामक..
उच्च माध्यमिक परीक्षेसाठी भौतिकशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकूण १०० गुणांपैकी ७० गुण लेखी परीक्षेसाठी (कालावधी ३ तास) व ३० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (कालावधी ३ तास) असतात. लेखी परीक्षेसाठी ७० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून, त्यामध्ये दोन विभाग असतात. दोन्ही विभाग प्रत्येकी ३५ गुणांचे असून प्रत्येक विभागात चार प्रश्न असतात. दोन्ही विभागांसाठी एकच उत्तरपत्रिका असते.
लेखी परीक्षेची तयारी – लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते. प्रश्नपत्रिकेमध्ये १४ गुण वस्तुनिष्ठ (MCQ’S), ४२ गुण (विकल्पासह ५६) लघुउत्तरी व १४ गुण (विकल्पासह २६) दीघरेत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतात. पाठय़पुस्तकाचा सखोल अभ्यास करणे हीच परीक्षेची खरी गुरुकिल्ली आहे. कमीत कमी वेळेत आकृती काढण्याचा सराव करणे गरजेचे आहे. आकृत्या सुबक व नामांकित काढाव्यात. प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्नांना  सर्वात जास्त गुण आहेत, त्यामुळे अभ्यासक्रमातील Diagrams, Definitions, Applications, Uses, Properties, Distinguish between, Small derivations इत्यादी भागावर जास्तीत जास्त भर द्यावा.
वस्तुनिष्ठ प्रश्न हे ज्ञान व आकलनावर आधारित असल्यामुळे पाठय़पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिताना फक्त   a, b, c, d असे न लिहिता संपूर्ण उत्तर लिहिणे अनिवार्य आहे.
विभाग १ मध्ये सर्वाधिक गुण Oscillations (७ गुण) व Stationary waves (७ गुण) या पाठांना आहेत. विभाग २ मध्ये सर्वाधिक गुण Interference and Diffraction (६ गुण), EMI (६ गुण) व  Atoms, Molecules and Nuclei (६ गुण) या पाठांना आहेत. अर्थातच या पाठांची तयारी चांगली करावी. तयारी करताना नेहमी टाचण काढण्याची सवय असावी.
भौतिकशास्त्र विषयातील गणिते सोडविण्यासाठी प्रथम सूत्रांची उजळणी करणे गरजेचे आहे. पाठय़पुस्तकातील सोडवून दिलेली व सोडवण्यास दिलेली गणिते परत एक वेळ सोडवून उजळणी करावी. गणिते सोडवताना लॉग टेबल वापरणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ३४ ते ३६ गुण (विकल्पासहित) हे गणितासाठी असतात. गणिते सोडवताना प्रथम सूत्र, नंतर किमती टाकून उत्तर लॉग टेबल वापरून काढावे. शेवटी उत्तराला Unitc लिहिणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना संपूर्ण पेपर ३ तासांत सोडवायचा असतो, म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रम ३ तासांत आठवणे गरजेचे असते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुस्तक बंद करून प्रत्येक पाठातील संपूर्ण मुद्दे आठवतात की नाही याची पडताळणी करावी. जे मुद्दे आठवत नसतील ते बाजूला लिहून ठेवून त्यांची नंतर उजळणी करावी.
२) प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी कशी कराल?
प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाइन लॅब हा सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम सी डॅक मुंबईने बनविला असून तो अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी www.olab.com संकेतस्थळाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा. प्रात्यक्षिक परीक्षेच्या ३० गुणांपैकी प्रयोगवहीला ८ गुण, तोंडी उत्तरांना ६ गुण, १ प्रात्यक्षिक
८ गुण व दोन अ‍ॅक्टिव्हिटीजना ८ गुण असतात. लॉग टेबलच्या साह्य़ाने आकडेमोड करणे अनिवार्य आहे.

रसायनशास्त्राचे तंत्र
  • प्रा. किशोर चव्हाण
इयत्ता १२वी बोर्डाची ‘रसायनशास्त्र’ या विषयाची परीक्षा बुधवार, दिनांक ८ मार्च २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात हा विषय अतिशय व्यापक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयाची भीती जास्त आहे. सध्याचा रसायनशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम हा CBSE (NCERT)च्या धर्तीवर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी राज्य शासकीय पाठय़पुस्तकांचा सखोलपणे अभ्यास केला, तर अशा विद्यार्थ्यांना मेडिकल तसेच इंजिनीअरिंगच्या प्रवेश-परीक्षेत पात्र होणे हे अवघड नाही.
रसायनशास्त्र या विषयाचा पेपर हा ७० मार्काचा आहे व वेळेची मर्यादा ३ तास आहे. या पेपरमध्ये दोन विभाग आहेत व प्रत्येकी चार प्रश्न आहेत. दोन्ही विभागात  प्रत्येकी एक प्रश्न हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  स्वरूपाचा असतो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक धडय़ाच्याखालील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचा अभ्यास करावा. विभाग १मध्ये फिजीकल आणि इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे धडे आहेत. दुसऱ्या विभागात ऑरगॅनिक आणि उरलेले इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे धडे आहेत. पहिल्या विभागात एकूण पाच धडय़ांमध्ये न्युमरिकल्स विचारले जातात. ३०% प्रश्न हे त्यावर असतात. हे न्युमरिकल्स फॉम्र्युला बेस्ड म्हणजे सूत्रांवर आधारित असतात. प्रत्येक धडय़ामधील सूत्रे पाठ केली आणि धडय़ाखालील सोडवलेले आणि न सोडवलेले न्युमरिकल्स सोडवलेत तर विद्यार्थी जवळपास १०-१२ गुण मिळवू शकतो. विभाग एकमध्ये नियम, व्याख्या, आकृत्या, डेरिव्हेशन्स, डिस्टिंक्शन्स  इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून लक्षात ठेवणे आवश्यक आहेच. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ पाठांतर करून लिहिण्याचा सराव करणे गरजेचे आहे.
इयत्ता १२ वीचा शास्त्र विषयाचा पेपर हा चार घटकांवर तयार केला जातो. ज्ञान, समज,उपयोग आणि कौशल्य. रसायनशास्त्राच्या दोन्ही विभागांत आकृत्या आणि रचना विचारल्या जातात. विद्यार्थ्यांनी एकूण १५धडय़ांखालील यूझेस ऑफ चा अभ्यास जरूर करावा. कारण जवळपास ४-६ गुण हे उपाययोजनांवर आधारलेले असतात. विभाग एकमध्ये पी ब्लॉक एलिमेंटस या धडय़ाला जास्त गुणांकन आहे. हा धडा कोणत्याही परिस्थितीत ऑप्शनला टाकू नका.
इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे एकूण ४ धडे आहेत. विभाग एकमध्ये दोन आणि विभाग दोनमध्ये दोन. हे सर्व धडे थिअरॉटिकल म्हणजेच सैद्धांतिक असल्याने त्याचा नीट अभ्यास करा. धडय़ाखालील प्रश्न सोडवा. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे एकूण ७ धडे आहेत. यामध्ये जवळपास ३५ नेम्ड रिअ‍ॅक्शन्स आहेत. त्या पाठ करणे आवश्यक आहे. दुसऱ्या विभागात शेवटच्या तीन धडय़ांमध्ये व्याख्या,
रॉ मटेरिअल्स लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी शेवटी अभ्यास करत असताना न्यूमरिकल्स, लॉज, डेफिनेशन, डिस्टिंक्शन्स, यूझेस, अ‍ॅप्लिकेशन्स, डेरिव्हेटिव्हज, नेम्ड रिअ‍ॅक्शन्स, कन्व्हर्जन्स इ.चा व्यवस्थित अभ्यास केला तर विद्यार्थी परीक्षेत उत्तम गुण मिळवू शकतात. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर विद्यार्थ्यांना प्रश्नाचे स्वरूप व त्याची अपेक्षित उत्तरे लिहिता येतील, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे. पेपर सोडवत असताना मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. जे प्रश्न सोपे वाटत असतील त्याची उत्तरे सुरुवातीला लिहा व जे प्रश्न कठीण वाटत असतील ते पेपर पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करा, की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रात्यक्षिक परीक्षेचे महत्त्वही लक्षात ठेवा. या परीक्षेसाठी ३० गुण आहेत. त्यापैकी १०गुण व्हॉल्युमेट्रीक अ‍ॅनालिसीस आणि १० गुण हे इतर प्रयोगांच्या कॉम्बिनेशन्सवर आधारलेले आहेत. उरलेले १० गुण जर्नल, प्रोजेक्ट, आणि व्हायवाला दिलेले आहेत. योग्य पद्धतीने किंवा मार्गाने आपण अभ्यास केला तर यश आपलेच आहे.
First Published on February 9, 2017 12:17 am
Web Title: physics and chemistry