Saturday, September 9, 2017

नोकरीची संधी उमेदवारांना १०वीला किमान ६०% गुण आवश्यक.

नोकरीची संधी

उमेदवारांना १०वीला किमान ६०% गुण आवश्यक.

सुहास पाटील | Updated: August 16, 2017 11:47 AM
363
Shares
* सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च (एसएएमईईआर), मुंबई (भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयअंतर्गत एक रिसर्च आणि डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट) येथे ‘अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी’च्या एकूण ४२ पदांची भरती.
(इमाव – ११ पदे, अजा – ६, – अज – ३, खुला गट – २२)  ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –
(१) पवईसाठी – फिटर (४ पदे), मशिनिस्ट (४ पदे), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (१२ पदे), प्रोग्रॅिमग अँड सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (पीएएसएए) (६ पदे), टर्नर (२ पदे), वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉप्लेटर/ ड्राफ्ट्समन/मेकॅनिकल/आयटी अँड ईएसएम प्रत्येकी एक पद.
(२) खारघरसाठी – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (४ पदे), फिटर (२ पदे), पीएएसएए (३ पदे).
पात्रता –  पीएएसएएसाठी १२वी उत्तीर्ण. इतर पदांसाठी – १०वी उत्तीर्ण आयटीआयमधील संबंधित ट्रेडमधील पात्रता. उमेदवारांना १०वीला किमान ६०% गुण आवश्यक.
प्रशिक्षणा दरम्यान दरमहा स्टायपेंड रु. ७,०००/- पीएएसएए आणि वेल्डर ट्रेडसाठी आणि रु. ७,८७७/- इतर ट्रेड्ससाठी.
वॉकइन इंटरव्ह्यूसाठी पुढील तारखांना सकाळी ९.३०वाजता एसएएमईईआर, आयआयटी कॅम्पस (आयआयटी मेन गेट) हिल साइड, पवई, मुंबई – ४०००७६ या पत्त्यावर उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

यूपीएससीची तयारी : भूगोलाच्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा

यूपीएससीची तयारी : भूगोलाच्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा

मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात.

श्रीकांत जाधव | Updated: August 15, 2017 3:39 AM
465
Shares

मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात.

मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या संदर्भग्रंथाचा आढावा घेतलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे. आपणाला भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना या विषयाची विभागणी स्वतंत्रपणे दोन घटकांमध्ये करावी लागते. – पहिला घटक हा भारताचा भूगोल आणि दुसरा घटक जगाचा भूगोल. यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल ज्यामध्ये सामाजिक व आर्थिक भूगोल, आणि वसाहत भूगोल अशी विभागणी असते. प्रस्तुत लेखामध्ये भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये (२०१३-२०१६ पर्यंत) या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. भूगोल या घटकावर २०१३,२०१४,२०१५ व २०१६च्या मुख्य परीक्षेमध्ये अनुक्रमे ७, १०, ७ आणि ८ प्रश्न विचारण्यात आलेले होते. या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भूगोल या विषयामधील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर आहे, पण बहुतांश  प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले आहेत. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात. ज्यामध्ये भारताची प्राकृतिक

करिअरमंत्र या संस्थांना मानवी हक्क विषयातील तज्ज्ञांची गरज भासत असते.

करिअरमंत्र

या संस्थांना मानवी हक्क विषयातील तज्ज्ञांची गरज भासत असते.

सुरेश वांदिले | Updated: August 15, 2017 3:48 AM
0
Shares

प्रतिनिधिक छायाचित्र

मी अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. पण नंतर मला जाणवले की मला एनजीओ क्षेत्रात आणि विशेषत: मानवी हक्क या विषयामध्ये मला रुची आहे. या क्षेत्रात काही संधी आहे का? या संदर्भातील कोणता अभ्यासक्रम मला करता येईल? कौस्तुभ वराट
मानवी हक्काविषयी संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक युरोपीयन देश बरेच जागृत असतात. मानवी हक्क आणि अधिकार या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच स्वयंसेवी संस्था (एनजीओ) देश परदेशात कार्यरत आहेत. या संस्थांना मानवी हक्क विषयातील तज्ज्ञांची गरज भासत असते. मात्र अशा संधींचा शोध तुम्हाला स्वत:ला घ्यावा लागेल. काही राष्ट्रीय महत्त्वाच्या नियतकालिके व वृत्तपत्रांमध्ये अशा जाहिराती प्रकाशित होत असतात. काही संस्था-
(१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन राइट्स. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्य़ुमन राइट्स- संपर्क-  http://www.rightsedu.net,
(२) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्य़ुमन राइट्स लॉ
संपर्क-  http://ded.nls.ac.in/post-graduate-diploma-in-human-rights-law-pgdhrl/
(३) शासकीय विधि महाविद्यालय ,मुंबई. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन ह्य़ुमन राइट्स-  संपर्क-  http://glcmumbai.com
यंदाच माझे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमधून पदवी शिक्षण पूर्ण झाले आहे. मला यूपीएससी करायची आहे. पार्टटाइम जॉब करता करता त्याचा अभ्यास येईल का? – ऋतुजा जगताप

पुढची पायरी : अष्टावधानी बना कार्यालयात आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवायचा एक उत्तम मार्ग म्हणजे अष्टावधानी होणे.

पुढची पायरी : अष्टावधानी बना 

कार्यालयात आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवायचा एक उत्तम मार्ग म्हणजे अष्टावधानी होणे.

डॉ. जयंत पानसे | Updated: August 12, 2017 1:30 AM
0
Shares
एखाद्या व्यस्त कार्याल यात चुणचुणीत स्वागतिका सुहास्य वदनाने एकाच वेळी अनेक कामे करताना दिसते. तेव्हा तुम्ही तिच्या कार्यशैलीवर एकदम खूश होता. कुणाला ती गुड मॉर्निग म्हणते, कुणाला आठवणीने साहेबांचा निरोप सांगते, कुणाला फोन लावून देते तर कुणाला योग्य त्या सहकाऱ्याकडे काम पूर्ण करायला पाठवते. या सगळ्या गोष्टी ती जवळपास एकाच वेळी करत असते. कार्यालयातील एखाद्या वरिष्ठ साहेबांच्या कामाबद्दल माहिती घेताना आपण ऐकतो की त्यांनी कशा प्रकारे एकाच वेळी अनेक कामं, अचूक आणि वेळेत केली. अशा व्यक्तींच्या यशामागचे रहस्य म्हणजे अष्टावधानीपणा – शब्दश सांगायचं तर एकाच वेळी आठ कामे करणे. पण मथितार्थ म्हटला तर एकाच वेळी अनेक गोष्टी सहज हाताळणे आणि पूर्णत्वास नेणे.
कार्यालयात आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवायचा एक उत्तम मार्ग म्हणजे अष्टावधानी होणे. सुरुवातीला वाटते हे अवघड, पण सरावाने तुम्ही अशी अनेक कामे अचूकतेने एकाच वेळी करू शकता. त्यासाठी प्रयत्न मात्र करावयाला हवेत. एक काम संपल्यानंतर दुसरे काम अशा रीतीने क्रमश: कामे करत गेल्यास खूप वेळ लागतो. त्यातून तुमचा अनेक ग्राहकांशी संबंध येत असेल तर ते कंटाळूनच जातात.

समाधान योजना शासन यंत्रणा विविध नियम आणि पद्धतींचा अवलंब करीत असते.

समाधान योजना

शासन यंत्रणा विविध नियम आणि पद्धतींचा अवलंब करीत असते.

लोकसत्ता टीम | Updated: August 12, 2017 1:28 AM
0
Shares
शासकीय पातळीवर प्रत्येक नागरिकाचे काही ना काही काम असते. ही कामे तत्परतेने व्हावीत अशी त्याची अपेक्षा असते. मात्र शासन यंत्रणा विविध नियम आणि पद्धतींचा अवलंब करीत असते. यात दोन विभिन्न खात्यांशी संबंध असणारी बाब असेल तर फाइल इकडून तिकडे जाण्यात विलंब होतो. ही कामकाजाची पद्धतच आता बदलून विभागांच्या समन्वयातून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होताच हवे ते काम पूर्ण करुन देणारी योजना म्हणजेच समाधान योजना.
या योजनेतील सामाविष्ट कामे
  • महसूल विभागाशी संबंधित संजय गांधी निराधार योजना
  • श्रावण बाळ राज्य निवृत्तिवेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ तसेच विधवा निवृत्तिवेतन योजना
  • आम आदमी विमा योजना
  • जिल्हा परिषदेशी संबंधित शेती साहित्य वाटप
  • अपंगांचे साहित्य वाटप आणि इतर योजना
  • सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अनुसूचित जाती व जमातीसाठीच्या विविध योजना त्याच सोबत कृषी आणि आरोग्य विभागाशी संबंधित असणाऱ्या योजनांचा सामावेश या सुधारित समाधान योजनेत करण्यात आल्या आहेत.
प्रक्रिया आणि अधिकार
  • या उपक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
  • त्या त्या तालुक्याचे तहसीलदार यामध्ये समन्वयाचे काम करीत आहेत.
  • देखरेखीचे काम नायब तहसीलदारास देण्यात आले असून मंडळ अधिकारी हे अंमलबाजावणी अधिकारी आहेत.
  • तलाठी त्यांना साहाय्य करणार आहेत.

एमपीएससी मंत्र : मानव संसाधन विकास समर्पक योजना – भाग ३ २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत.

एमपीएससी मंत्र : मानव संसाधन विकास समर्पक योजना – भाग ३

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत.

रोहिणी शहा | Updated: August 11, 2017 1:47 AM
0
Shares
शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही काही योजना आहेत. उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी थेट रक्कम वितरित करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अशा दोन योजना राज्य शासनाने सुरू केल्या आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत. त्यांची परीक्षेपयोगी माहिती देत आहे. या दोन्ही योजनांच्या लाभाचे स्वरूप एकसारखेच आहे.
ते पुढीलप्रमाणे:
लाभाचे स्वरूप –

वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु. २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांचे मूलभूत निकषही एकसारखेच आहेत.
मुलभूत पात्रता
१.     विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
२.     विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
३.     विद्यार्थ्यांने आपल्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याशी स्वत:चा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक आहे.
४.     विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवाशी नसावेत.

नोकरीची संधी दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.

नोकरीची संधी

दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.

सुहास पाटील | Updated: August 11, 2017 1:44 AM
0
Shares
भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम) एससीआयच्या मेरिटाइम ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पवई, मुंबई येथे १ ऑक्टोबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअर्स (जीएमई)कोर्ससाठी प्रवेश.
एकूण जागा ६० (यूआर – ४०, इमाव – ११, एस्सी – ६, एसटी – ३)
पात्रता – बी. ई. (मेकॅनिकल) (अविवाहित पुरुष.)
वय – दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी कमाल २८ वष्रे, (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रे.) दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.
ऑनलाइन अर्ज  www.shipindia.com/careers/fleet-personnel.aspx या संकेतस्थळावर दि. २३ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.
भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरतर्फे होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटमार्फत डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स (डिप. आर.पी.) कोर्ससाठी प्रवेश.
हा कोर्स रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर होण्यासाठी महत्त्वाचाआहे.
एकूण प्रवेश ३० जागा (२५ नॉन-स्पाँसर्ड ५ स्पाँसर्ड्). कोर्स ऑक्टोबर, २०१७ पासून सुरू होणार. कालावधी एक वर्ष.
या कोर्समध्ये रेडिएशन फिजिक्समधील अभ्यास, प्रॅक्टिकल्स आणि फिल्ड ट्रेिनग (जे मेडिकल फिजिसिस्ट आणि रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर या पदांवर काम करणाऱ्यासाठी आवश्यक आहे.) मिळेल.