Monday, January 27, 2020

यूपीएससीची तयारी : जगाचा आणि भारताचा भूगोल (विषय ओळख) प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो.

यूपीएससीची तयारी : जगाचा आणि भारताचा भूगोल (विषय ओळख)

प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा  सर्वागीण अभ्यास केला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अमर जगताप, श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण मुख्य परीक्षेच्या पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती याची चर्चा करणार आहोत. या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख वैशिष्टय़, जगभरातील महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह), जगाच्या विविध (भारतासह) प्रदेशांतील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगाच्या स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान, निर्णायक भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलाशये आणि हिमाच्छादने) आणि महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना / घडामोडी उदा. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी सक्रियता, चक्रीवादळे इत्यादी; भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, या बदलाचे परिणाम इत्यादी घटक नमूद करण्यात आले आहेत. थोडक्यात याचे वर्गीकरण प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आर्थिक) अशा पद्धतीने करावे लागणार आहे व याचा अभ्यास जगाचा आणि भारताचा भूगोल अशा दोन भागांमध्ये विभागून करावा लागणार आहे.
प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा  सर्वागीण अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादीशी संबंधित माहितीचा अभ्यास करावा लागतो. प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयातील सर्वाधिक कठीण घटक आहे. कारण हा संकल्पनात्मक बाबीशी अधिक जवळीक साधणारा आहे म्हणून या घटकाचे योग्य आकलन होण्यासाठी या घटकाशी संबंधित संकल्पनांचे योग्य आकलन असणे गरजेचे आहे. शिलावरण यामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भू-अंतर्गत व भू-बाह्य बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावारणाचा अभ्यास करणाऱ्या विषयाला भूरूपशास्त्र म्हणतात. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात. सद्य:स्थितीतील चालू घडामोडीचे महत्त्व पाहता उपयोजित भूरूपशास्त्रासारख्या चालू घडामोडीशी संबंधित घटकांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा लागतो. जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली यांचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडीमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती, सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्राबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावशक आहे. जीवावरण घटकाचा अभ्यास जैवभूगोल या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी
हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो. पर्यावरण घटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नैसर्गिक स्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमानवाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची माहिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरिस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे.
मानवी भूगोल याअंतर्गत सामाजिक (लोकसंख्या भूगोल व वसाहत भूगोल) आणि आर्थिक भूगोल इत्यादीशी संबंधित माहिती अभ्यासावी लागते. या विषयाची उपरोक्त वर्गीकरणानुसार थोडक्यात उकल करून घेऊ या. मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.
यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, जन्मदर वितरण, मृत्युदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या
लाभांश या घटकांचा २०११च्या जणगणनेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्यांची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे. या घटकांत लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचे सक्तीने अवलंबन केल्याने उद्भवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इत्यादी. वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतीचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी प्रदेशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी एू किंवा रें१३ ज्या योजना राबविल्या जात आहेत त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतीचा अभ्यास करताना वसाहतीचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील भर देणे आवश्यक आहे.
आर्थिक भूगोलामध्ये मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आर्थिक प्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे; त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्रे यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्थावित दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.
उपरोक्त नमूद घटकांच्या आधारे आपणाला एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यास प्रादेशिक भूगोल असे संबोधले जाते. वढरउ च्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल समविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयांशी संबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्नांमध्ये पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित विचारले जातात.
First Published on July 25, 2019 12:14 am

शब्दबोध : घातवाफ घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे.

शब्दबोध : घातवाफ

घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
कुठल्याही भाषेचे सामथ्र्य हे त्या भाषेतील शब्दसंपत्तीवर अवलंबून असते. मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामथ्र्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या संतवाङ्मयाचा अभ्यास करायला हवा. ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध यांसारख्या संतसाहित्यात अनेक आशयगर्भ शब्द आपल्याला पदोपदी आढळतात. हे शब्द काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरी घासूनपुसून नव्याने वापरता येणारे आहेत. घातवाफ हा असाच एक आशयगर्भ शब्द संतवाङ्मयात आपल्याला आढळतो.
घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. हे सर्व संस्कृतमधील घात शब्दाचे अर्थ आहेत.
आज आपण ज्या शब्दाबद्दल बोलत आहोत, तो घातवाफ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील घात याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी  इत्यादीच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मोसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ‘या दिवसात उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’, असा आहे.
घातवाफ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळीवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असल्याचे मानले आहे. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी रानात असतो, असा काळ म्हणजेच घातवाफ होय.
घातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास सांभाळणे, जपणे, साधणे असा त्याचा अर्थ होतो. जसे,
क्षेत्र गुणे बीज अंकुरे।
ते अनंत धा वृत्ची विकार।
घातवाफ ते आदरे।
साधूनि घेतली।
घातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ. सध्या आपल्या मायमराठी भाषेला चांगले दिवस नाहीत. तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात आपली भाषा नष्ट होईल की काय, अशी भीती अनेकजण व्यक्त करताना दिसतात. परंतु तिला उर्जितावस्था येण्यासाठी प्रयत्न करणारे मात्र त्या तुलनेत बरेच कमी आहेत. खरोखरच मराठी भाषेला असे ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर आपल्या प्राचीन संतवाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरेल.
First Published on July 25, 2019 12:11 am
Web Title: word sense article abn 97

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर (भूगोलाची तयारी) या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर (भूगोलाची तयारी)

या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो.

फारुक नाईकवाडे
दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. या लेखामध्ये सामायिक अभ्यासक्रमाच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रम –
महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक  विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर, त्याचे स्रोत आणि स्थलांतरित ठिकाणांवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे पुनर्वसन.
या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल –
*  महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल (रचनात्मक)
*   यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.
*   राज्यातील नद्यांचा अभ्यास हा नदी खोऱ्यांचा / प्रणालींचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. उदा. महाराष्ट्रात उत्तर ते दक्षिण पुढील क्रमाने प्रणाली आढळतात. सातपुडा पर्वत तापी पूर्णा खोरे – सातमाळा अजिंठा डोंगररांगा – गोदावरी खोरे – हरिशचंद्र बालाघाट डोंगर – भीमा नदी खोरे – शंभू महादेव डोंगर – कृष्णा खोरे.
*  नैसर्गिक संपत्ती
*   महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे.
*   महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.
*   भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आर्थिक महत्त्व.
*  राजकीय
*   प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे याविषयी कोष्टक मांडणी करून टिपणे काढावीत.
*   राज्यातील जिह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नैसर्गिक भूरूपे या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.
*  लोकसंख्यात्मक भूगोल
* भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.
* वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी कोणत्या प्रकारे वसाहत विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.
* स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय, इ. दृष्टींनी अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी.
* झोपडपट्टीची व्याख्या, तेथील परिस्थिती, त्यांच्या निर्मितीची कारणे यांचा आढावा घ्यायला हवा. झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यातील ठळक बाबी माहिती असाव्यात. तसेच त्या दृष्टीने अद्ययावत चालू घडामोडीही माहिती असायला हव्यात.
चालू घडामोडींमध्ये खाणी, धरणे, महत्त्वाचे प्रकल्प यांबाबत नवे निर्णय, त्यांबाबत पर्यावरणीय मुद्दे, लोकांचा विरोध / स्वीकार ही तथ्यात्मक माहिती करून घ्यावी. तसेच राज्यातील नैसर्गिक तसेच इतर गंभीर आपत्तींची अद्ययावत माहिती असायला हवी.
First Published on July 24, 2019 4:23 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam tips mpsc exam guidance zws 70

चिनी इतिहासाचा साक्षीदार.. पेकिंग विद्यापीठ, चीन पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत.

चिनी इतिहासाचा साक्षीदार.. पेकिंग विद्यापीठ, चीन

पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत.

|| प्रथमेश आडविलकर
विद्यापीठाची ओळख – चीनमधील राष्ट्रीय स्तरावरील पहिले आणि सर्वात जुने असलेले पेकिंग विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले तिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. किंग साम्राज्याच्या राजवटीत या विद्यापीठाची स्थापना १८९८ साली ‘इम्पेरियल युनिव्हर्सिटी ऑफ पेकिंग’ या नावाने करण्यात आली. १९१२ साली विद्यापीठास सध्याचे नाव देण्यात आले. चीनमधील ऐतिहासिक चळवळींमध्ये या विद्यापीठाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पेकिंग विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ असून चीनमधील प्रतिष्ठित ‘सी-9 लीग’ या चिनी विद्यापीठांच्या संघटनेचा एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे. राजधानी बीजिंगच्या पश्चिमेकडे असलेल्या हैदियान जिल्ह्य़ात पेकिंग विद्यापीठाचा ‘यान युआन’ हा मुख्य कॅम्पस वसलेला आहे. विद्यापीठामध्ये सध्या सात हजारपेक्षाही अधिक पूर्णवेळ प्राध्यापक आहेत, तर चाळीस हजारांहूनही जास्त विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे.
अभ्यासक्रम – पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीचे आहेत, तर येथील पीएचडी अभ्यासक्रम हे चार ते सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठाने नॉन-डिग्री कोस्रेसचीसुद्धा रचना केलेली आहे. यामध्ये व्हिजिटिंग, रिसर्च स्कॉलर, प्रि-युनिव्हर्सिटी, को-ऑपरेटिव्ह आणि प्रत्येक विभागातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. पेकिंग विद्यापीठामधील पदवीपासून ते पीएचडी स्तरावरील सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम सहा विभागांकडून चालवले जातात. विद्यापीठात ‘सायन्सेस, इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, ह्य़ुमॅनिटीज, सोशल सायन्सेस, इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, हेल्थ सायन्स सेंटर’ हे प्रमुख सहा विभाग आहेत. या सहा प्रमुख विभागांतर्गत एकूण सत्तर इतर विभाग आणि महाविद्यालये कार्यरत आहेत. जवळपास १२९ पदवी अभ्यासक्रम, २८० पदवी अभ्यासक्रम आणि २५४ डॉक्टरल अभ्यासक्रम या सर्व महाविद्यालये आणि विभागांकडून शिस्तबद्ध रीतीने राबवले जातात. यांपकी बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजी भाषेमध्ये चालवले जातात. या सर्व विभागांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, इंग्रजी, मानसशास्त्र, आरोग्य संशोधन,  जैव-अभियांत्रिकी, पर्यावरण शास्त्र, भूभौतिकी, भौगोलिक शास्त्र,  धातू शास्त्र आणि अभियांत्रिकी, विमान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान,  बायोइंजिनीअिरग, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी,  व्यवस्थापन शास्त्र,  विद्युत अभियांत्रिकी, संगणक शास्त्र,  यंत्र अभियांत्रिकी, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र  इत्यादी विषय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जातात.
सुविधा – पेकिंग विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय केली गेली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे अपेक्षित आहे. विद्यापीठाकडून विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विद्यापीठाकडून हेल्थ इन्शुरन्स, हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर, करिअर सपोर्ट सेंटर, जिम, लायब्ररी, कम्युनिटीज, क्लब्स, म्युझियम, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मदत केंद्र यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
वैशिष्टय़
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चिनी सरकारने एकविसाव्या शतकात जागतिक दर्जाचे विद्यापीठ तयार करण्याच्या हेतूने उच्चशिक्षणाचा प्रचार करण्यासाठी पेकिंग विद्यापीठाला शासकीय विषय पत्रिकेच्या शीर्षस्थानी ठेवले. म्हणूनच सन २००० मध्ये बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी पेकिंग विद्यापीठामध्ये विलीन झाल्यानंतर पेकिंग विद्यापीठाचे शैक्षणिक संरचना आणखी मजबूत झालेली आहे. विद्यापीठातील अध्यापकवर्ग उत्कृष्ट असून संशोधन क्षेत्रात त्यांनी स्वत:ला जागतिक स्तरावर सिद्ध केलेले आहे. पेकिंग विद्यापीठाच्या दाव्यानुसार विद्यापीठाला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहिलेला आहे. येथील एकूण प्राध्यापकांपकी ४८ प्राध्यापक ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या प्रथितयश संस्थेचे सदस्य आहेत. याशिवाय नऊ प्राध्यापक ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयिरग’ तर इतर २१ प्राध्यापक ‘थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नामवंत संस्थांचे सदस्य आहेत.

Monday, January 20, 2020

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा संयुक्त पेपर सराव प्रश्न संयुक्त पेपर सराव प्रश्न

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा संयुक्त पेपर सराव प्रश्न

संयुक्त पेपर सराव प्रश्न


(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
*     प्रश्न १) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो?
१) २५ फेब्रुवारी
२) २७ एप्रिल
३) २९ जून
४) ३१ ऑगस्ट
*     प्रश्न ) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा मान कोणास प्राप्त आहे?
१) इंदिरा गांधी
२) सुषमा स्वराज
३) निर्मला सीतारामन
४) वरीलपैकी नाही
*      प्रश्न ३) पुढीलपैकी कोणत्या उत्पादनास जून २०१९मध्ये भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे?
१) सांगलीची हळद
२) कोल्हापुरी चप्पल
३) सोलापुरी चादर
४) सातारी कंदी पेढे
*      प्रश्न ४)पुढीलपैकी कोणत्या राज्याने महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये काम करण्याची मुभा देण्यासाठी फॅक्टरी कायदा १९४८मध्ये दुरुस्ती केली आहे?
१) केरळ
२) गोवा
३) कर्नाटक
४) महाराष्ट्र
*     प्रश्न ५) त्रिनेत्र हे काय आहे?
१) भारतीय वायुदलाचे टेहळणी विमान
२) इस्रोने प्रक्षेपित केलेला टेहळणी उपग्रह
३) शासकीय कार्यलयातील सी.सी.टीव्ही प्रणाली
४) भारतीय रेल्वेसाठी रडार प्रणाली
*      प्रश्न ६. हिमा दास व सरबज्योत सिंग हे खेळाडू अनुक्रमे —– व ——- या खेळांशी संबंधित आहेत.
१) अ‍ॅथलेटिक्स व नेमबाजी
२) बॉक्सिंग व तिरंदाजी
३) क्रिकेट व हॉकी
४) बॅडमिंटन व ज्युडो
*      प्रश्न ७) पुढीलपैकी कोणात्या राज्याने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जून २०१९मध्ये सुरू केली आहे?
१) पश्चिम बंगाल
२) छत्तीसगढ
३) राजस्थान
४) महाराष्ट्र
*      प्रश्न ८) सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
१) सुमित्रा महाजन
२) ओम बिर्ला
३) व्यंकय्या नायडू
४) मीरा कुमार
*      प्रश्न ९. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
१) १ मे
२) २७ जून
३) १५ ऑगस्ट
४) १० डिसेंबर
उत्तरे व स्पष्टीकरणे
*      प्र. क्र. १ – योग्य पर्याय क्र.(३) भारतीय पंचवार्षकि योजनांमध्ये महत्त्वाचे प्रतिमान तयार करणारे सांख्यिकी तज्ज्ञ पी. सी. महलनोबीस यांचा जन्म दिवस २९ जून हा दरवर्षी  राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महालनोबीस यांनी भारतीय सांख्यिकी प्रणाली स्थापन केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस मानला जातो. तसेच सांख्यिकी शाखेचे दैनंदिन महत्त्व अधोरेखित करण्यासाठीही तो साजरा करण्यात येतो.
*      प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र.(१) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी होत्या. मात्र पंतप्रधान असताना त्यांनी हा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला आहेत.
*      प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र.(२) कोल्हापुरी चप्पल. या पादत्राणांचे उत्पादन बाराव्या शतकापासून सुरू असून छत्रपती शाहू महाराजांनी २०व्या शतकामध्ये त्याला प्रोत्साहन दिले आणि हे उत्पादन एक वैशिष्टय़पूर्ण ब्रँड म्हणून प्रस्थापित झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्हे आणि कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि बागलकोट हे जिल्हे येथील उत्पादक WF GI tag वापरू शकतील.
*      प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(२) सायंकाळी ७ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये महिला कामगारांकडून कार्य करून घेण्यास फॅक्टरी कायदा १९४८ मनाई करतो. या तरतुदीमध्ये बदल करून या कालावधीमध्ये महिला कामगारांना काम करण्याची मुभा देण्यासाठी गोवा शासनाने मंजुरी दिली आहे.
*      प्र.क्र.५. – योग्य पर्याय क्र.(४) भारतीय रेल्वेसाठी धुके व तत्सम कमी दृश्यमान परिस्थितीमध्ये रुळांवरील अडथळे समजावेत यासाठी त्रिनेत्र ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
*      प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(१)
*      प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र.(४) राज्यामध्ये पुढील पाच वर्षांत १ लाख सूक्ष्म, लघू किंवा मध्यम उद्योगांची (units) उभारणी करून १० लाख रोजगार निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यातील ४० टक्के उद्योग हे ग्रामीण भागात विकसित करण्यात येतील. तसेच तालुका पातळीवर ५० औद्योगिक पार्क्‍सची स्थापना करण्यात येईल.
*      प्र.क्र.८ – योग्य पर्याय क्र.(२) लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळाणकर होते तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार या होत्या.
*      प्र. क्र. ९ – योग्य पर्याय क्र.     (२) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी तसेच कल्पकता व नावीन्यपूर्णतेस प्रोत्साहन देण्यामध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सन २०१७ पासून दरवर्षी २७ जून रोजी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस साजरा करण्यात येतो.
First Published on July 20, 2019 12:07 am
Web Title: Maharashtra Secondary Examination Mpsc Abn 97

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर सामायिक घटकांची तयारी पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्येही जवळपास ३०टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे.


(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल तिन्ही पदांच्या उपलब्ध संख्येनुसार स्वतंत्रपणे जाहीर होतो. मुख्य परीक्षेतील पेपर एक या तिन्ही पदांसाठी संयुक्त असतो तर पेपर दोन हा पदनिहाय स्वतंत्र. बहुतांश उमेदवारांनी तिन्ही पदांसाठी अर्ज केलेला असतोच व ते गृहीत धरूनच पदनिहाय पेपर हे थोडय़ा कालावधीनंतर होतात.
पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्येही जवळपास ३०टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. या लेखामध्ये सामायिक अभ्यासक्रमाच्या इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला इतिहास घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे
महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५ – १९४७) महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
विहित अभ्यासक्रमाचे बारकाईने विश्लेषण करून मगच अभ्यास सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा निरुपयोगी बाबींचा अभ्यास करत बसून वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सन १८८५पासूनचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ही या घटकाची आऊटलाइन आहे. या चौकटीमध्ये राहूनच या घटकाची तयारी करायला हवी. केवळ सामाजिक जागृती, राष्ट्रीय चळवळी हे मुद्दे पूर्णपणे राष्ट्रीय परीप्रेक्ष्यातून पाहावे आणि इतर मुद्दय़ांची तयारी महाराष्ट्राच्या सीमेत राहून करावी हेच आयोगाला अपेक्षित आहे. अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्राचा इतिहास असा स्पष्ट उल्लेख असल्याने आधुनिक भारताच्या इतिहासातील महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातील व्यक्ती, घटना आणि संस्था/संघटनांशी संबंधित बाबींवर जास्त प्रश्न विचारले जाणे गृहीत धरायला हवे. उदाहरणार्थ समकालीन चळवळींचा अभ्यास करताना बंगालमधील तिभागा आंदोलनापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी / आदिवासींचे उठाव या मुद्दय़ांवर भर असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन इतिहासाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करता येईल. –
सामाजिक जागृतीमध्ये सामाजिक सुधारणा चळवळी, सुधारक, त्यांचे कार्य, मागण्या, विरोध, भूमिका, ब्रिटिशांचे सामाजिक सुधारणांचे प्रयत्न या बाबी समजून घ्याव्यात. यामध्ये ठळक राष्ट्रीय सुधारक, संस्था, ब्रिटिशांचे प्रयत्न या बाबींचा आढावा आवश्यक आहे.
आर्थिक जागृतीमध्ये शेतकरी, आदिवासी, कष्टकरी जनता, कामगार यांच्या संघटना, उठाव, त्याची कारणे व परिणाम यांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या आर्थिक पिळवणुकीबाबतचे सिद्धांत, ते मांडणारे भारतातील सर्व अभ्यासक यांचाही अभ्यास आवश्यक आहे.
वर्तमानपत्रे, त्यांचे संस्थापक, संपादक, ब्रीदवाक्य, भाषा, प्रकाशनाचा काळ, ठिकाण, प्रसिद्ध लेख, लेखक, सामायिक व राजकीय भूमिका, समकालीन ब्रिटिश राज्यकत्रे, झाली असल्यास कार्यवाहीचे स्वरूप, इतर आनुषंगिक माहिती या मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासावीत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाच्या प्रसाराचे प्रयत्न, महिला व मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न, माध्यम व शिक्षणाच्या स्वरूपाविषयी समाजसुधारकांचे विचार, ब्रिटिशांनी स्थापन केलेले आयोग व त्यांच्या शिफारशी, ब्रिटिशांची भूमिका, स्वदेशी शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व त्यांचे योगदान, संस्थापक, त्यांची काय्रे हे मुद्दे अभ्यासावेत.
महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये राजकीय व सामाजिकच नाही तर सांस्कृतिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. या व्यक्तींचा अभ्यास त्यांचे कार्यक्षेत्र, कालावधी, महत्त्वाची उद्धरणे, स्थापन संस्था, कार्य, पुस्तके, असल्यास नियतकालिके, महत्त्वाच्या घटना, महत्त्वाची वैयक्तिक माहिती, असल्यास ब्रिटिशांशी संघर्षांचे स्वरूप, परिणाम यांचा आढावा घ्यावा.
राष्ट्रीय चळवळी अभ्यासताना महाराष्ट्राचा राजकीय इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. सन १८८५मधील काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यापर्यंत मुख्य प्रवाहातील संघर्षांचा अभ्यास आवश्यक आहे. मवाळ, जहाल कालखंड, गांधीयुगातील तीन महत्त्वाची आंदोलने, इतर महत्त्वाचे राजकीय पक्ष व त्यांची भूमिका आणि वाटचाल हा अभ्यासाचा गाभा ठेवायला हवा. याच वेळी महाराष्ट्रातील आणि इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी व त्यामध्ये सहभागी नेते, संघटना यांचे योगदान, त्याचा मुख्य प्रवाहातील संघर्षांवर परिणाम यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
समकालीन चळवळींमध्ये जहाल कालखंडाशी समांतर क्रांतिकारी चळवळींचा थोडक्यात आढावा घ्यावा. दुसऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ जास्त विस्तृत असल्याने तिचा बारकाईने आढावा घ्यावा. महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना, त्यांचे कार्य, नेते, संघर्षांचे स्वरूप, नेत्यांचे लेखन, प्रसिद्ध उद्धरणे, महत्त्वाच्या घटना यांचा बारकाईने आढावा घ्यावा. त्याचबरोबर आर्थिक जागृतीच्या अनुषंगाने अभ्यासलेल्या समांतर चळवळीतील ब्रिटिशविरोधी भूमिकाही समजून घ्यावी.
First Published on July 19, 2019 12:10 am
Web Title: Preparation Of Secondary Service Designated Paper Components Abn 9